शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

मुंबई-पुणे गॅस वाहिनीचे काम अंतिम टप्प्यात : गॅस वाहतुक खर्चात होणार बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 12:07 IST

हिंदुस्थान पेट्रोलियमच्या माध्यमातून उरण ते पुणे या दरम्यान तब्बल १६० किलोमीटर अंतराची गॅस वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देदररोज सव्वाशे अवजड टँकरची वाहतूक होणार कमी पुण्याला दररोज २ हजार १०० टन गॅसचा पुरवठासुरक्षेच्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने टँकरची वाहतुक अधिक जिकीरीची हिंदुस्थान आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांना दररोज प्रत्येकी ८०० आणि आयओसीला ५०० टन गॅसची गरजतीन महिन्यांत प्रत्यक्षात गॅस वाहिनीद्वारे द्रव स्वरुपातील गॅस मिळण्यास सुरुवात होणार

पुणे : शहराला स्वयंपाकासाठी आणि औद्योगिक कारणासाठी वितरीत होणाऱ्या लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसची (एलपीजी) वाहतुक आणखी जलद आणि स्वस्त होणार आहे. मुंबई-पुणे या गॅस वाहिनीचे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर वाहिनीची चाचणी झाल्यानंतर पुढील दोन ते तीन महिन्यांत प्रत्यक्षात गॅस वाहिनीद्वारे द्रव स्वरुपातील गॅस मिळण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती इंडियन ऑईल  कॉर्पोरेशनच्या (आयओसी) अधिकाऱ्यांनी दिली. आयओसीच्या चाकण येथील प्रकल्पाला नुकतेच २५ वर्षे पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रकल्प पाहणी कार्यक्रमांतर्गत ही माहिती देण्यात आली. इंडियन ऑईलच्या उप महाप्रबंधक अंजली भावे, पश्चिम विभागाचे मावळते उपमहाप्रबंधक सुरेश अय्यर, चाकण येथील प्रकल्पाचे उपमहासंचालक राजीव शर्मा, मुख्य व्यवस्थापक एच. जी. भरवाणी, वरीष्ठ व्यवस्थापक चेतन पटवारी या वेळी उपस्थित होते. आयओसीच्या चाकण येथील प्रकल्पातून २७ जिल्ह्यांना गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. या प्रकल्पाची क्षमता दररोज ३२ हजार सिलिंडर भरण्याची आहे. चाकण प्रकल्पाचे उप महाव्यवस्थापक राजीव शर्मा म्हणाले, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांना उरण येथून गॅस पुरवठा होतो. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या माध्यमातून उरण ते पुणे या दरम्यान तब्बल १६० किलोमीटर अंतराची गॅस वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील तीन महिन्यांत वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर वाहिनीची चाचणी झाल्यानंतर प्रत्यक्ष पुरवठा देखील सुरु होईल. पुण्याला दररोज २ हजार १०० टन गॅसचा पुरवठा होतो. त्यासाठी सुमारे सव्वाशे टँकरची आवश्यकता असते. सुरक्षेच्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने टँकरची वाहतुक अधिक जिकीरीची असते. ही वाहिनी पूर्ण झाल्यानंतर अवजड वाहतूक बंद होईल. हिंदुस्थान आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांना दररोज प्रत्येकी ८०० आणि आयओसीला ५०० टन गॅसची गरज आहे. वाहिनीद्वारे तळेगाव येथील हिंदुस्थिान पेट्रोलियम, चाकण येथील आयओसी आणि शिक्रापूरच्या भारत पेट्रोलियमला गॅसने वाहतुक होईल. वाहतुकीच्या खर्चात बचत होईल. मुंबई-पुणे या मार्गावर होणारी जड वाहनांची वाहतुक कमी होईल. या शिवाय कर्नाटकला मुंबई ऐवजी पुण्यातुन गॅस वाहतुक होईल. त्यामुळे दीडशे किलोमीटरचे अंतर वाचेल. 

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईKarnatakकर्नाटक