शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

किस्सा कुर्सी का: ...त्यांचे बोंबिल भाजून फेकून देऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 15:02 IST

चारही उमेदवार फर्डे वक्ते होते. पुण्यात त्यावेळी भाषणांचा महोत्सवच रंगला होता...

- राजू इनामदार

प्रचारात, सभांमध्ये जातधर्म आदी उल्लेख करायला मनाई आहे. पूर्वीही होती, मात्र त्याचे पालन फारसे होत नव्हते. पुण्यातील १९६२ ची लोकसभानिवडणूक यासाठी गाजली होती. त्यावेळी याच मतदारसंघाचे खासदार असलेले ना. ग. गोरे प्रजा समाजवादी पक्षाचे, शंकरराव मोरे काँग्रेसचे, तर प्रख्यात साहित्यिक आचार्य अत्रे अपक्ष आणि ‘कर्नाटक सिंह’ म्हणून प्रसिद्ध असलेले जगन्नाथ जोशी जनसंघाचे असे चार तगडे उमेदवार या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढत होते. या दिग्गज उमेदवारांमुळे निवडणूक एकदम चुरशीची झाली होती.

चारही उमेदवार फर्डे वक्ते होते. पुण्यात त्यावेळी भाषणांचा महोत्सवच रंगला होता. अत्रेंच्या सभा म्हणजे हशा आणि टाळ्या. मोरे प्राध्यापकी पेशाचे, गोरे मुद्देसूद मांडणी करणारे, तर जोशी गर्जना करणारे. डोके तालमीजवळ मोरे यांची एक सभा झाली. त्यापूर्वी अत्रे, जोशी, गोरे यांच्याकडून त्यांच्या त्यांच्या सभांमध्ये थोडे टवाळखोर असे बोलले जात असते. त्यामुळे काँग्रेसच्या लोकांना भीती वाटत होती की, ‘मोरे मागे पडतात की काय?’ ते सारखे मोरे यांच्या मागे लागत, ‘तुम्हीही बोला काही तरी, बोला काही तरी!’ तर त्या सभेत मोरे बोलता बोलता बोलून गेले. “आम्ही पळी पंचपात्रवाल्यांचे बोबिंल भाजून फेकून देऊ!” मराठीमधील हे नेहमीच्या वापरातील साधे वाक्य! पण ते निवडणुकीच्या प्रचारसभेत वापरले.

झाले! सगळीकडे आरडाओरड सुरू झाली. जातीयवादी बोलले, असे बोलणे शोभते का? हा आचारसंहितेचा भंग आहे वगैरे वगैरे. सगळीकडे बातम्यांमध्ये हेच वाक्य छापून आले. निषेध वगैरे काय काय सुरू झाले. काँग्रेसवाले परत घाबरले. मोरेंना म्हणाले, “दिलगिरी व्यक्त करा. खेद व्यक्त करा.” मोरे म्हणाले, “पडलो तरी बेहत्तर, पण दिलगिरी वगैरे व्यक्त करणार नाही.”

उलट झाले असे की बहुजन समाजात मोरे यांचे हे वाक्य भलतेच प्रसिद्ध झाले. ना. ग. गोरे म्हणजे सिटिंग मेंबरला पाडून चांगली ५० हजार मतांची आघाडी घेऊन निवडून आले. हे मोरे फार विद्वान होते. संसदेमध्ये त्यांचे भाषण आहे, असे समजले तर स्वत: पंडित नेहरू ते ऐकण्यासाठी म्हणून आधीच येऊन बसत असत. मोरे यांनी नंतर ‘पार्लमेंटरी डेमोक्रसी इन इंडिया, प्रॅक्टिस अँड प्रोसिजर’ हा तब्बल एक हजार पृष्ठांचा इंग्रजी ग्रंथ लिहिला. त्याला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रस्तावना आहे. ग्रंथाच्या प्रकाशनासाठी म्हणून स्वत: पंडित नेहरू खास दिल्लीहून मुंबईत आले होते.

पुण्याच्याच नाही तर राज्याच्या राजकारणाचा विकीपीडिया असलेल्या उल्हास पवार यांनी हे सांगितले, त्यावेळी गप्पाजीरावांच्या एक गोष्ट पटकन लक्षात आली की, ‘फार मोठ्या मोठ्या, विद्वान, थोर व्यक्ती पुणेकरांनी खासदार म्हणून निवडून दिल्या आहेत.’

- गप्पाजीराव

टॅग्स :Puneपुणेlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक