शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

राजकारणातील घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी कायदा व्हायला हवा : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 15:44 IST

एका कुटुंबातील एक सदस्य निवडणुकीला उभा राहिल्यानंतर त्या घरातील दुसऱ्या सदस्याला पुढील ५० वर्षात राजकारणात प्रवेश देता कामा नये, तसा कायदा व्हायला हवा, असे मत कृषी-पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देराजकारणात घराणी स्थिर झाली की ती दुसऱ्याला राजकारणात येऊ देत नाहीत : खोतडॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे आयोजित तिसऱ्या युवा संसदेचा समारोप

पुणे : राजकारणात स्पर्धा नाही, तर घराणेशाहीची परंपरा आहे. त्यामुळे नव्या दमाच्या तरुणाईचा यामध्ये नंबर लागणे कठिण आहे. राजकारणात घराणी स्थिर झाली की ती दुसऱ्याला राजकारणात येऊ देत नाहीत. एकेका कुटुंबातील ५ ते ६ सदस्य राजकारणात सक्रिय असल्याची उदाहरणे आहेत. स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण झाली तरीही या घराण्यांची सेवा पूर्ण झालेली नाही. त्यामुळे एका कुटुंबातील एक सदस्य निवडणुकीला उभा राहिल्यानंतर त्या घरातील दुसऱ्या सदस्याला पुढील ५० वर्षात राजकारणात प्रवेश देता कामा नये, तसा कायदा व्हायला हवा, असे मत कृषी-पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. नऱ्हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे आयोजित तिसऱ्या युवा संसदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गोवा विधानसभा अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, आमदार कपिल पाटील, प्रा. नितीन बानगुडे पाटील, मेजर जनरल दिलावर सिंग, सुरेश पाटील, प्रा. डॉ. मुकुंद सारडा, अंकुश काकडे, अभिनेते सुनील गोडबोले, जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, संसदेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान प्रकल्प स्पर्धेतील विज्येत्यांना सन्मानित करण्यात आले. खोत पुढे म्हणाले, की राजकारण, समाजकारण ही चांगली क्षेत्रे आहेत. त्यामुळे चांगल्या माणसांनी यामध्ये यायला हवे. देशाची घटना, संविधान धोक्यात आले आहेत, असे जे लोक म्हणत आहेत, त्यांचे राजकारण धोक्यात आले आहे. याबाबत विनाकारण दंगा सुरु असून तरुणांची माथी भडकविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे युवकांनी राजकारणात यावे, याकरिता वैचारिक पिढी घडवावी लागेल. डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की महाविद्यालयीन काळातच जातीयवाद मोठ्या प्रमाणात तरुणांना पहायला मिळतो. उच्च शिक्षणाकरिता प्रवेश घेताना जातीची बंधने सुरु होतात. जातीवाद हा राष्ट्राला धोकादायक असून तरुणाईला घातक आहे. युवकांमध्ये भारताच्या नवनिमीर्तीची ताकद आहे. देशाच्या विकासासाठी तरुणाईने एकत्र या, असे आवाहन त्यांनी केले. कपिल पाटील म्हणाले, की देशातील तरुणाई जेव्हा सरकारकडे विविध प्रश्नांविषयी मागणी करते, तेव्हा जाती-धर्मात भांडणे लावणे हा सोपा मार्ग अवलंबिला जात आहे. या धोरणाला बळी पडायचे नाही, असे तरुणांनी ठरवायला हवे. आज जातीवादाचे मोठे आव्हान असून त्याचा सामना करण्याची वेळ तरुण पिढीवर आली आहे, असेही ते म्हणाले.  महाराष्ट्र आणि गोवा येथून सुमारे २५० विद्यार्थी नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून संसदेत सहभागी झाले होते. तर महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, अकोला, सातारा, मराठवाडा, मुंबई यांसह विविध भागांतून २ हजार विद्यार्थी संसदेकरीता पुण्यामध्ये आले होते. कॉमनवेल्थ युथ कौन्सिलचे यंदा संसदेला सहकार्य मिळाले. सोड नाराजी घे भरारी, विकासाचे राजकारण म्हणजे काय, माझा राष्ट्रवाद आणि तुझा राष्ट्रवाद... खरा कोणाचा, सशक्त युवा सशक्त भारत, जातीवाद आघाडीवर आधुनिकता पिछाडीवर अशा विविध विषयांवर संसदेत चर्चा व मार्गदर्शन झाले. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Puneपुणे