शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
4
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
5
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
6
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
7
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
8
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
9
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
10
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
11
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
12
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
13
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
14
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
15
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
16
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
17
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
18
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
19
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
20
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?

बारामती परिसरात बिबट्याचा धुमाकूळ ; शेतकरी दहशतीच्या वातावरणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 20:45 IST

बिबट्याने शेतकऱ्यांचे जगणे अवघड झाले आहे

ठळक मुद्देभरदिवसा शेतकरी गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बिबट्या गोठ्यात शिरला

बारामती : कन्हेरी येथे बिबट्याने गुरुवारी(दि २३) सकाळीच एका शेतकऱ्याच्या गोठ्यात शिरुन शेळी आणि बोकडावर हल्ला केला.या हल्ल्यात बोकडाचा मृत्यु झाला,तर शेळी जखमी झाली. मंगळवारी(दि. २२) वगळता सलग पाचदिवस बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरुच आहे.लागोपाठ होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकरी दहशतीच्या वातावरणात आहेत.

भरदिवसा शेतकरी गुरुवारी सकाळी साडे सातच्या सुमारास कन्हेरी येथील शेतकरी दिलीप दत्तु काळे यांच्या घरालगत असणाऱ्या गोठ्याच्या भिंतीवर उडी मारुन बिबट्या शिरला.यावेळी बिबट्याने गोठ्यातील प्रथम बोकडाच्या नरडीचा घोट घेतला.त्यानंतर शेळीवर हल्ला केला. यावेळी शेळी जीवाच्या आकांताने ओरडली.शेळीचा आवाज ऐकुन दिलीप काळे यांचे बंधु नानासाहेब काळे धावत आले. यावेळी त्यांनी धाडसाने बिबट्याला हुसकावुन लावले.यावेळी जबड्यातील शेळीला सोडुन बिबट्या आलेल्या मार्गाने उडी मारुन निघुन गेल्याचे त्यांनी पाहिले.या हल्ल्यात शेळी जखमी झाली आहे.  गेल्या सात दिवसांपासुन बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरुच आहे. एका कुत्र्यासह मेंढीआणि शेळीची शिकार आजपर्यंत बिबट्याने केली आहे.तर दोन शेळ्यांना शेतकऱ्यांच्या धाडसामुळे जीवदान मिळाले आहे. शुक्रवारी (दि १७)बिबट्याने येथील एका कुत्र्याची शिकार करुन फडशा पाडला. त्यानंतर लागोपाठ सोमवारी  (दि २०) याच परीसरात मेंढ्याच्या कळपावर बिबट्याने हल्ला करुन मेंढीची शिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मेंढपाळ महादेव काळे आणि आनंदा केसकर या दोघा मेंढपाळांनी त्याच्यावर काठीने हल्ला केल्याने मेंढी सोडुन बिबट्याने पळ काढला होता. त्यानंतर येथील शेतकरी दत्तात्रय मारूती देवकाते यांच्या शेळीच्या कळपावर मंगळवारी (दि २१) दुपारी ३ च्या सुमारास बिबटयाने हल्ला केला.यावेळी बिबट्याने शेळीची मान जबड्यात धरुन शेळीला फरपटत नेले. देवकाते  यांनी बिबट्याच्या जबड्यातुन शेळी वाचवण्यासाठी प्रयत्न केला.मात्र तो निष्फळ ठरला.वनविभागाने परीसरात पाहणी केल्यानंतर बिबट्याबरोबरच लहान पिलांचे ठसेदेखील आढळुन आले आहेत.त्यामुळे या परीसरात धुमाकुळ घालणारा बिबट्या मादीअसुन त्याच्याबरोबर त्याची पिल्ले असल्याचे स्पष्ट झाले आहे.————————————————...माणसाचा जीव गेल्यावर काय करणाऱ्या हल्ल्याबाबत शेतकरी रामचंद्र काळे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले की,या बिबट्याने शेतकऱ्यांचे जगणे अवघड झाले आहे.रात्री अपरात्री शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रानात जावे लागते.वीजपुरवठ्याची वेळ निश्चित नसल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत धरुन शेतात पाणी देण्यासाठी जावेच लागते.लवकरात लवकर बिबट्याच्या वावरावर अंकुश निर्माण करण्यासाठी वन विभागाने कार्यवाही करावी

टॅग्स :Baramatiबारामतीleopardबिबट्या