शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
4
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
5
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
6
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
7
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
8
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
9
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
10
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
11
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
14
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
15
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
16
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
17
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
18
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

कायदा तोडणाऱ्यांचे हात पाय तोडले पाहिजे : महेश झगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 1:24 PM

‘कायदे हे जनतेच्या गरजेपोटी निर्माण झालेली व्यवस्था आहे..... मात्र.. त्याची योग्यप्रकारे अंमलबजावणी होत नाही : महेश झगडे

ठळक मुद्देई-फार्मसीची अंमलबजावणी जर येणाऱ्या प्रस्तावित कायद्यानुसार झाली तर त्यामध्ये अयोग्य काय ?

पुणे : देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी महात्मा गांधी यांनी कायदेभंगाची चळवळ सुरू केली, मात्र दुर्देवाने स्वातंत्र्यानंतरही नागरिकांनी ही कायदेभंगाची चळवळ पुढे चालू ठेवली आहे, कायद्यांचे सर्रास उल्लंघन होत आहे. कायदा जर कुणी तोडत असेल तर त्यांचे हात पाय तोडले पाहिजेत, असे संतप्त मत माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी व्यक्त केले. सजग नागरिक मंचच्यावतीने आयोजित ‘आॅनलाइन फार्मसी रूग्णांसाठी योग्य कि अयोग्य?’ या विषयावरील आयोजित चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनंत फडके, भारती विद्यापीठ फार्मसी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आत्माराम पवार, केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी विजय चंगेडिया यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. यावेळी सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर, जुगल राठी उपस्थित होते.झगडे म्हणाले, ‘‘कायदे हे जनतेच्या गरजेपोटी निर्माण झालेली व्यवस्था आहे. लोकहिताच्या दृष्टिकोनातून पुढे आलेल्या मागण्यांमधून कायद्यांची निर्मिती होते. अनेक चांगले कायदे निर्माण होतात. मात्र, त्याची योग्यप्रकारे अंमलबजावणी होत नाही. औषध विक्री करता अस्तित्त्वात असलेल्या कायद्याची योग्यप्रकारे अंमलबजावणी झाली नाही म्हणून आज डायलासिसचे अनेक केंद्र उभारावे लागत आहेत.’’ ई-फार्मसीबाबत कायदा करण्यात यावा अशी मागणी रूग्णांकडून झाल्याचे एकही उदाहरण नाही. तरीही हा कायदा केला जातोय. ई-फार्मसीमधून उभ्या राहणाऱ्या मोठया व्यापार व्यवस्थेचाच हा एक भाग आहे. या ई-फार्मसीचे काय परिणाम होणार आहेत याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार करावा लागेल. ई-फार्मसी नसेल तर रूग्णांचे काहीही नुकसान नाही. मात्र ते अस्तित्त्वात आल्यास त्याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम होणार आहेत. यामुळे अनेक लोक बेरोजगार होतील. त्यामुळे ई-फार्मसीची आवश्यकता नाही, असे झगडे यांनी स्पष्ट केले.विजय चंगेडिया म्हणाले, ‘‘आॅनलाइन फार्मसीच्या माध्यमातून बनावट औषधे येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याचा एक मोठा धोका संभवतो. गर्भनिरोधक गोळया, व्हायग्रा अशी औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकली जाण्याचाही धोका आहे. आपल्या एफडीएला शून्य अधिकार आहेत. ते पत्र पाठविण्या पलीकडे काही करू शकणार नाहीत. त्यामुळे आमचा आॅनलाइन फार्मसीला विरोध आहे.’’...............जर कायद्यानुसार झाले तर अयोग्य कायई-फार्मसीची अंमलबजावणी जर येणाऱ्या प्रस्तावित कायद्यानुसार झाली तर त्यामध्ये अयोग्य काय आहे. कायद्यानुसार कार्यवाही झाली तर त्याचे डॉक्टर व रूग्ण या दोहोंचे काहीही नुकसान नाही असे डॉ. अनंत फडके यांनी सांगितले. खरा प्रश्न दर्जाहीन, महागडया औषधांना आहे. त्याला पर्याय म्हणून जनरिक औषधांचा स्वीकार होणे आवश्यक असल्याचे फडके यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेmedicineऔषधंdialysisडायलिसिसVivek Velankarविवेक वेलणकर