शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

प्रश्न विचारणे पत्रकारांचे काम - सिद्धार्थ भाटिया  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 01:58 IST

पत्रकारिता ही समाजाप्रति असलेली जबाबदारी आहे याची जाणीव असलेल्यांनी या क्षेत्रात काम करण्यासाठी येणे आवश्यक आहे. पैसे कमावण्यासाठी किंवा झगमगाटाची अपेक्षा ठेवणाऱ्यांसाठी हे क्षेत्र नाही.

पुणे - पत्रकारिता ही समाजाप्रति असलेली जबाबदारी आहे याची जाणीव असलेल्यांनी या क्षेत्रात काम करण्यासाठी येणे आवश्यक आहे. पैसे कमावण्यासाठी किंवा झगमगाटाची अपेक्षा ठेवणाऱ्यांसाठी हे क्षेत्र नाही. उत्तर मिळण्याची वाट न पाहता प्रश्न विचारत राहाणे व त्यांचा पाठपुरावा करणे हे पत्रकाराचे काम आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ भाटिया यांनी व्यक्त केले.समाजमाध्यमे हे नव्याने एक बलशाली माध्यम म्हणून पुढे येत आहे मात्र पत्रकारितेतील मोठ्या समूहांना त्याची ताकद उमजलेली नाही. त्यामुळे समाजमाध्यमांच्या वापराचे बहुतांश प्रयोग हे लहान स्तरावरून सुरू होत असल्याचे चित्र आहे. मुद्रित व आॅनलाईन पत्रकारितेतील स्टार्ट अप प्रकल्पांचे भवितव्य उज्ज्वल असेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. दिवंगत ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त भाटिया यांनी ‘क्रायसिस इनइंडियन मीडिया’ या विषयावर आपले विचार मांडले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ग्रंथालीचे धनंजय गांगल, सावित्राबाई फुले पुणे विद्याापीठाच्या वृत्तपत्र आणि संज्ञापन विद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे व सुवर्णा साधू व्यासपीठावर उपस्थित होत्या. भाटिया म्हणाले, २०१४ नंतर पत्रकारितेच्या क्षेत्रात अमूलाग्र बदल झाले आहेत. कोणत्या विषयावर लिहायचे व बोलायचे यावर माध्यम कंपन्यांच्या व्यवस्थापनाचे थेट नियंत्रण येत आहे. असे नियंत्रण झुगारणाºयांची नोकरी धोक्यात येत आहे. प्रश्न विचारणाºयांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. २०१४पूर्वी पत्रकारितेचा सुवर्णकाळ होता असे नाही. मात्र सरकार आणि यंत्रणांकडून थेट हस्तक्षेप कधीही करण्यात आलेला नाही. पुढील काळात भारतीय इलेक्ट्रॉनिक मीडियाला फारसे महत्त्व राहाणार नाही. आॅनलाईन, व्हीडिओ हेच डिजिटल माध्यम म्हणून प्रभावी ठरणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.साधू यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त जाहीर करण्यात आलेली पाठ्यवृत्ती ‘लोकमत’ नाशिकच्या पत्रकार मेघना ढोके यांना प्रदान करण्यात आली. आसाम आणि एनआरसी प्रक्रिया या विषयावर अभ्यास करण्यासाठी ही पाठ्यवृत्ती देण्यात आली.

टॅग्स :Journalistपत्रकारPuneपुणेMediaमाध्यमे