शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

कोरेगाव भीमा दंगल प्रकरण : गुन्हे मागे घेण्याची घोषणा हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 06:35 IST

कोरेगाव भीमा येथील दंगलीनंतर पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये राज्यभरात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील

पुणे : कोरेगाव भीमा येथील दंगलीनंतर पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये राज्यभरात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र, याबाबतचा कोणताही अध्यादेश मुख्यमंत्री अथवा गृह विभागाने अद्यापही काढलेला नाही. आम आदमी पक्षाच्या वतीने माहिती अधिकारात याबाबत माहिती विचारण्यात आली होती. त्यातूनच ही गंभीर बाब उघड झाली.मुख्यमंत्र्यांच्या या फसव्या घोषणेचा निषेध आम आदमी पार्टी व समविचारी संघटनांनी पुणे स्टेशन येथे नोंदविला. मुख्यमंत्र्यांनी याबाबतची तत्काळ योग्य कारवाई करावी. दिलेला शब्द पाळून कार्यकर्त्यांची या गुन्ह्यांतून मुक्तता करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून देण्यात आला.कोरेगाव भीमा येथील दंगलीनंतर ३ जानेवारी रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पाळण्यात आला होता. या बंदमध्ये अनेक सर्वसामान्य नागरिक व तरुणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. या युवकांना भविष्यात रोजगार व नोकरीवाचून वंचित राहावे लागणार आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे गुन्हे मागे घेण्यात येतील, असे सांगितले होते. मात्र पाच महिने उलटूनदेखील याबाबत कोणताही अध्यादेश मुख्यमंत्री अथवा गृह विभागाने काढलेला नाही.आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते गणेश ढमाले यांनी माहिती अधिकारात ही बाब उघड केली.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस