शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

पत्रकारांनी अंकुश म्हणून काम करावे - चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 04:18 IST

देशाच्या विकासामध्ये प्रत्येकाने आपापली भूमिका योग्यपणे बजावली तर देशाच्या विकासास वेळ लागणार नाही. देशाच्या विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या घोडदौडीमध्ये पत्रकारांची भूमिका ममत्वाची असून पत्रकारांनी अंकुश म्हणून काम करणे आवश्यक आहे.

पुणे : देशाच्या विकासामध्ये प्रत्येकाने आपापली भूमिका योग्यपणे बजावली तर देशाच्या विकासास वेळ लागणार नाही. देशाच्या विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या घोडदौडीमध्ये पत्रकारांची भूमिका ममत्वाची असून पत्रकारांनी अंकुश म्हणून काम करणे आवश्यक आहे. तसेच या अंकुशाबरोबर भीती ही असलीच पाहिजे. मात्र, पत्रकारिता हे एक भयानक प्रकरण असल्याने सांभाळून आणि कमी बोला, अशी स्थिती निर्माण झाली तर ही चिंताजनक बाब असेल, असे मत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जर्नालिस्ट वृत्तवाहिनी स्टुडिओचे व पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या शुभारंभ सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. याप्रसंगी पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया मान्यवरांचा गौरव करण्यात आला. माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, गोविंद घोळवे, राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, अभिनेता राहुल सोलापूरकर, विश्वासराव आरोटे आदी उपस्थित होते.‘लोकमत’चे औरंगाबाद आवृत्तीचे अनिल भापकर यांच्यासह प्रा. सी. एन. चौधरी, आशिष घुमे, सोमनाथ काळे, प्रा. आनंद सुराणा आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पाटील म्हणाले, ‘‘अलीकडच्या काळात केवळ घडणाºया घटनांच्याच बातम्या दिल्या जातात. मात्र, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ तासांत पश्चिम महाराष्ट्रात ३ कार्यक्रम का घेतले? त्यांनी या भागातील निवडक संस्थांनाच भेटी का दिल्या? एखाद्या सदस्याने विधान परिषदेचा राजीनामा दिल्यानंतर चार ते पाच महिन्यांनंतर घेतली जाणारी निवडणूक एक ते दीड महिन्यातच का घेतली जात आहे? याचे कारण मीडियाने शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. त्यामुळे पत्रकारांनी केवळ रोजच्या घडामोडींकडेच लक्ष न देता शोधपत्रकारिता करावी.’’खांडेकर म्हणाले, ‘‘सध्या डिजिटल युगाचा काळ असून वेब चॅनलचे महत्त्व वाढताना दिसत आहे. अलीकडचा प्रेक्षकवर्ग डिजिटल माध्यमाकडे वळत चालला आहे. दूरसंचावर बातम्या पाहणाºया प्रेक्षकांचा विचार केला तर मोबाईलवर बातम्या पाहणाºयांची संख्या वाढत चालली आहे. तसेच ज्यांना दीर्घ काळ पत्रकारिता करायची आहे. त्यांनी स्वत:मध्ये बदल करून डिजिटल पद्धतीचा अवलंब करावा.’’विजय बाविस्कर यांनी पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. संजय भोकरे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. उमेश कुलकर्णी, नवनाथ जाधव, संदीप भटेवरा यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकाºयांनी संयोजन केले.राणे दुसºया क्रमांकाचे मंत्री होऊ शकणार नाहीतमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील आहेत, तोपर्यंत नारायण राणे हे दुसºया क्रमांकाचे मंत्री होऊ शकणार नाहीत, अशी टीका पतंगराव कदम यांनी केली. तसेच भारतीय जनता पक्षाने भाषण, आश्वासने आणि मीडिया या तिघांमुळे हे राज्य घेतले, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी याप्रसंगी केली.त्याचप्रमाणे सत्ता येते जाते. परंतु, सत्तेत राहून आपण किती जणांना मदत करतो. त्यावर प्रत्येकाने लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान झपाट्याने बदलत चालले असून त्याचा अंगीकर केला पाहिजे, असेही कदम यांनी नमूद केले.

टॅग्स :Puneपुणे