शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

कालौघात नाट्य व्यवसायाचे स्वरूप बदलले

By admin | Updated: June 26, 2017 03:44 IST

महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा ‘बालगंधर्व पुरस्कार’ मनोरंजन नाट्यसंस्थेचे संस्थापक-संचालक मनोहर कुलकर्णी (अण्णा) यांना जाहीर झाला आहे.

महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा ‘बालगंधर्व पुरस्कार’ मनोरंजन नाट्यसंस्थेचे संस्थापक-संचालक मनोहर कुलकर्णी (अण्णा) यांना जाहीर झाला आहे. त्यांनी जवळपास पन्नास वर्षे नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. शहरात नाट्यगृहांची उभारणी झाल्यानंतर नाट्यप्रयोग, आॅर्केस्ट्रा, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. आजवर नाटकांमध्ये हौसेपोटी भूमिका केल्या. महानगरपालिकेतर्फे ‘बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर झाल्याचा आनंद नक्कीच आहे, अशा भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. बालगंधर्व रंगमंदिराचा सुवर्णमहोत्सवी सोहळा ही अनेक आठवणींना उजाळा देणारी घटना आहे. १९६१ मध्ये अनंत जाधव महानगरपालिकेचे सहायक आयुक्त असताना पु. ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बालगंधर्व रंगमंदिराची पायाभरणी झाली. २६ जून १९६८ रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते रंगमंदिराचे उद्घाटन झाले. या वेळी आचार्य अत्रे, पं. वसंतराव देशपांडे, ज्योत्स्ना भोळे, जयमाला शिलेदार असे दिग्गज कलाकार उपस्थित होते. बी. जी. शिर्के यांनी रंगमंदिराचे बांधकाम केले होते. उद्घाटनानंतर संपूर्ण जुलै महिना अत्रे थिएटर्सची ‘डॉक्टर’, ‘मी मंत्री झालो’, ‘बुवा तेथे बाया’ अशा नाटकांचे आलटून पालटून प्रयोग होत होते. या सर्व नाटकांचे व्यवस्थापन करण्याचे भाग्य मला लाभले. त्या वेळी मनोरंजन नाट्यसंस्थेची स्थापना झाली नव्हती. १९६९ मध्ये संस्था नावारूपाला आली. ते म्हणाले, ‘मी १९५०पासून नाट्यसृष्टीत कार्यरत होतो. सरस्वती मंदिर प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सरस्वती मंदिर नटसंघाची स्थापना केली होती. त्या वेळी मी ‘संगीत म्युन्सिपाल्टी’, ‘पराचा कावळा’ आदी नाटकांमध्ये भूमिका केल्या होत्या. भालबा केळकर यांच्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनने ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक राज्यस्पर्धेमध्ये सादर केले. त्यानंतर त्या नाटकाचे चार प्रयोग झाले. पुढे या नाटकावरून वाद झाला आणि नाटक कंपनीतून अनेक जण वेगळे झाले. त्यानंतर १९७० मध्ये थिएटर अ‍ॅकॅडमी सुरू करण्यात आली. या कंपनीच्या सर्व नाटकांची व्यवस्था मनोरंजन नाट्यसंस्थेकडे होती. ‘पडघम’, ‘तीन पैशांचा तमाशा’ अशा नाटकांचेही अनेक प्रयोग झाले. सुयोग, कलावैभव, नाट्यसंपदा या सर्व नाटक कंपन्यांचे व्यवस्थापन मनोरंजनकडे होते. मी सरकारी नोकरीमध्ये रात्रपाळी करून मनोरंजन नाट्यसंस्थेचा व्याप सांभाळण्याचा प्रयत्न केला. यानिमित्ताने अनेक कलाकारांशी संबंध प्रस्थापित झाले. रंगभूमीची सेवा करण्याची यानिमित्ताने संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. नाट्यव्यवसाय हा अत्यंत चमत्कारिक व्यवसाय आहे. ऐंशीच्या दशकात या व्यवसायात काम करणारे अनेक जण व्यसनाधीनतेच्या आहारी गेले. त्यामुळे अनेक जण व्यवसायापासून दूर गेले. पूर्वीच्या तुलनेत आता नाट्यव्यवस्थापन सोपे झाले आहे. केवळ बुकिंग करणे म्हणजे व्यवस्थापन नव्हे. पूर्वी आम्ही सायकलवरून हिंडत. छपाई करणे, बोर्ड रंगवणे, वर्तमानपत्रांना जाहिरात नेऊन देणे, अशी सर्व कामे आम्ही करायचो. फोन, इंटरनेट आल्यानंतर, ही सर्व धावपळ संपली. शहराचा विस्तार झाला, नाट्यगृहांची संख्या वाढली त्याप्रमाणे नाट्यव्यवसायाचे स्वरूपही बदलले. पूर्वी मनोरंजन नाट्यसंस्थेतर्फे वासंतिक नाट्यमहोत्सव आयोजित केला जात असे. खुल्या नाट्यगृहाच्या माध्यमातून नाटके सादर केली जात असत. बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी झाल्यावर हा महोत्सव बंद करण्यात आला.’आजकाल रसिकांची नाटकाबाबतची अभिरुची बदलली आहे. तरुणांनी मोठ्या संख्येने नाटकांकडे वळण्याची गरज आहे. पूर्वी ‘हॅम्लेट’, ‘पुण्यप्रभाव’, ‘भावबंधन’ अशा पूर्वीच्या नाटकांचे प्रयोग पुन्हा झालेच नाहीत. अभिनय, गायन यांचे प्रमाणही कमी झाले आहे. आजकाल बोलीभाषेतील नाटके जास्त चालतात. नाटकांच्या माध्यमातून तरुण आणि मुलांच्या आवडीचे विषय हाताळण्याची गरज आहे. नाट्यव्यवस्थापन क्षेत्रातील प्रवासाचा वेध घेणारे लिखाण मी वि. भा. देशपांडे यांच्या ‘एनसायक्लोपीडिया’ यामध्ये प्रसिद्ध झाला. भविष्यात शक्य झाल्यास या प्रवासाबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.