शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मतदार नोंदणी अभियानात खेड तालुका राज्यात एक नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 00:49 IST

मतदार नोंदणी अभियानामध्ये खेड तालुका राज्यात अव्वल असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

दावडी : मतदार नोंदणी अभियानामध्ये खेड तालुका राज्यात अव्वल असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत मतदार मतदानापासून वंचित राहू नये, तालुक्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान व्हावे, यासाठी तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्यात आली असून मतदार यादी अद्ययावत करून मतदाराना आवश्यक सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.निवडणूक प्रक्रिया सुलभ होण्यासाठी या वर्षापासून ‘निवडणूक मित्र’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. निवडणुकीच्या वेळी या मित्रांचे मोठे योगदान लाभणार आहे. यामध्ये राजकीय व्यक्ती सोडून अनेकांना काम करण्याची संधी देण्यात येणार असून, मतदान केंद्र व मतदार यांना त्यांच्या माध्यमातून आवश्यक सेवासुविधा पुरविण्यात येणार आहेत. बूथ केंद्रावर पुरुषांच्या बरोबरीने महिलांना संधी देण्यात येणार आहे. ही यादी आतापर्यंत केवळ शिवसेनेच्या वतीने देण्यात आली असून, अद्याप इतर पक्षांनी जमा केलेली नसल्याचे प्रसाद यांनी सांगितले.. येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांना आवश्यक अशा सुविधा, सेवा पुरविणे, मतदान केंद्रांवर सेवासुविधा उपलब्ध करून देणे, महिला मतदारसंख्या वाढविणे, मतदानाला प्रवृत्त करणे, त्यांच्या अडचणी सोडविणे, नोकरी, शिक्षण, लग्न आदी कारणास्तव राहत्या ठिकाणाहून बाहेरगावी गेलेल्या व तालुक्यात आलेल्या मतदारांची नोंदणी करून घेण्यात आली आहे. याबरोबरच मतदान केंद्रावर जाण्या-येण्यातील अडथळे दूर केले जाणार आहेत. सन १९९९-२००१ दरम्यान मतदार यादीची खात्री करून मिसिंग लिस्ट तपासण्यात येईल. बीएलओकडून ही कामे करून घेण्यात येत आहेत.ग्रामपातळीवर विविध समित्या तयार करून त्याद्वारे निवडणुकीचे कामकाज केले जाणार आहे. २०१५ ते २०१८मध्ये नव्याने मतदार झालेल्या मतदारांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. खेड तालुक्यात शासकीय आकडेवारीनुसार ४२३ दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यांना मतदानादरम्यान आवश्यक सेवा देण्यात येणार आहेत. १ जानेवारी १९४४च्या अगोदर जन्मलेल्या व्यक्तीची भेट घेण्यात येणार आहे. त्या हयात आहेत की नाही, याची खात्री करूनघेण्यात येईल.याबरोबरच त्या मतदानासाठी येण्यास आरोग्यदृष्ट्या ठीक आहेत का, हे पाहिले जाणार आहे. मार्च २०१९ ते जून १९ या काळात गर्भवती महिलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वांच्या सर्वेक्षणातून त्यांना मतदान करण्याच्या दिवशी सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे या वर्षी मतदानाची आकडेवारी वाढेल. गेल्या तीन महिन्यांत मतदार नोंदणी अभियानातून ९ हजार मतदारसंख्या वाढली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक