शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

मुळशी धरणातील लाँच बंद, ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून होडीने करावा लागतो प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 00:50 IST

मुळशी धरणाच्या आतील दहा गावांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने चालविली जाणारी लाँच (इंजिन संचलित बोट) गेल्या अनेक दिवसांपासून चालकाअभावी बंद असल्याने धरणाच्या आतील ग्रामस्थांना प्रवास करण्यात मोठी गैरसोय होत आहे.

पौड  - मुळशी धरणाच्या आतील दहा गावांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने चालविली जाणारी लाँच (इंजिन संचलित बोट) गेल्या अनेक दिवसांपासून चालकाअभावी बंद असल्याने धरणाच्या आतील ग्रामस्थांना प्रवास करण्यात मोठी गैरसोय होत आहे.पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने धरणाच्या आतील नागरिकांना रोज ये-जा करण्यासाठी मागील तीस वर्षांपासून लाँच सुरु करण्यात आली आहे. ही लाँच अनेकदा वेगवेगळ्या कारणाने बंद असते. कधी या लाँचचा यांत्रिक बिघाड, कधी चालकाचा अभाव तर कधी निसर्गाची अवकृपा त्यामुळे या भागातील नागरिकांचे दळणवळण खंडित होऊन त्यांचा तालुक्याशी संपर्क तुटतो. पूर्वीचे एक चालक निवृत्त झाल्यानंतर या ठिकाणी एक कंत्राटी चालक नियुक्त केला होता. त्याला कमी पगार असल्याने व तोही वेळेवर मिळत नसल्याने त्याने कंटाळून राजीनामा दिला आहे. त्यामुळे ही लाँच गेल्या अनेक दिवस बंद आहे.याबाबत माहिती देताना येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघ म्हणाले की, लाँच बंद असल्यामुळे या भागातील वाघवाडी, वडगाव, शिरगाव, भादसखोंडा, वडुस्ते, वांद्रे, लिंबारवाडी, भीमनगर, पिंपरी, मोहरी या दहा गावांतील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यामध्ये शाळकरी मुले, महिला व दररोज कामासाठी धरणाखाली पौड, पुणे येथे मजुरीसाठी जाणारे कामगार असे शेकडो लोक दररोज ये-जा करतात. यातील अनेकांना पोहताही येत नाही. सध्या ही मंडळी पर्याय म्हणून एका छोट्याशा बोटीतून येजा करतात. मुळशी धरणाची खोली प्रचंड असल्याने त्यातून या बोटीने हा प्रवास अत्यंत असुरक्षित पद्धतीने केला जातो. मागील काही वर्षांत अन्य धरणांमध्ये बोटी उलटून दुर्घटना घडलेल्या आहेत. ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असून, चालकाअभावी लाँच अद्यापही बंदच आहे.यापूर्वी नादुरुस्तीच्या कारणाने उभ्या असलेल्या प्रत्येकी २० लाख रुपये किमतीच्या दोन लाँचला जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षपणामुळे जलसमाधी मिळाली. यात राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान झाले.याबाबत वाघवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघ यांनी या भागातील ग्रामस्थांच्या सह्यांचे लाँच त्वरित सुरु करण्याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेला दिले आहे. लाँच सुरु न झाल्यास असुरक्षितपणे होडीतून प्रवास करताना दुर्घटना घडल्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.पौड पंचायत समिती येथे मागील आठवड्यात पाणीटंचाई आढावा बैठकीसाठी आल्यानंतर जि. प. अध्यक्ष विश्वास देवकाते यांना भेटून धरण भागातील नागरिकांनी आपली अडचण सांगितली होती. तरीही अद्याप लाँच सुरु झाली नसल्याने या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी धरण भागातील नागरिक पौड पंचायतीसमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन जिल्हा परिषदेला दिले आहे.- अर्चना सुभाष वाघ,सरपंच वडगाव-वाघवाडी.

टॅग्स :Puneपुणे