शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

खोरला पोहोचले पुरंदर उपसाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 02:29 IST

डोंबेवाडी तलावातील पाण्याचे पूजन; पुरंदर योजनेतून दौंड जिरायत भागाला पाणी देण्याची मागणी

खोर : अनेक दिवसांपासून पुरंदर योजनेतून दौंड तालुक्याच्या जिरायत भागाला पाणी देण्यात यावे, अशी मागणी होती. यानुसार आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांतून पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून खोर (ता. दौंड) येथील डोंबेवाडी तलावत पाणी सोडण्यात आले असून, त्याचे जलपूजन आमदार कुल यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी आमदार कुल म्हणाले, की आपण पाण्यासंदर्भात उशिरा मागणी करीत असतो. त्यामुळे सिंचन योजनेचे पाणी बंद व्हायला आणि तुम्ही पाणी मागायला एकच वेळ होत असते. त्यामुळे खोर परिसरातील तलाव पूर्ण भरू जात नाहीत व देऊळगावगाडा व खालील भागाला या पाण्याचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे येथून पुढे पाण्याची मागणी शेतकऱ्यांनी मे महिन्यामध्ये करावी व त्यानुसार पाण्याचे नियोजन होऊन पाणी वेळेवर सुटून या भागामधील सर्वच गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. शासन शेतकरीवर्गाच्या पाठीशी उभे असून त्याचा फायदा शेतकरी बांधवांनी घ्यावा. असे आवाहन कुल यांनी केले.या वेळी ग्रामस्थांनी अजून एक आवर्तन पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून डोंबेवाडी तलावात दिवाळी झाल्यानंतर सोडण्याची मागणी केली आहे. यावर कुल म्हणाले, मलादेखील पाण्याचा अंदाज येत नाही. कारण सध्या पाऊसच झाला नसल्याने सर्वच ठिकाणची पाण्याची पातळी खालावली आहे. मात्र माझी अजून एक आवर्तन सोडण्याच्या बाबतीत सिंचन विभागाच्या अधिकारी वर्गाबरोबर मीटिंग चालू असून लवकरच दुसरे आवर्तन सोडण्यास प्रयत्नशील राहणार आहे.|या प्रसंगी सरपंच सुभाष चौधरी, दिलीप डोंबे, विजय कुदळे, मधुकर चव्हाण, भानुदास डोंबे, गणेश साळुंंखे, जालिंंदर डोंबे, पांडुरंग डोंबे, शिवाजी पिसे, पोपट चौधरी, राहुल चौधरी, शिवाजी चौधरी, सुहास चौधरी, हनुमंत चौधरी, राजेंद्र डोंबे, विकास चौधरी, मेहबूब पठाण, तानाजी डोंबे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थितीत होते.दौंड तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती आहे. या भागामधील ग्रामस्थांनी आमदार कुल यांच्याकडे पुरंदर जलसिंचन उपास योजेनेतून पाणी डोंबेवाडी तालावात सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार कुल यांनी स्थानिक नागरिक व सरपंच यांना विचारात घेऊन पुणे-मुंबई येथील सिंचन भवनावर सिंचन योजनेचे अधिकारी व प्रशासन, शासन यांच्यासोबत बैठक घेतली.सर्वप्रथम डोंबेवाडी तलाव हा पुरंदर सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये घेतला. त्यानंतर ही सर्व प्रक्रिया एक महिन्याच्या आत पूर्ण करून जवळपास एक आठवडा डोंबेवाडी तलावामध्ये पाणी सोडण्यात आले असल्याने खोर ग्रामस्थांनी कुल यांचे अभिनंदन व पाणीप्रश्न सुटल्याने समाधान व्यक्त केले.जिरायती भागाकडे माझे संपूर्ण लक्ष असून या भागातील शेतकरीवर्गाच्या अडीअडचणी सोडविण्यासंदर्भात मी कायमस्वरूपी कटिबद्ध राहीन. तुम्हीसुद्धा कुठल्याही प्रकारचे गटातटाचे राजकारण न करता पाण्याच्या संदर्भामध्ये एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. येथून मागील काळात शेतकºयांना ५० टक्के रक्कम भरावी लागत होती; परंतु आता १९ टक्केच रक्कम भरावी लागणार असून बाकीची रक्कम शासन भरणार आहे. त्यामुळे पाणी आणणे ही काय कठीण बाब नाही, असे कुल म्हणाले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई