शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

काश्मीरमध्ये अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागेल :निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 20:16 IST

काश्मीरचा निर्णय योग्य की अयोग्य, हे येत्या काळात कळेल..

ठळक मुद्देसैनिक मित्र परिवारातर्फे सन्मान

पुणे : काश्मीरसह भारताच्या कोणत्याही भागात होणारी हिंसा एका विशिष्ट पातळीपर्यंत थांबवणे, हे सैन्याचे काम आहे. मात्र, उद्रेक होऊन हिंसा वाढू नये, हे पाहणे राज्यकर्त्यांचे काम असते. प्रत्यक्षात काश्मीरप्रश्न हा राजकीय असून कलम ३७० मुळे असलेले निर्बंध शिथील झाल्यानंतर सैन्य व राज्यकर्त्यांना अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागेल, असे मत मेजर जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त) यांनी व्यक्त केले. सैनिक मित्र परिवार व शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पराक्रमी सेनाधिकारी शशिकांत पित्रे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी शशिकांत पित्रे यांच्या पत्नी मीरा पित्रे, ज्येष्ठ रक्तदाते दत्तात्रय मेहेंदळे, किरण पाटोळे, आनंद सराफ, पराग ठाकूर, गिरीश पोटफोडे, होनराज मावळे, कल्याणी सराफ, योगिनी पाळंदे आदी उपस्थित होते. महिला कार्यकर्त्यांनी पित्रे यांना सपत्नीक औक्षण केले. सोनचाफ्याच्या फुलांची परडी, तिरंगी उपरणे, घरगुती मिठाई त्यांना भेट देण्यात आली. शशिकांत पित्रे म्हणाले, काश्मीरमधील निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुढील १५ दिवसांत परिस्थिती कशी हाताळली जाते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यावरच काश्मीरचा निर्णय योग्य की अयोग्य, हे समजू शकेल. सरकारने आतापर्यंत परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आहे. तसेच या प्रश्नी नक्की काय करायचे आहे, ही दिशा सरकारची स्पष्ट आहे.’

 

टॅग्स :PuneपुणेJammu Kashmirजम्मू-काश्मीरCentral Governmentकेंद्र सरकार