शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

के.के. बिर्ला फाउंडेशनचा यंदाचा 'सरस्वती सन्मान' साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 21:22 IST

"देशातल्या एखाद्या दलित लेखकाला कदाचित पहिल्यांदाच हा प्रतिष्ठित..."

पुणे : के के. बिर्ला फाऊंडेशनचा राष्ट्रीय स्तरावरील अत्यंतप्रतिष्ठेचा 2020 चा ‘सरस्वती सन्मान’ प्रसिद्ध साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘सनातन’ या कादंबरीस जाहीर झाला आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पंधरा लाख रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विजय तेंडूलकर यांच्या ‘कन्यादान’ (1983) आणि महेश एलकुंचवार यांच्या ‘युगान्त’ (2002) नंतर 19 वर्षांनी हा सन्मान एका मराठी लेखकाला मिळाल्याने भाषाप्रेमींसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. 

दरवर्षी के के. बिर्ला फाऊंडेशनच्या वतीने कविता, कादंबरी, नाटक,हास्य-व्यंग,ललित लेखन, आत्मकथा, समीक्षा आदी विविध प्रकारातील भारतीय भाषांमधील उत्कृष्ट कलाकृतींसाठी साहित्यिकांना ’’सरस्वती सन्मान प्रदान केला जातो. मात्र ,त्यासाठी लेखकाची कोणत्याही भाषेतील ही साहित्यकृती सन्मानाच्या दहा वर्षे आधीच्या कालावधीत प्रकाशित झालेली असावी असा निकषठेवण्यात आला आहे. या सन्मानाच्या निवडीसाठी समिती स्थापन करण्यात आली.त्यामध्ये समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष कश्यप (लोकसभा सचिवालयाचे माजी महासचिव, दिल्ली), गोविंद मिश्र (भोपाळ), प्रा.के सच्चिदानंदन (सिमला),डॉ. बुद्धधीनाथ मिश्र (डेहराडून), डॉ. किरण बुदकुले (गोवा), डॉ.सी.मृणालिनी (हैद्राबाद),डॉ. पारमिता सतपती त्रिपाठी (नवी दिल्ली), डॉ.सदानंद मोरे (पुणे), प्रा,ललित मंगोत्रा (जम्मू), दर्शन कुमार वैद(जम्मू), प्रियवत भरतिया (नवी दिल्ली), डॉ. सुरेश ॠतुपर्ण (नवी दिल्ली) यांचा समावेश होता.  मराठी वाडमयविश्वात डॉ. शरणकुमार लिंबाळे हे प्रतिभावंत कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. ’अक्करमाशी’ या त्यांच्या आत्मकथनाला मराठी साहित्यामध्ये महत्वाचे स्थान आहे. हे त्यांचे पुस्तक इतर भारतीय भाषांसह इंग्रजीमध्ये देखील भाषांतरित झाले आहे. त्यांच्या वैचारिक आणि परिवर्तनवादी लेखनाने दलित साहित्यात मोलाची भर घातली. ’गावकुसाबाहेरील कथा’, ‘झुंड’, दलित प्रेमकविता, दलित ब्राह्मण, दलित साहित्याचेसौंदर्यशास्त्र, शतकातील दलित विचार आदी त्यांची विविध 40 हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. नांद्डमध्ये 2011 साली झालेल्या 12 व्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन आणि भोसरीतील 2019 च्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.--------------------------------------------------------------------------------------------’देशातल्या एखाद्या दलित लेखकाला कदाचित पहिल्यांदाच हा प्रतिष्ठितपुरस्कार मिळत आहे. आजवर आम्ही केवळ म्हणत असू, की आम्हाला मोठे पुरस्कार मिळायला हवेत. पण पुरस्कार मिळत नव्हते. आम्ही 70 वर्षे लेखन केले. आज आपण देशाची 75 वर्षे साजरी करण्याच्या उंबरठ्यावर असताना एक पाहिलेलं सुंदर स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. भारतीय स्तरावर एक नवीन कलाकृती म्हणून या कादंबरीची दखल घेतली गेली आणि त्याचा सन्मान झाला याचा खूप आनंद होत आहे. दलित साहित्यात जीवनमूल्य आणि कलात्मकता आहे हे यातून सिद्ध झाले आहे. एका जीवनवादी साहित्याचा हा गौरव आहे. भीमा-कोरेगाव लढ्याला दोनशे वर्ष पूर्ण झाली. त्यापाशर््वभूमीवर ही ’सनातन’ कादंबरी लिहिली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी दलित-आदिवासींनी खूप मोठ्या प्रमाणावर संघर्ष केला. मात्र त्याची कुणीही दखल घेतली नाही. इतिहासात त्यांच्या योगदानाचा कुठेही गौरव झालेला नाही. त्यामुळे मी ‘सनातन’ मधून नवा इतिहास उभा केला आहे. दलिताच्या संघर्षाचा गौरवशाली इतिहास सांगणारी ही कादंबरी आहे- डॉ. शरणकुमार लिंबाळे, प्रसिद्ध साहित्यिक--------------------------------------

 

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्य