शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

कातकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 23:46 IST

दोन महिन्यांत प्रश्न सोडविणार : प्रांत अधिकारी यांनी दिले लेखी आश्वासन

घोडेगाव : आंबेगाव (जुना) गावातील शिल्लक क्षेत्र व घरांचा समावेश बोरघर ग्रामपंचायतीमध्ये व्हावे, या मागणीसाठी २२ कातकरी कुटुंबांनी पुकारलेले जलसमाधी आंदोलन प्रांत अधिकारी यांच्या ठोस लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. पुढील दोन महिन्यात मंत्रालयात पाठपुरावा करून हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन प्रांत अधिकारी अजित देशमुख यांनी दिले आहे.

डिंभे धरणात आंबेगाव गाव बुडीत झाले तरी काही क्षेत्र व घरे धरणाच्या कडेला शिल्लक राहिली. ही घरे बोरघर ग्रामपंचायतीत समाविष्ट करून नोंद ग्रामपंचायत दप्तरी करावी, अशी मागणी येथील कातकरी कुटुंबे अनेक वर्षांपासून करीत आहेत. सध्या या क्षेत्रात ४१ कातकरी कुटुंबे राहत असून त्यातील २२ कुटुंबांसाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून शाश्वत संस्थेने घरकुले बांधून दिली आहेत. तर उर्वरित १९ कुटुंबे अजूनही नदीच्या काठी राहून जीवन जगत आहेत. ज्या २२ कुटुंबांना घरकुले बांधून देण्यात आली आहेत, त्यांच्या घरांची नोंद बोरघर ग्रामपंचायत दप्तरी व्हावी, अशी मागणी कातकरी कुटुंबांकडून होत आहे.

दि. २७ नोव्हेंबर २०१७ रोजी विभागीय आयुक्त पुणे यांनी बोरघर ग्रामपंचायतमध्ये ही कुटुंबे समाविष्ट करावीत म्हणून शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, अजूनही यावर कोणताच निर्णय झालेला नाही म्हणून येथील कातकरी कुटुंबांनी दि. २ आॅक्टोबर रोजी जलसमाधीचा निर्णय घेतला होता.यापूर्वी प्रांत अधिकारी अजित देशमुख, तहसीलदार सुषमा पैकेकरी, गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी शाश्वत संस्थेचे बुधाजी डामसे व या ग्रामस्थांशी चर्चा केली. या वेळी प्रांत अधिकारी यांनी मंत्रालयातील अधिकाºयांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला, सर्व माहिती घेतली व आश्वासन दिले.

टॅग्स :Puneपुणेagitationआंदोलन