शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खोरला पोहोचले पुरंदर उपसाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 02:29 IST

डोंबेवाडी तलावातील पाण्याचे पूजन; पुरंदर योजनेतून दौंड जिरायत भागाला पाणी देण्याची मागणी

खोर : अनेक दिवसांपासून पुरंदर योजनेतून दौंड तालुक्याच्या जिरायत भागाला पाणी देण्यात यावे, अशी मागणी होती. यानुसार आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांतून पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून खोर (ता. दौंड) येथील डोंबेवाडी तलावत पाणी सोडण्यात आले असून, त्याचे जलपूजन आमदार कुल यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी आमदार कुल म्हणाले, की आपण पाण्यासंदर्भात उशिरा मागणी करीत असतो. त्यामुळे सिंचन योजनेचे पाणी बंद व्हायला आणि तुम्ही पाणी मागायला एकच वेळ होत असते. त्यामुळे खोर परिसरातील तलाव पूर्ण भरू जात नाहीत व देऊळगावगाडा व खालील भागाला या पाण्याचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे येथून पुढे पाण्याची मागणी शेतकऱ्यांनी मे महिन्यामध्ये करावी व त्यानुसार पाण्याचे नियोजन होऊन पाणी वेळेवर सुटून या भागामधील सर्वच गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. शासन शेतकरीवर्गाच्या पाठीशी उभे असून त्याचा फायदा शेतकरी बांधवांनी घ्यावा. असे आवाहन कुल यांनी केले.या वेळी ग्रामस्थांनी अजून एक आवर्तन पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून डोंबेवाडी तलावात दिवाळी झाल्यानंतर सोडण्याची मागणी केली आहे. यावर कुल म्हणाले, मलादेखील पाण्याचा अंदाज येत नाही. कारण सध्या पाऊसच झाला नसल्याने सर्वच ठिकाणची पाण्याची पातळी खालावली आहे. मात्र माझी अजून एक आवर्तन सोडण्याच्या बाबतीत सिंचन विभागाच्या अधिकारी वर्गाबरोबर मीटिंग चालू असून लवकरच दुसरे आवर्तन सोडण्यास प्रयत्नशील राहणार आहे.|या प्रसंगी सरपंच सुभाष चौधरी, दिलीप डोंबे, विजय कुदळे, मधुकर चव्हाण, भानुदास डोंबे, गणेश साळुंंखे, जालिंंदर डोंबे, पांडुरंग डोंबे, शिवाजी पिसे, पोपट चौधरी, राहुल चौधरी, शिवाजी चौधरी, सुहास चौधरी, हनुमंत चौधरी, राजेंद्र डोंबे, विकास चौधरी, मेहबूब पठाण, तानाजी डोंबे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थितीत होते.दौंड तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती आहे. या भागामधील ग्रामस्थांनी आमदार कुल यांच्याकडे पुरंदर जलसिंचन उपास योजेनेतून पाणी डोंबेवाडी तालावात सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार कुल यांनी स्थानिक नागरिक व सरपंच यांना विचारात घेऊन पुणे-मुंबई येथील सिंचन भवनावर सिंचन योजनेचे अधिकारी व प्रशासन, शासन यांच्यासोबत बैठक घेतली.सर्वप्रथम डोंबेवाडी तलाव हा पुरंदर सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये घेतला. त्यानंतर ही सर्व प्रक्रिया एक महिन्याच्या आत पूर्ण करून जवळपास एक आठवडा डोंबेवाडी तलावामध्ये पाणी सोडण्यात आले असल्याने खोर ग्रामस्थांनी कुल यांचे अभिनंदन व पाणीप्रश्न सुटल्याने समाधान व्यक्त केले.जिरायती भागाकडे माझे संपूर्ण लक्ष असून या भागातील शेतकरीवर्गाच्या अडीअडचणी सोडविण्यासंदर्भात मी कायमस्वरूपी कटिबद्ध राहीन. तुम्हीसुद्धा कुठल्याही प्रकारचे गटातटाचे राजकारण न करता पाण्याच्या संदर्भामध्ये एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. येथून मागील काळात शेतकºयांना ५० टक्के रक्कम भरावी लागत होती; परंतु आता १९ टक्केच रक्कम भरावी लागणार असून बाकीची रक्कम शासन भरणार आहे. त्यामुळे पाणी आणणे ही काय कठीण बाब नाही, असे कुल म्हणाले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई