शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

समाजाचे दीपस्तंभ ‘काका’

By admin | Updated: January 24, 2017 01:28 IST

दौंड येथील ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत रामचंद्र उगले यांची गेल्या ५० वर्षांची पत्रकारिता पाहता ते पत्रकारितेबरोबरीनेच समाजाचे दीपस्तंभ होते.

दौंड येथील ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत रामचंद्र उगले यांची गेल्या ५० वर्षांची पत्रकारिता पाहता ते पत्रकारितेबरोबरीनेच समाजाचे दीपस्तंभ होते. गेल्या आठवड्यात त्यांचे ९१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा. उगले यांचा जन्म श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावी सर्वसामान्य कुटुंबात झाला. वि. रा. हे ‘काका’ या टोपणनावाने परिचित होते. गांधीवादी, समाजवादी विचारसरणी असल्याने त्यांचे राहणीमान गांधी टोपी, पायजमा आणि नेहरू शर्ट असे असायचे. हातात कायम पिशवी व पिशवीत सातत्याने कायद्याच्या चाकोरीतील समाजाचे प्रश्न असणारी कागदपत्रे असायची. कुठलीही कायद्याची पदवी घेतली नसली तरी कायद्याचे त्यांना ज्ञान होते. त्यांच्या निवासस्थानापासून जुने गावठाण ३ किलोमीटरच्या अंतरावर आहे. वयाच्या ९१ व्या वर्षीदेखील ते घरापासून गावात पायी चालत येत होते. गेली ५० वर्षे ते पत्रकारितेच्या क्षेत्रात असल्याने कुठलेही मानधन न घेता त्यांनी अखंडपणे पत्रकारिता केली होती. किंबहुना पत्रकारांच्या पाठीवर कर्तृत्वाची थाप पडावी, म्हणून त्यांनी पुण्याच्या केसरी ट्रस्टला ५० हजारांची देणगी दिली होती. कुठल्याही पत्रकारावर वाईट प्रसंग आला तर ते त्याच्या पाठीशी धावून येत. दळणवळणाच्या सोईअभावी त्यांनी तालुक्यात सायकलवर फिरून समाजाचे प्रबोधन केले आहे. ६ महिन्यांपूर्वी त्यांना पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे खासदार शरद पवार यांच्या हस्ते गौरविले होते. पत्रकारितेबरोबरीनेच त्यांनी सामाजिक बांधिलकीतून दौंड ते पुणे रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविले. दौंडच्या रेल्वे स्थानकात उंच पूल गैरसोयीचा असल्याने त्यांनी न्यायालयीन लढा देऊन या पुलावर रेल्वे प्रशासनाला सोईसाठी लिफ्ट बसविण्यास भाग पाडले. गांधीवाद, समाजवाद आणि पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी मोठा जनसंपर्क ठेवल्याने त्यांचा लोकसंग्रह दांडगा असल्याने उगलेकाका हे पत्रकारितेचे दीपस्तंभ होते. (प्रतिनिधी)