शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

स्मशानातल्या राखेमधून ‘लँड फिलिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:11 IST

नातेवाइकच करतात स्वच्छता : विद्युत-गॅस दाहिनीत जमा होत नाही राख पुणे : कोरोनामुळे गेल्या सव्वा वर्षात मृतांची संख्या वाढली ...

नातेवाइकच करतात स्वच्छता : विद्युत-गॅस दाहिनीत जमा होत नाही राख

पुणे : कोरोनामुळे गेल्या सव्वा वर्षात मृतांची संख्या वाढली आहे. या मृतदेहांवर पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करण्यास अलीकडच्या महिन्यात परवानगी देण्यात आली. परंतु, जमा होणाऱ्या राखेची तत्काळ विल्हेवाट लावली जाते. ही राख नातेवाईकच स्वच्छ करून जमा करून ठेवतात. त्यानंतर ही राख घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत उचलून नेली जाते. या राखेचा वापर करून लँड फिलिंग केले जाते.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर पारंपरिक पद्धतीने लाकडावर किंवा विद्युत अथवा गॅसदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. लाकडावर होणाऱ्या अंत्यविधीमधून राख तयार होते. मात्र, विद्युत-गॅस दाहिनीमधून राख तयार होत नाही. नातेवाईक अंत्यविधीनंतर दोन दिवसांनी सावडण्याचा विधी करतात. या विधीमध्ये अस्थी शोधून झाल्यानंतर उर्वरित राख गोळा केली जाते. ही राख गाड्यांमध्ये भरून स्मशानभूमीत ठरवून दिलेल्या जागेवर नेऊन ओतली जाते.

अंत्यविधी झालेल्या ठिकाणी नातेवाईक शेणाने जमीन सारवून घेतात. ही जागा झाडून, पाणी मारून स्वच्छ करतात. ही राख घनकचरा विभागाकडून उचलून नेली जाते. ही राख जमिनीमध्ये खड्डे करून टाकली जाते. किंवा कचरा रिजेक्ट म्हणून त्याद्वारे लँड फिलिंगचे काम केले जाते. त्यामुळे स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय? असा प्रश्न तूर्तास तरी पालिकेसमोर निर्माण झालेला नाही.

-----

वैकुंठ स्मशानभूमीसह शहरातील सर्वच स्मशानभूमींमध्ये अंत्यविधी झाल्यानंतर उरलेली राख एका ठिकाणी जमा केली जाते. ही राख घनकचरा विभागाकडून उचलून नेली जाते. त्याद्वारे लँड फिलिंग केले जाते. तसेच जमिनीत खड्डे करून त्यामध्ये ही राख टाकली जाते. स्मशानभूमीत राख शिल्लक राहत नाही.

- श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

-----

विद्युत किंवा गॅस दाहिनीमध्ये मृतदेहांवर अंत्यविधी झाल्यावर राख निर्माण होत नाही. अस्थींचा काही भाग शिल्लक राहतो. त्या अस्थी नातेवाईक घेऊन जातात. पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या अंत्यविधीनंतर नातेवाईक राख उचलून ती जागा स्वच्छ करतात.

- किशोर क्षीरसागर, कैलास स्मशानभूमी

----

अंत्यविधी झाल्यानंतर राहिलेली राख उचलून नेण्यासाठी पालिकेमार्फत व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक शेडजवळ गाडा उभा केलेला असतो. या गाड्यामध्ये राख भरून नेमून दिलेल्या ठिकाणावर ही राख टाकली जाते. तेथून ती घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत उचलून नेली जाते.

-----

शहरात संचारबंदी असली आणि बाहेर फिरण्यावर निर्बंध असले तरी नातेवाईक अस्थी घेऊन जातात. पोलीस आणि पालिकेची यंत्रणा अशा नातेवाईकांना सूट देते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अगदी सुरुवातीच्या काळात अस्थी घेऊन जाण्यास नातेवाईक घाबरत होते. परंतु, पालिकेने प्रबोधन केल्यानंतर नातेवाईक या अस्थी घेऊन जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अस्थी विसर्जनास अडचणी येत नाहीत.