शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मुळशी धरणातील लाँच बंद, ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून होडीने करावा लागतो प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 00:50 IST

मुळशी धरणाच्या आतील दहा गावांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने चालविली जाणारी लाँच (इंजिन संचलित बोट) गेल्या अनेक दिवसांपासून चालकाअभावी बंद असल्याने धरणाच्या आतील ग्रामस्थांना प्रवास करण्यात मोठी गैरसोय होत आहे.

पौड  - मुळशी धरणाच्या आतील दहा गावांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने चालविली जाणारी लाँच (इंजिन संचलित बोट) गेल्या अनेक दिवसांपासून चालकाअभावी बंद असल्याने धरणाच्या आतील ग्रामस्थांना प्रवास करण्यात मोठी गैरसोय होत आहे.पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने धरणाच्या आतील नागरिकांना रोज ये-जा करण्यासाठी मागील तीस वर्षांपासून लाँच सुरु करण्यात आली आहे. ही लाँच अनेकदा वेगवेगळ्या कारणाने बंद असते. कधी या लाँचचा यांत्रिक बिघाड, कधी चालकाचा अभाव तर कधी निसर्गाची अवकृपा त्यामुळे या भागातील नागरिकांचे दळणवळण खंडित होऊन त्यांचा तालुक्याशी संपर्क तुटतो. पूर्वीचे एक चालक निवृत्त झाल्यानंतर या ठिकाणी एक कंत्राटी चालक नियुक्त केला होता. त्याला कमी पगार असल्याने व तोही वेळेवर मिळत नसल्याने त्याने कंटाळून राजीनामा दिला आहे. त्यामुळे ही लाँच गेल्या अनेक दिवस बंद आहे.याबाबत माहिती देताना येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघ म्हणाले की, लाँच बंद असल्यामुळे या भागातील वाघवाडी, वडगाव, शिरगाव, भादसखोंडा, वडुस्ते, वांद्रे, लिंबारवाडी, भीमनगर, पिंपरी, मोहरी या दहा गावांतील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यामध्ये शाळकरी मुले, महिला व दररोज कामासाठी धरणाखाली पौड, पुणे येथे मजुरीसाठी जाणारे कामगार असे शेकडो लोक दररोज ये-जा करतात. यातील अनेकांना पोहताही येत नाही. सध्या ही मंडळी पर्याय म्हणून एका छोट्याशा बोटीतून येजा करतात. मुळशी धरणाची खोली प्रचंड असल्याने त्यातून या बोटीने हा प्रवास अत्यंत असुरक्षित पद्धतीने केला जातो. मागील काही वर्षांत अन्य धरणांमध्ये बोटी उलटून दुर्घटना घडलेल्या आहेत. ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असून, चालकाअभावी लाँच अद्यापही बंदच आहे.यापूर्वी नादुरुस्तीच्या कारणाने उभ्या असलेल्या प्रत्येकी २० लाख रुपये किमतीच्या दोन लाँचला जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षपणामुळे जलसमाधी मिळाली. यात राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान झाले.याबाबत वाघवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघ यांनी या भागातील ग्रामस्थांच्या सह्यांचे लाँच त्वरित सुरु करण्याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेला दिले आहे. लाँच सुरु न झाल्यास असुरक्षितपणे होडीतून प्रवास करताना दुर्घटना घडल्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.पौड पंचायत समिती येथे मागील आठवड्यात पाणीटंचाई आढावा बैठकीसाठी आल्यानंतर जि. प. अध्यक्ष विश्वास देवकाते यांना भेटून धरण भागातील नागरिकांनी आपली अडचण सांगितली होती. तरीही अद्याप लाँच सुरु झाली नसल्याने या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी धरण भागातील नागरिक पौड पंचायतीसमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन जिल्हा परिषदेला दिले आहे.- अर्चना सुभाष वाघ,सरपंच वडगाव-वाघवाडी.

टॅग्स :Puneपुणे