शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

किस्सा कुर्सी का: सुसंस्कृत विलासराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 15:08 IST

विलासराव देशमुख यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच झालेले. त्यामुळे पुणे शहराबद्दल त्यांना विलक्षण आत्मियता होती...

- राजू इनामदार

प्रचारसभेच्या एका भाषणात विलासराव देशमुख यांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा आधीच झाला हाेता. त्यानंतर महिनाभरातच ते खरोखर मुख्यमंत्री झाले. त्यानंतरचा त्यांचा पुण्यातील पहिलाच दौरा ठरला हाेता. विलासराव देशमुख यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच झालेले. त्यामुळे पुणे शहराबद्दल त्यांना विलक्षण आत्मियता होती. उल्हास पवार हे त्यांचे पुण्यातील जवळचे मित्र. त्यांनी पवार यांच्याकडे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुण्यात प्रथमच येताना आधी एका स्वातंत्र्यसैनिकाची भेट घ्यायची आहे, अशी इच्छा व्यक्त केली.

पहिली भेट स्वातंत्र्यसैनिकाची :

उल्हास पवार गप्पाजीरावांना म्हणाले की, “त्यावेळी पुण्यात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब भारदे हेच होते. विलासरावांना त्यांच्याकडे नेण्याचे ठरले. विमानतळावर उतरल्यावर लगेचच विलासरावांनी गाडी भारदे यांच्याकडे नेण्यास सांगितले. तिथे ते भारदे यांच्या पाया पडले. शाल, श्रीफळ देत त्यांचा सन्मान केला. भारदे म्हणजे जुन्या पिढीतील थोर राजकारणी. त्यांनी विलासरावांना राजकारणाचे असे काही पाठ पढवले की ऐकतच राहावे. ते सांगायचे म्हटले तर एक पुस्तक होईल. विलासराव शांतपणे सगळे ऐकून घेत होते.”

अन् विलासराव घरी आले :

भारदेंची भेट झाल्यावर विलासरावांनी सांगितले, ‘गाडी आता तुमच्या घराकडे घ्या.’ ‘मला काही कळेनाच.’ विलासरावांचे अनेक कार्यक्रम होते त्यादिवशी. तिकडे जाण्यास विलंब होत होता. विलासरावांचे आणि माझे तसे घरगुती संबंध होते. माझ्या आईला ते ओळखत. आईलाही ते माझे मित्र म्हणून माहिती होते. मुख्यमंत्र्यांनीच सांगितले म्हटल्यावर काही पर्यायच नव्हता. गाड्यांचा ताफा माझ्या घराकडे निघाला. घरी आल्या-आल्या विलासराव वाकून माझ्या आईच्या पाया पडले. तुमचा आशीर्वाद पाहिजे म्हणाले. त्यानंतर आईबरोबरही त्यांनी गप्पा मारल्या. माझ्या कुटुंबीयांची विचारपूस केली. स्वत:च्या घरात असावे तसेच विलासरावांचे वर्तन होते. माझे डोळे त्यांच्या त्या कृतीने पाणावले असे उल्हास पवार यांनी गप्पाजीरावांना सांगितले.

‘त्या’ पती-पत्नीच्या हातात हार दिला :

या दोन्ही गोष्टी केल्यानंतरच विलासरावांनी त्यादिवशी पुण्यातील बाकीचे कार्यक्रम केले. सायंकाळी अखेरचा कार्यक्रम होता संगीतकार, गायक सुधीर फडके यांच्या सत्काराचा. विलासराव अनेक गोष्टींची माहिती ठेवत. त्यांनी मला कार्यक्रमाला जातानाच दोन चांगले मोठे हार बरोबर ठेवायला सांगितले. कार्यक्रम सुरू झाला. विलासरावांचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल सत्कार वगैरे झाला. त्यानंतर त्यांनी मला ते दोन हार आणायला सांगितले. सुधीर फडके व त्यांच्या पत्नी यांना व्यासपीठावर बोलावले. एक हार सुधीर फडके यांच्या हातात दिला, दुसरा त्यांच्या पत्नीच्या. लग्नाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आता तुम्ही एकमेकांना हार घाला असे त्यांनी सांगितले. त्या एका कृतीने सगळे सभागृह विलासरावांनी जिंकले. फडके दाम्पत्य शब्दश: भारावून गेले.

संस्मरणीय कार्यक्रम :

कलावंत दाम्पत्याच्या लग्नाच्या वाढदिवसाची अशी माहिती ठेवणे, त्याबद्दल भर कार्यक्रमात नियोजन नसतानाही त्यांचा असा सत्कार करणे अशा गोष्टी विलासरावच करू जाणे. नंतरच्या भाषणात बाबूजींच्या पत्नीने त्यांच्या लग्नात महमंद रफी यांनी मंगलाष्टके म्हटली होती ही आठवण सांगितली. सगळा कार्यक्रमच विलासरावांच्या सुसंस्कृत वागण्याबोलण्यामुळे संस्मरणीय होऊन गेला.

- गप्पाजीराव

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड