शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

अर्ध्या महाराष्ट्रात कमी पाऊस ! मराठवाड्यात चांगला बरसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 04:59 IST

विदर्भात सर्वाधिक बॅकलॉग । मराठवाड्यात चांगला बरसला, ५ जिल्ह्यांत सर्वाधिक वृष्टी

पुणे : पावसाळ्यातील चार महिन्यांपैकी २ महिने सरल्यानंतरही राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून विदर्भातील ११ पैकी ९ जिल्ह्याचा त्यात समावेश आहे. नेहमी तहानलेल्या मराठवाड्यावर यंदा वरुणराजाने चांगलीच कृपादृष्टी ठेवली असून सर्व जिल्ह्यांत पावसाची सरासरी ओलांडली आहे. मध्य महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे.

जूनमध्ये पावसाने उशिरा सुरुवात केली असली तरी मान्सूनने १५ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. तरीही विदर्भात सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी होते. गेल्या दोन महिन्यात संपूर्ण राज्यात सरासरीच्या तुलनेत ४ टक्के अधिक पाऊस झाला आहेÞ त्याचवेळी विदर्भातील बुलढाणा व वाशिम वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. गोंदिया जिल्ह्यात सरासरीपेक्षा ४६ टक्के कमी पाऊस पडला आहेÞ तर अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पटीहून अधिक पाऊस झाला आहे. कोकणातील पालघरमध्ये गेल्या वर्षी दोनदा अतिवृष्टी झाली होती. यंदा मात्र तेथे सरासरीपेक्षा ३० टक्के कमी पाऊस झाला आहेÞ नांदेड येथे सरासरी इतका पाऊस झाला आहे.४ दिवस पावसाचे : पुढील चार दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.सरासरीपेक्षा सर्वांत कमी पाऊस गोंदिया ४६, नंदुरबार ३४, गडचिरोली २६, सातारा २९, भंडारा २२, यवतमाळ १९, पालघर ३०, रायगड १७, अकोला २०कमी पाऊस : अमरावती १०, नागपूर ५, वाशिम ४, कोल्हापूर १४, पुणे व नाशिक २, ठाणे १८, चंद्रपूर २, वर्धा ४ सरासरीपेक्षा अधिक पाऊस : नांदेड ०, बुलढाणा १८, वाशिम २३, हिंगोली ११, सांगली ८, जळगाव २८, धुळे ५०, लातूर ३७, रत्नागिरी ६, सिंधुदुर्ग ३१, मुंबई उपनगर ४०, मुंबई शहर ३८, लातूर ३७, उस्मानाबाद ३०, परभणी २५ टक्के सर्वाधिक पाऊस : अहमदनगर ११६, सोलापूर ९२, औरंगाबाद १०९, बीड ९१, जालना ५७

टॅग्स :RainपाऊसMumbaiमुंबई