शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

Killari Earthquake: साहेबांच्या शब्दावर तीन दिवसांत पोहोचविले १०० ट्रक वासे आणि पत्रे : विठ्ठल मणियार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 02:30 IST

किल्लारी येथे झालेल्या भूकंपाला रविवारी २५ वर्षे होत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे पहाटेच तेथे पोहोचले होते़ त्या वेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कसे असावे, याचा जो धडा दिला तो आजही आमच्या लक्षात आहे

पुणे : किल्लारी येथे झालेल्या भूकंपाला रविवारी २५ वर्षे होत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे पहाटेच तेथे पोहोचले होते़ त्या वेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कसे असावे, याचा जो धडा दिला तो आजही आमच्या लक्षात आहे़ ३० सप्टेंबरला रात्री भूकंप झाला़ त्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार यांचा सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास फोन आला त्यांनी सांगितले, तुझी व्यापारी पेठांमध्ये ओळख आहे. टिंबर मार्केटमध्ये जाऊन तेथील व्यापाºयांकडून जेवढे वासे, पत्रे मिळतील, ते सर्व घेऊन इकडे पाठवून दे, या सर्वांचे पेमेंट ७ दिवसांत तुम्हाला मिळेल, असे सांगून त्यांच्याकडून बिले घेऊन मला पाठव, असे सांगून त्यांनी हा माल कोठे पाठवायचा त्याचा पत्ता दिला़ मी तातडीने टिंबर मार्केटमध्ये गेलो़ व्यापाºयांना सांगितले़ त्यानुसार पुढच्या तीन दिवसांत १०० ट्रक वासे, पत्रे व ते बांधण्यासाठी लागणारे खिळे, काथ्या असे सर्व साहित्य तेथील जिल्हाधिकाºयांकडे पाठवून दिले़

संपूर्ण राज्यातून आणि देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला होता़ ही मदत स्वीकारण्यासाठी काही सेंटर तयार केले होते़ त्यानंतर एक दिवस साहेब मुंबईला जाताना पुण्यात काही वेळ थांबले होते़ त्यांच्याकडे पाठविलेली बिले मंत्रालयातील अधिकारी तपासून १० दिवसांत बिलांनुसार सर्व व्यापाºयांच्या नावाने धनादेश तयार करुन माझ्याकडे सोपविण्यात आले़ मी ते व्यापाºयांना दिले़ शासकीय काम करताना जाहरिात द्या, टेंडर काढा व त्यानंतर ते मागवा, या सर्व गोष्टींना त्यांनी तातडीची गरज म्हणून फाटा देऊन लोकांना लवकरात लवकर कशी सोय उपलब्ध करुन देता येईल, हे पाहिले़ व्यापाºयांनीही भूकंपाची माहिती होती़ त्यांना मी सांगितले की बिलाबद्दल साहेबांच्या वतीने मी शब्द देत आहे़ अशा वेळी तुम्ही फार नफा घेऊ नका, असे आवाहन केले़ व्यापाºयांनीही त्यांना झालेला खर्च घेऊन कोणताही नफा न घेता साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून तातडीने माल पुरविला़गुजरातमध्ये जेव्हा भूकंप झाला तसेच विरोधकात असतानाही पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आपत्ती व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्षपद साहेबांना दिले होते़भूकंपात घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती़ अशा घरांत लोक राहायला घाबरत होतेच त्याशिवाय ते धोकादायकही होते़ त्यामुळे या सर्वांची तातडीने किमान निवाºयाची व्यवस्था करणे आवश्यक होते, हे ओळखून साहेबांनी पुण्यातून हे साहित्य तातडीने मागवून घेतले़ मला शक्य होते, तेवढे मी केले़ त्यानंतर दोन तीन दिवसांनी मी स्वत: तेथे गेलो तेव्हा साहेबांनी मला सांगून जसे वासे व पत्रे मागवून घेतले होते तसेच इतरांना सांगून निवारा तयार करण्यासाठी कारागिरांना बोलवून घेतले होते़ पुढच्या ७ दिवसांतच सर्वांना तात्पुरता होईना निवारा उपलब्ध झाला होता़ - विठ्ठल मणियार

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपPuneपुणे