शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

फक्त सैन्यावर विश्वास ठेवा, सैन्य तुम्हाला काम दाखवेल : लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:05 IST

मृत्युची पर्वा न करता सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईक केले.परंतु बऱ्याच जणांनी विचारले की सर्जिकल स्ट्राईक नंतर काय साधले? सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय सैन्य काय करु शकते हे आपण जगाला दाखवून दिले.

ठळक मुद्देथोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना प्रदान

पुणे :  सर्जिकल स्ट्राईकनंतर देशाकडे आता वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत होणार नाही. भारत फक्त पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने थांबवत नाही किंवा समझोता एक्सप्रेस बंद करत नाही तर जर कोणी हल्ला केला तर प्रत्युत्तर सुध्दा भारताला देता येते, हे आपण दाखवून दिले. केवळ सैन्यावर विश्वास ठेवा, सैन्य तुम्हाला नक्कीच काम करून दाखवेल, असा विश्वास लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केला. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३१८ व्या जयंतीनिमित्त थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे घोले रस्त्यावरील नेहरु सांस्कृतिक सभागृहात थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी सन्मानाला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी पेशवे यांचे वंशज श्रीमंत उदयसिंह पेशवा, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले, अनिल गानू, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, उपस्थित होते. सन्मानचिन्ह, पेशवाई पगडी, २५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. मराठ्यांचा इतिहास म्हणजे केवळ पानिपतची लढाई. या लढाईत मराठे हरले, एवढाच लोकांना माहिती आहे. परंतु केवळ पानिपतपर्यंत मराठ्यांचा इतिहास नाही. मराठ्यांचा संपूर्ण इतिहास जगासमोर यायला हवा असे सांगून निंभोरकर म्हणाले, सर्जिकल स्ट्राईक ही भारतीय  सैन्याची अतिशय यशस्वी मोहिम होती. बऱ्याच जणांनी विचारले की सर्जिकल स्ट्राईक नंतर काय साधले? सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय सैन्य काय करु शकते हे आपण जगाला दाखवून दिले. या मोहिमेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारताला कोणी प्रश्न विचारला नाही. सर्जिकल स्ट्राईल हे सरप्राईज होते, त्यासाठीच इतकी गुप्तता पाळण्यात आली होती. मनोहर जोशी म्हणाले, राष्ट्रवाद वाढणे ही देशाची गरज आहे. प्रत्येकाच्या अंत:करणात राष्ट्रवाद असायला हवा. जवान स्वत:च्या घराची आणि आपल्या जिवाची पर्वा न करता, प्राण पणाला लावून देशाचे रक्षण करतात. त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित राहतो. पराक्रमाची परिसीमा म्हणजे सैन्यदलातील नोकरी आहे. शिस्त आणि राष्ट्रवाद शिकण्यासाठी सैन्यात जायला हवे. राजेंद्र निंभोरकर यांच्या सारख्या सैन्याधिकाऱ्याचा सन्मान करणे हा माझा धर्म आहे. त्यांचा सन्मान अनेकांना स्फूर्ती देणारा आहे. आयुष्यात मोठे होण्यासाठी ध्येय लागते, ध्येय समोर ठेवूनच वाटचाल करायला हवी. आपण केवळ बोलू शकतो किंवा घुसखोरी करतो असे पाकिस्तानला माहित होते. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरील यंत्रणा करेल अशी मोहीम भारतीय लष्कराने केली. मृत्युची पर्वा न करता सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईक केले असल्याचे त्यांनी सांगितले.   भूषण गोखले म्हणाले, महाराष्ट्रापुरते संकुचित न राहता, मराठ्यांचा इतिहास संपूर्ण जगासमोर आणला पाहिजे. मराठ्यांचा पूर्ण इतिहास जगासमोर आला नाही. तरुणाईने मराठ्यांच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करुन योग्य इतिहास जगासमोर आणला पाहिजे. पुण्याचे विमानतळ किंवा रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यायला हवे, यातून लोकांना प्रेरणा मिळेल. सुमेधा चिथडे यांनी सूत्रसंचालन केले. कुंदनकुमार साठे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत नगरकर यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवान