शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

स्मशानातल्या राखेमधून ‘लँड फिलिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:11 IST

नातेवाइकच करतात स्वच्छता : विद्युत-गॅस दाहिनीत जमा होत नाही राख पुणे : कोरोनामुळे गेल्या सव्वा वर्षात मृतांची संख्या वाढली ...

नातेवाइकच करतात स्वच्छता : विद्युत-गॅस दाहिनीत जमा होत नाही राख

पुणे : कोरोनामुळे गेल्या सव्वा वर्षात मृतांची संख्या वाढली आहे. या मृतदेहांवर पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करण्यास अलीकडच्या महिन्यात परवानगी देण्यात आली. परंतु, जमा होणाऱ्या राखेची तत्काळ विल्हेवाट लावली जाते. ही राख नातेवाईकच स्वच्छ करून जमा करून ठेवतात. त्यानंतर ही राख घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत उचलून नेली जाते. या राखेचा वापर करून लँड फिलिंग केले जाते.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर पारंपरिक पद्धतीने लाकडावर किंवा विद्युत अथवा गॅसदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. लाकडावर होणाऱ्या अंत्यविधीमधून राख तयार होते. मात्र, विद्युत-गॅस दाहिनीमधून राख तयार होत नाही. नातेवाईक अंत्यविधीनंतर दोन दिवसांनी सावडण्याचा विधी करतात. या विधीमध्ये अस्थी शोधून झाल्यानंतर उर्वरित राख गोळा केली जाते. ही राख गाड्यांमध्ये भरून स्मशानभूमीत ठरवून दिलेल्या जागेवर नेऊन ओतली जाते.

अंत्यविधी झालेल्या ठिकाणी नातेवाईक शेणाने जमीन सारवून घेतात. ही जागा झाडून, पाणी मारून स्वच्छ करतात. ही राख घनकचरा विभागाकडून उचलून नेली जाते. ही राख जमिनीमध्ये खड्डे करून टाकली जाते. किंवा कचरा रिजेक्ट म्हणून त्याद्वारे लँड फिलिंगचे काम केले जाते. त्यामुळे स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय? असा प्रश्न तूर्तास तरी पालिकेसमोर निर्माण झालेला नाही.

-----

वैकुंठ स्मशानभूमीसह शहरातील सर्वच स्मशानभूमींमध्ये अंत्यविधी झाल्यानंतर उरलेली राख एका ठिकाणी जमा केली जाते. ही राख घनकचरा विभागाकडून उचलून नेली जाते. त्याद्वारे लँड फिलिंग केले जाते. तसेच जमिनीत खड्डे करून त्यामध्ये ही राख टाकली जाते. स्मशानभूमीत राख शिल्लक राहत नाही.

- श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

-----

विद्युत किंवा गॅस दाहिनीमध्ये मृतदेहांवर अंत्यविधी झाल्यावर राख निर्माण होत नाही. अस्थींचा काही भाग शिल्लक राहतो. त्या अस्थी नातेवाईक घेऊन जातात. पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या अंत्यविधीनंतर नातेवाईक राख उचलून ती जागा स्वच्छ करतात.

- किशोर क्षीरसागर, कैलास स्मशानभूमी

----

अंत्यविधी झाल्यानंतर राहिलेली राख उचलून नेण्यासाठी पालिकेमार्फत व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक शेडजवळ गाडा उभा केलेला असतो. या गाड्यामध्ये राख भरून नेमून दिलेल्या ठिकाणावर ही राख टाकली जाते. तेथून ती घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत उचलून नेली जाते.

-----

शहरात संचारबंदी असली आणि बाहेर फिरण्यावर निर्बंध असले तरी नातेवाईक अस्थी घेऊन जातात. पोलीस आणि पालिकेची यंत्रणा अशा नातेवाईकांना सूट देते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अगदी सुरुवातीच्या काळात अस्थी घेऊन जाण्यास नातेवाईक घाबरत होते. परंतु, पालिकेने प्रबोधन केल्यानंतर नातेवाईक या अस्थी घेऊन जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अस्थी विसर्जनास अडचणी येत नाहीत.