शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

दिग्दर्शकाच्या नजरेतून उलगडला चित्रपटाचा प्रवास, मधुर भांडारकर यांच्याशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 16:31 IST

पुणे : चित्रपटाच्या प्रक्रियेमध्ये पटकथा, संशोधन, संपादन ही प्रक्रिया खूप महत्त्वाची असते. चित्रपटाचा विषय हा एक विचार असतो. त्या विचाराला मूर्त रूप देण्यासाठी अभ्यास, संशोधन खूप गरजेचे असते.

पुणे : चित्रपटाच्या प्रक्रियेमध्ये पटकथा, संशोधन, संपादन ही प्रक्रिया खूप महत्त्वाची असते. चित्रपटाचा विषय हा एक विचार असतो. त्या विचाराला मूर्त रूप देण्यासाठी अभ्यास, संशोधन खूप गरजेचे असते. हा विचार दोन-अडीच तासात चपखल बसवणे आव्हानात्मक असते. ते कसब दिगदर्शकाला अवगत असावे लागते. चित्रपटाच्या यशातून दिग्दर्शकाला समाधान मिळतेच; मात्र, यशापयशाच्या गणिताबरोबरच चित्रपट बजेटमध्ये बसवणे जास्त गरजेचे असते. बजेटचे आणि यशापयशाचे गणित यांच्यात समतोल साधता यायला हवा, असा शब्दांत प्रसिध्द दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी चित्रपटाचा प्रवास दिग्दर्शकाच्या नजरेतून उलगडला. इंदू सरकारच्या वेळी प्रचंड ताण आणि त्रासाचा सामना करावा लागला, असेही त्यांनी स्पष्ट केले.सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने सदाशिव अमरापूरकर स्मृती सोहळ्यात मधुर भांडारकर यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे ही मुलाखत पार पडली. एखादा चित्रपट सुचवण्यापासून, तो प्रदर्शित होण्यापर्यंतचा एका संवेदनशील दिग्दर्शकाचा प्रवास यानिमित्ताने उलगडला. दिग्दर्शिका रिमा अमरापूरकर यांनी भांडारकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, ज्येष्ठ समाजसेवक अनिल अवचट, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, सुनंदा अमरापूरकर यांची आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दाखवण्यात आलेल्या चित्रफितीतून सदाशिव अमरापूरकर यांची छोट्या पडद्यासह हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील वाटचाल, सामाजिक बांधिलकी आदी आठवणींना उजाळा मिळाला.भांडारकर म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपटसृष्टीमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर, सोशल मीडियाचा प्रभाव, कलाकारांचे बजेट वाढले आहे. चित्रपटाच्या निर्मितीप्रमाणेच प्रमोशन, मार्केटिंगलाही अनन्यसाधारण महत्व आले आहे. प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे वळवण्यासाठी आशयपूर्ण चांगल्या चित्रपटांची गरज असते. आशय दर्जेदार असेल तर कमी बजेटचे चित्रपटही यशस्वी होतात. थिएटर्सची वाढती संख्या, परदेशातील प्रेक्षकांचे वाढते प्रमाण यामुळे उदयोन्मुख निर्माते, दिग्दर्शकांसाठी चित्रसृष्टीचे भविष्यातील चित्र आशादायी आहे. लहानपणापासून असलेले चित्रपटांचे वेड, व्हिडिओ कॅसेटचा डिलीव्हरी बॉय म्हणून केलेले काम, त्रिशक्ती चित्रपटाला मिळालेले अपयश. त्यातून आलेले नैराश्य, चित्रपट चालला नाही तरी तू नक्की चालशील, असे सांगत सदाशिव अमरापूरकरांनी टाकलेला विश्वास, अशा अनेक बाबींवर भांडारकर यांनी प्रकाश टाकला. त्रिशक्ती नंतर ४-५ महिन्यांनी चांदनी बार हा चित्रपट मिळाला. तब्बूसह सर्वांनी दिलेला विश्वास आणि मेहनतीमुळे या चित्रपटाने माझे नशीब पालटले. ट्राफिक सिग्नल चित्रपटाची निर्मिती प्रक्रियाही त्यांनी उलगडून सांगितली.अनिल अवचट म्हणाले, 'सदाशिवचे जाणे म्हणजे माज्यातील अस्तित्वाचा लचका तुटण्यासारखेच होते. तो अत्यन्त संवेदनशील, मनमिळाऊ व्यक्ती होता. पोटतिडकीने काम करण्याची आणि कोणाचेही चांगले काम लोकांपर्यंत पोहोचवण्याची त्याची इच्छा असायची. त्याने मला आईचे प्रेम दिले. त्यामुळे आजही त्याच्या आठवणीने डोळे पाणावतात.' रंगभूमी दिनानिमित्त ज्येष्ठ नेपथ्यककार बाबा पार्सेकर यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार तर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांना संगीताचार्य आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा यावेळी विनोद तावडे यांनी केली. १६ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू ९० व्या वर्षात पदार्पण करत असल्यानिमित्त त्यांना सर्वांंनी उभे राहून मानवंदना दिली. तावडे म्हणाले, काय बोलायचे आणि काय बोलायचे नाही हे कळत असल्याने मुख्यमंत्र्यानी मला सांस्कृतिक आणि शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी पार पडत असतानाही तरीही सगळ्यांना तावडेंचे वावडे आहे. शिक्षक संघटनांनी वेतन श्रेणीतील वाढीसाठी मोर्चे काढले. मात्र, गुणवत्ता सिध्दीला विरोध करणे चुकीचे आहे. मी शिक्षक मंत्री नसून शिक्षण मंत्री आहे. त्यामुळे शैैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याला प्राधान्यक्रम देण्यात येईल.सत्ता आणि जबाबदारी यांचे गणित उलगडताना भांडारकर म्हणाले, कोणताही राजकीय पक्ष राज्याच्या हिताचे निर्णय घेत असेल आणि राज्याची प्रगती होत असेल, तर माझा त्यांना नक्कीच पाठिंबा असेल. देशाचे ऐक्य आणि विकास या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. सध्याचे सरकार योग्य दिशेने काम करत आहे. विकासाची जबाबदारी सरकारप्रमाणेच सामान्यांचीही असते. शासन यंत्रणा बदलण्याची, सुधारण्याची ताकद प्रत्येक सामान्य माणसामध्ये असते. त्यासाठी त्याने या प्रक्रियेत आपले योगदान दिले पाहिजे.

टॅग्स :Madhur Bhandarkarमधुर भांडारकर cinemaसिनेमा