शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

Killari Earthquake: साहेबांच्या शब्दावर तीन दिवसांत पोहोचविले १०० ट्रक वासे आणि पत्रे : विठ्ठल मणियार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 02:30 IST

किल्लारी येथे झालेल्या भूकंपाला रविवारी २५ वर्षे होत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे पहाटेच तेथे पोहोचले होते़ त्या वेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कसे असावे, याचा जो धडा दिला तो आजही आमच्या लक्षात आहे

पुणे : किल्लारी येथे झालेल्या भूकंपाला रविवारी २५ वर्षे होत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे पहाटेच तेथे पोहोचले होते़ त्या वेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कसे असावे, याचा जो धडा दिला तो आजही आमच्या लक्षात आहे़ ३० सप्टेंबरला रात्री भूकंप झाला़ त्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार यांचा सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास फोन आला त्यांनी सांगितले, तुझी व्यापारी पेठांमध्ये ओळख आहे. टिंबर मार्केटमध्ये जाऊन तेथील व्यापाºयांकडून जेवढे वासे, पत्रे मिळतील, ते सर्व घेऊन इकडे पाठवून दे, या सर्वांचे पेमेंट ७ दिवसांत तुम्हाला मिळेल, असे सांगून त्यांच्याकडून बिले घेऊन मला पाठव, असे सांगून त्यांनी हा माल कोठे पाठवायचा त्याचा पत्ता दिला़ मी तातडीने टिंबर मार्केटमध्ये गेलो़ व्यापाºयांना सांगितले़ त्यानुसार पुढच्या तीन दिवसांत १०० ट्रक वासे, पत्रे व ते बांधण्यासाठी लागणारे खिळे, काथ्या असे सर्व साहित्य तेथील जिल्हाधिकाºयांकडे पाठवून दिले़

संपूर्ण राज्यातून आणि देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला होता़ ही मदत स्वीकारण्यासाठी काही सेंटर तयार केले होते़ त्यानंतर एक दिवस साहेब मुंबईला जाताना पुण्यात काही वेळ थांबले होते़ त्यांच्याकडे पाठविलेली बिले मंत्रालयातील अधिकारी तपासून १० दिवसांत बिलांनुसार सर्व व्यापाºयांच्या नावाने धनादेश तयार करुन माझ्याकडे सोपविण्यात आले़ मी ते व्यापाºयांना दिले़ शासकीय काम करताना जाहरिात द्या, टेंडर काढा व त्यानंतर ते मागवा, या सर्व गोष्टींना त्यांनी तातडीची गरज म्हणून फाटा देऊन लोकांना लवकरात लवकर कशी सोय उपलब्ध करुन देता येईल, हे पाहिले़ व्यापाºयांनीही भूकंपाची माहिती होती़ त्यांना मी सांगितले की बिलाबद्दल साहेबांच्या वतीने मी शब्द देत आहे़ अशा वेळी तुम्ही फार नफा घेऊ नका, असे आवाहन केले़ व्यापाºयांनीही त्यांना झालेला खर्च घेऊन कोणताही नफा न घेता साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून तातडीने माल पुरविला़गुजरातमध्ये जेव्हा भूकंप झाला तसेच विरोधकात असतानाही पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आपत्ती व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्षपद साहेबांना दिले होते़भूकंपात घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती़ अशा घरांत लोक राहायला घाबरत होतेच त्याशिवाय ते धोकादायकही होते़ त्यामुळे या सर्वांची तातडीने किमान निवाºयाची व्यवस्था करणे आवश्यक होते, हे ओळखून साहेबांनी पुण्यातून हे साहित्य तातडीने मागवून घेतले़ मला शक्य होते, तेवढे मी केले़ त्यानंतर दोन तीन दिवसांनी मी स्वत: तेथे गेलो तेव्हा साहेबांनी मला सांगून जसे वासे व पत्रे मागवून घेतले होते तसेच इतरांना सांगून निवारा तयार करण्यासाठी कारागिरांना बोलवून घेतले होते़ पुढच्या ७ दिवसांतच सर्वांना तात्पुरता होईना निवारा उपलब्ध झाला होता़ - विठ्ठल मणियार

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपPuneपुणे