शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

पावसाअभावी खरिपाच्या पिकांना धोका; शेतकऱ्यांना चिंतेने वेढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 06:32 IST

सोयाबीन, बटाटा पिकांचे उत्पादन घटण्याची निर्माण झाली शक्यता

दावडी : पावसाने गेल्या पंधरवड्यापासून दडी मारल्याने खरिपाच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. खेड तालुक्याच्या भागातील पिके कडक उन्हामुळे अक्षरश: होरपळून निघत आहेत. सोयाबीन, बटाटा या पिकांचे उत्पादन पावसाअभावी घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिसरातील बळीराजा पावसाची वाट पाहत आहे.खेड तालुक्याच्या पूर्व भागात यंदा म्हणावा असा पाऊस पडला नाही. ज्या शेतकºयांनी जून महिन्यात पाऊस पडताच बटाटा व सोयाबीन व इतर पिकांची पेरणी केली होती. त्या शेतकºयांनी पिकांची काढणी करून रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतीची मशागत केल्याचे दिसत आहे. मात्र, ज्या शेतकºयांनी पिकांच्या उशिरा पेरण्या केल्या आहेत. त्या पिकांना पावसाची अत्यंत गरज आहे. बटाटा शेतात पाऊस नसल्याने जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे बटाटा जमिनीत फुगण्यास वाव मिळत नाही. अर्थात बटाट्यांची वाढ खुंटली आहे.कडक उन्हामुळे पिकांनी माना टाकल्या आहे. निम्मा पावसाळा संपत आला असताना अजून जोरदार पाऊस झालाच नाही. त्यामुळे विहीर, नाले कोरडे आहेत. याशिवाय खरिपाबरोबरच आगामी रब्बी हंगाम सध्या तरी धोक्यात आला असल्याचे चित्र दिसत आहे. खेडच्या पश्चिम भागात काही भागात जोरदार पाऊस झाला असताना तालुक्यातील पूर्व भागात कमी प्रमाणात पाऊस झाला.धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे भीमा नदीला थोडेफार पाणी येत आहे. मात्र, या पाण्याचा फायदा नदीकाठच्या गावांना होईल. इतर गावांतील शेतकºयांची चिंता कायम आहे. पावसाळ्याच्या उरलेल्या दिवसात पाऊस झाला नाही तर आगामी काळात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकºयांसह सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.रब्बीची चाहूल लागली आहे आणि आता रब्बीच नियोजन कसे करावे, यासाठी बळीराजाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आणखी काही दिवस पाऊस लांबणीवर पडल्यास रब्बी हंगामातील पेरण्या लांबणार असून, परिणामी उत्पादनही घटणार असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.दुष्काळाचे पसरले सावटवाल्हे : परिसरात पंधरा दिवस होऊन गेले पाऊस पूर्ण थांबला असून त्यामुळे शेतकºयाचा खरीब हंगाम धोक्यात आला आहे. पावसाळा चालू होऊन तीन महिने झाले जून, जुलै, आॅगस्ट संपला सप्टेंबर निम्मा झाला तरी जोराचा पाऊस झाला नाही. त्यामुळे चालू हंगाम जाण्याची शक्यता आहे.या परिसरात दुष्काळाचे सावट दिसू लागले आहे. आठ दिवसांपासून कडक ऊन पडत आहे. त्यामुळे शेतकºयाची चिंता वाढली आहे. पाऊस पडला नाही तर पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या वाल्हे परिसरातील सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडवाडी, बाळाजीचीवाडी, बहिर्जीचीवाडी या ठिकाणचा खरीब हंगाम पाऊस नसल्यामुळे वाया गेला आहे.त्यातूनही वाल्हे पश्चिमेकडील परिस्थिती बरी होती. पण उन्हाळ्यासारखे ऊन पडत असल्यामुळे जिरायत भागातील खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी