शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कर्मयोगी कारखाना स्वयंपूर्ण : हर्षवर्धन पाटील  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 02:26 IST

‘‘अथक प्रयत्नांनंतर कर्मयोगी सहकारी साखर कारखाना स्वयंपूर्ण केला आहे. ऊस उत्पादक सभासद शेतकºयांचे सहकार्य मिळाले तर आगामी काळात यशस्वी वाटचालीत कसलीही अडचण येणार नाही,’’ असा विश्वास माजी मंत्री कर्मयोगी सहकारीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी व्यक्त केला.

इंदापूर : ‘‘अथक प्रयत्नांनंतर कर्मयोगी सहकारी साखर कारखाना स्वयंपूर्ण केला आहे. ऊस उत्पादक सभासद शेतकºयांचे सहकार्य मिळाले तर आगामी काळात यशस्वी वाटचालीत कसलीही अडचण येणार नाही,’’ असा विश्वास माजी मंत्री कर्मयोगी सहकारीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी व्यक्त केला.कर्मयोगी सहकारी कारखान्याच्या ३२व्या वार्षिक सर्वसाधारणसभा रविवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. या वेळी उपाध्यक्षा पद्मा भोसले, मयूरसिंह पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. जी. सुतार यांच्यासह सर्व संचालक मंडळ या वेळी उपस्थित होते. म.फुले विद्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा झाली.हर्षवर्धन पाटील म्हणाले की, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने कधी कुणाचा रुपयादेखील बुडविला नाही. असंंख्य अडचणींवर मात करत केवळ ऊसउत्पादक सभासद, कारखान्याचे कर्मचाºयांच्या पाठबळावर मार्ग काढत आलो. आजघडीला कारखान्याचे विस्तारीकरण व इतर सर्व अनुषंगिक बाबींची पूतर्ता करण्यात आलीआहे. येथून पुढे कोणतीही अडचण राहणार नाही. कर्जासाठी कुणापुढे पदर पसरावा लागणार नाही.इतकी उत्तम परिस्थिती आहे. यंदा १३ लाख मेट्रिक टनाच्या पुढे ऊस गाळप होणे आवश्यक आहे. त्यासाठी सन २०१७-१८ व २०१९ हे दोन्ही गळीत हंगाम नियोजनबद्धरीत्या पार पाडण्याची शपथ सर्वांनी घेतली पाहिजे.सन २०१०-११मध्ये कारखान्याची स्थिती चांगली होती. त्या वेळी आपण २ हजार ६११ रुपये दर दिला होता. तीन वेळा कारखान्याची गाळप क्षमता वाढविली होती. दुर्दैवाने दुष्काळी स्थिती निर्माण झाली. गाळप कमी व उत्पादन खर्च वाढला होता. सन २०१४मध्ये राजकीय सत्ताबदल झाला.मागील वर्षी ३१ वर्षांतील नीचांकी गाळप झाले. मात्र जाहीर केल्याप्रमाणे २ हजार ५०५ ऊसदर दिला. कामगारांच्या पगारासाठी वर्षाला १९ कोटी रुपयेलागतात. त्याची तजवीज करून ठेवली होती. तथापि काही बँकांनी जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या. सन २०१८चे हप्ते बँकांनी २०१७च्या ३१ मार्चमध्ये कपात करून घेतले होते.सध्या वेळेवर पगार होण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. कारखाना क्षेत्रातील उसाला साडेनऊ रिकव्हरी बसते आहे. साडे अकरापर्यंत रिकव्हरी मिळण्यासाठी संचालक मंडळ व आपण सारे प्रयत्न करणार आहोत, असे सांगून ते म्हणाले,की दररोज १२ हजार टनाचे गाळप होईल अशी तयारी कारखान्याने केली आहे. सूत्रसंचालन शरदकाळे यांनी, तर आभार राहुल जाधव यांनी मानले.शेतकºयांना एफआरपी पेक्षा ४६३ रुपये जादाकर्मयोगीने शेतकºयांना एफआरपीपेक्षा ४६३ रुपये जादा दिले आहेत. त्या जादा रकमेवर इन्कम टॅक्स आकारला गेला आहे. सभासदांना तर २ हजार ५०५ रुपयेप्रमाणे पैसे दिले आहेत. या संदर्भात येणाºया अडचणी सर्वांनी एकत्रितपणे सोडविल्या पाहिजेत, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

टॅग्स :Puneपुणे