शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

आदिवासींना मिळणार हक्काच्या जमिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 04:02 IST

राज्याच्या आदिवासी विकास विभागाने प्रलंबित वनहक्क दावे व अपिले निकाली काढण्यासाठी ‘वनमित्र मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे

पुणे : राज्याच्या आदिवासी विकास विभागाने प्रलंबित वनहक्क दावे व अपिले निकाली काढण्यासाठी ‘वनमित्र मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे जंगलात राहून उपजीविका करणाऱ्या अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासींना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) कायद्यातील तरतुदीची काटेकोर अंमलबजावणी करून प्रलंबित वनहक्क दावे व अपिले यांचा निपटारा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी आदिवासी विकास विभागातर्फे वनमित्र मोहीम राबविली जाणार आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे वनमित्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात सर्व दावे व अपिले निकाली काढले जाणार आहेत.अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी यांना कायद्याने वैयक्तिक व सामूहिक वनहक्क किंवा दोहोंचे धारणाधिकार मिळण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. आदिवासी समाजाची अन्नसुरक्षा व उपजीविका या दृष्टीने हे अधिकार अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी वेळोवेळी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, तसेच जिल्हास्तरीय समितीने सर्वच प्रकरणांमध्ये वनहक्क अभिलेख्यांबाबत अंतिम निर्णय घेण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे.गेल्या १० वर्षांपासून अनेक वनहक्कांचे दावे व अपिले जिल्हा समितीने अंतिमरीत्या निकाली काढले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व दावे निकाली काढण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.आदिवासी व कष्टकरी समाजाने काढलेल्या आंदोलनाची दखल घेऊन उशिरा का होईना, राज्य शासनाने त्यांच्या प्रलंबित प्रश्नाचा विचार केला आहे. वनहक्क दावे व अपिले यांचा कालबद्ध निपटारा करण्यासाठी वनमित्र मोहीम हाती घेतली आहे़ अनेक आदिवासी त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळू शकतील.- सीताराम जोशी, अध्यक्ष, आदिवासी समाज कृती समिती.