शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
3
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
4
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
5
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
6
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
7
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
8
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
9
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
10
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
11
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
12
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
13
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
14
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
15
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
16
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
17
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
18
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
19
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
20
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!

खोरला पोहोचले पुरंदर उपसाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 02:29 IST

डोंबेवाडी तलावातील पाण्याचे पूजन; पुरंदर योजनेतून दौंड जिरायत भागाला पाणी देण्याची मागणी

खोर : अनेक दिवसांपासून पुरंदर योजनेतून दौंड तालुक्याच्या जिरायत भागाला पाणी देण्यात यावे, अशी मागणी होती. यानुसार आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांतून पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून खोर (ता. दौंड) येथील डोंबेवाडी तलावत पाणी सोडण्यात आले असून, त्याचे जलपूजन आमदार कुल यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी आमदार कुल म्हणाले, की आपण पाण्यासंदर्भात उशिरा मागणी करीत असतो. त्यामुळे सिंचन योजनेचे पाणी बंद व्हायला आणि तुम्ही पाणी मागायला एकच वेळ होत असते. त्यामुळे खोर परिसरातील तलाव पूर्ण भरू जात नाहीत व देऊळगावगाडा व खालील भागाला या पाण्याचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे येथून पुढे पाण्याची मागणी शेतकऱ्यांनी मे महिन्यामध्ये करावी व त्यानुसार पाण्याचे नियोजन होऊन पाणी वेळेवर सुटून या भागामधील सर्वच गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. शासन शेतकरीवर्गाच्या पाठीशी उभे असून त्याचा फायदा शेतकरी बांधवांनी घ्यावा. असे आवाहन कुल यांनी केले.या वेळी ग्रामस्थांनी अजून एक आवर्तन पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून डोंबेवाडी तलावात दिवाळी झाल्यानंतर सोडण्याची मागणी केली आहे. यावर कुल म्हणाले, मलादेखील पाण्याचा अंदाज येत नाही. कारण सध्या पाऊसच झाला नसल्याने सर्वच ठिकाणची पाण्याची पातळी खालावली आहे. मात्र माझी अजून एक आवर्तन सोडण्याच्या बाबतीत सिंचन विभागाच्या अधिकारी वर्गाबरोबर मीटिंग चालू असून लवकरच दुसरे आवर्तन सोडण्यास प्रयत्नशील राहणार आहे.|या प्रसंगी सरपंच सुभाष चौधरी, दिलीप डोंबे, विजय कुदळे, मधुकर चव्हाण, भानुदास डोंबे, गणेश साळुंंखे, जालिंंदर डोंबे, पांडुरंग डोंबे, शिवाजी पिसे, पोपट चौधरी, राहुल चौधरी, शिवाजी चौधरी, सुहास चौधरी, हनुमंत चौधरी, राजेंद्र डोंबे, विकास चौधरी, मेहबूब पठाण, तानाजी डोंबे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थितीत होते.दौंड तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती आहे. या भागामधील ग्रामस्थांनी आमदार कुल यांच्याकडे पुरंदर जलसिंचन उपास योजेनेतून पाणी डोंबेवाडी तालावात सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार कुल यांनी स्थानिक नागरिक व सरपंच यांना विचारात घेऊन पुणे-मुंबई येथील सिंचन भवनावर सिंचन योजनेचे अधिकारी व प्रशासन, शासन यांच्यासोबत बैठक घेतली.सर्वप्रथम डोंबेवाडी तलाव हा पुरंदर सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये घेतला. त्यानंतर ही सर्व प्रक्रिया एक महिन्याच्या आत पूर्ण करून जवळपास एक आठवडा डोंबेवाडी तलावामध्ये पाणी सोडण्यात आले असल्याने खोर ग्रामस्थांनी कुल यांचे अभिनंदन व पाणीप्रश्न सुटल्याने समाधान व्यक्त केले.जिरायती भागाकडे माझे संपूर्ण लक्ष असून या भागातील शेतकरीवर्गाच्या अडीअडचणी सोडविण्यासंदर्भात मी कायमस्वरूपी कटिबद्ध राहीन. तुम्हीसुद्धा कुठल्याही प्रकारचे गटातटाचे राजकारण न करता पाण्याच्या संदर्भामध्ये एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. येथून मागील काळात शेतकºयांना ५० टक्के रक्कम भरावी लागत होती; परंतु आता १९ टक्केच रक्कम भरावी लागणार असून बाकीची रक्कम शासन भरणार आहे. त्यामुळे पाणी आणणे ही काय कठीण बाब नाही, असे कुल म्हणाले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई