शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

Killari Earthquake: साहेबांच्या शब्दावर तीन दिवसांत पोहोचविले १०० ट्रक वासे आणि पत्रे : विठ्ठल मणियार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 02:30 IST

किल्लारी येथे झालेल्या भूकंपाला रविवारी २५ वर्षे होत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे पहाटेच तेथे पोहोचले होते़ त्या वेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कसे असावे, याचा जो धडा दिला तो आजही आमच्या लक्षात आहे

पुणे : किल्लारी येथे झालेल्या भूकंपाला रविवारी २५ वर्षे होत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे पहाटेच तेथे पोहोचले होते़ त्या वेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कसे असावे, याचा जो धडा दिला तो आजही आमच्या लक्षात आहे़ ३० सप्टेंबरला रात्री भूकंप झाला़ त्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार यांचा सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास फोन आला त्यांनी सांगितले, तुझी व्यापारी पेठांमध्ये ओळख आहे. टिंबर मार्केटमध्ये जाऊन तेथील व्यापाºयांकडून जेवढे वासे, पत्रे मिळतील, ते सर्व घेऊन इकडे पाठवून दे, या सर्वांचे पेमेंट ७ दिवसांत तुम्हाला मिळेल, असे सांगून त्यांच्याकडून बिले घेऊन मला पाठव, असे सांगून त्यांनी हा माल कोठे पाठवायचा त्याचा पत्ता दिला़ मी तातडीने टिंबर मार्केटमध्ये गेलो़ व्यापाºयांना सांगितले़ त्यानुसार पुढच्या तीन दिवसांत १०० ट्रक वासे, पत्रे व ते बांधण्यासाठी लागणारे खिळे, काथ्या असे सर्व साहित्य तेथील जिल्हाधिकाºयांकडे पाठवून दिले़

संपूर्ण राज्यातून आणि देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला होता़ ही मदत स्वीकारण्यासाठी काही सेंटर तयार केले होते़ त्यानंतर एक दिवस साहेब मुंबईला जाताना पुण्यात काही वेळ थांबले होते़ त्यांच्याकडे पाठविलेली बिले मंत्रालयातील अधिकारी तपासून १० दिवसांत बिलांनुसार सर्व व्यापाºयांच्या नावाने धनादेश तयार करुन माझ्याकडे सोपविण्यात आले़ मी ते व्यापाºयांना दिले़ शासकीय काम करताना जाहरिात द्या, टेंडर काढा व त्यानंतर ते मागवा, या सर्व गोष्टींना त्यांनी तातडीची गरज म्हणून फाटा देऊन लोकांना लवकरात लवकर कशी सोय उपलब्ध करुन देता येईल, हे पाहिले़ व्यापाºयांनीही भूकंपाची माहिती होती़ त्यांना मी सांगितले की बिलाबद्दल साहेबांच्या वतीने मी शब्द देत आहे़ अशा वेळी तुम्ही फार नफा घेऊ नका, असे आवाहन केले़ व्यापाºयांनीही त्यांना झालेला खर्च घेऊन कोणताही नफा न घेता साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून तातडीने माल पुरविला़गुजरातमध्ये जेव्हा भूकंप झाला तसेच विरोधकात असतानाही पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आपत्ती व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्षपद साहेबांना दिले होते़भूकंपात घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती़ अशा घरांत लोक राहायला घाबरत होतेच त्याशिवाय ते धोकादायकही होते़ त्यामुळे या सर्वांची तातडीने किमान निवाºयाची व्यवस्था करणे आवश्यक होते, हे ओळखून साहेबांनी पुण्यातून हे साहित्य तातडीने मागवून घेतले़ मला शक्य होते, तेवढे मी केले़ त्यानंतर दोन तीन दिवसांनी मी स्वत: तेथे गेलो तेव्हा साहेबांनी मला सांगून जसे वासे व पत्रे मागवून घेतले होते तसेच इतरांना सांगून निवारा तयार करण्यासाठी कारागिरांना बोलवून घेतले होते़ पुढच्या ७ दिवसांतच सर्वांना तात्पुरता होईना निवारा उपलब्ध झाला होता़ - विठ्ठल मणियार

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपPuneपुणे