शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

पावसाअभावी खरिपाच्या पिकांना धोका; शेतकऱ्यांना चिंतेने वेढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 06:32 IST

सोयाबीन, बटाटा पिकांचे उत्पादन घटण्याची निर्माण झाली शक्यता

दावडी : पावसाने गेल्या पंधरवड्यापासून दडी मारल्याने खरिपाच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. खेड तालुक्याच्या भागातील पिके कडक उन्हामुळे अक्षरश: होरपळून निघत आहेत. सोयाबीन, बटाटा या पिकांचे उत्पादन पावसाअभावी घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिसरातील बळीराजा पावसाची वाट पाहत आहे.खेड तालुक्याच्या पूर्व भागात यंदा म्हणावा असा पाऊस पडला नाही. ज्या शेतकºयांनी जून महिन्यात पाऊस पडताच बटाटा व सोयाबीन व इतर पिकांची पेरणी केली होती. त्या शेतकºयांनी पिकांची काढणी करून रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतीची मशागत केल्याचे दिसत आहे. मात्र, ज्या शेतकºयांनी पिकांच्या उशिरा पेरण्या केल्या आहेत. त्या पिकांना पावसाची अत्यंत गरज आहे. बटाटा शेतात पाऊस नसल्याने जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे बटाटा जमिनीत फुगण्यास वाव मिळत नाही. अर्थात बटाट्यांची वाढ खुंटली आहे.कडक उन्हामुळे पिकांनी माना टाकल्या आहे. निम्मा पावसाळा संपत आला असताना अजून जोरदार पाऊस झालाच नाही. त्यामुळे विहीर, नाले कोरडे आहेत. याशिवाय खरिपाबरोबरच आगामी रब्बी हंगाम सध्या तरी धोक्यात आला असल्याचे चित्र दिसत आहे. खेडच्या पश्चिम भागात काही भागात जोरदार पाऊस झाला असताना तालुक्यातील पूर्व भागात कमी प्रमाणात पाऊस झाला.धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे भीमा नदीला थोडेफार पाणी येत आहे. मात्र, या पाण्याचा फायदा नदीकाठच्या गावांना होईल. इतर गावांतील शेतकºयांची चिंता कायम आहे. पावसाळ्याच्या उरलेल्या दिवसात पाऊस झाला नाही तर आगामी काळात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकºयांसह सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.रब्बीची चाहूल लागली आहे आणि आता रब्बीच नियोजन कसे करावे, यासाठी बळीराजाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आणखी काही दिवस पाऊस लांबणीवर पडल्यास रब्बी हंगामातील पेरण्या लांबणार असून, परिणामी उत्पादनही घटणार असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.दुष्काळाचे पसरले सावटवाल्हे : परिसरात पंधरा दिवस होऊन गेले पाऊस पूर्ण थांबला असून त्यामुळे शेतकºयाचा खरीब हंगाम धोक्यात आला आहे. पावसाळा चालू होऊन तीन महिने झाले जून, जुलै, आॅगस्ट संपला सप्टेंबर निम्मा झाला तरी जोराचा पाऊस झाला नाही. त्यामुळे चालू हंगाम जाण्याची शक्यता आहे.या परिसरात दुष्काळाचे सावट दिसू लागले आहे. आठ दिवसांपासून कडक ऊन पडत आहे. त्यामुळे शेतकºयाची चिंता वाढली आहे. पाऊस पडला नाही तर पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या वाल्हे परिसरातील सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडवाडी, बाळाजीचीवाडी, बहिर्जीचीवाडी या ठिकाणचा खरीब हंगाम पाऊस नसल्यामुळे वाया गेला आहे.त्यातूनही वाल्हे पश्चिमेकडील परिस्थिती बरी होती. पण उन्हाळ्यासारखे ऊन पडत असल्यामुळे जिरायत भागातील खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी