शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांनी अंकुश म्हणून काम करावे - चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 04:18 IST

देशाच्या विकासामध्ये प्रत्येकाने आपापली भूमिका योग्यपणे बजावली तर देशाच्या विकासास वेळ लागणार नाही. देशाच्या विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या घोडदौडीमध्ये पत्रकारांची भूमिका ममत्वाची असून पत्रकारांनी अंकुश म्हणून काम करणे आवश्यक आहे.

पुणे : देशाच्या विकासामध्ये प्रत्येकाने आपापली भूमिका योग्यपणे बजावली तर देशाच्या विकासास वेळ लागणार नाही. देशाच्या विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या घोडदौडीमध्ये पत्रकारांची भूमिका ममत्वाची असून पत्रकारांनी अंकुश म्हणून काम करणे आवश्यक आहे. तसेच या अंकुशाबरोबर भीती ही असलीच पाहिजे. मात्र, पत्रकारिता हे एक भयानक प्रकरण असल्याने सांभाळून आणि कमी बोला, अशी स्थिती निर्माण झाली तर ही चिंताजनक बाब असेल, असे मत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जर्नालिस्ट वृत्तवाहिनी स्टुडिओचे व पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या शुभारंभ सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. याप्रसंगी पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया मान्यवरांचा गौरव करण्यात आला. माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, गोविंद घोळवे, राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, अभिनेता राहुल सोलापूरकर, विश्वासराव आरोटे आदी उपस्थित होते.‘लोकमत’चे औरंगाबाद आवृत्तीचे अनिल भापकर यांच्यासह प्रा. सी. एन. चौधरी, आशिष घुमे, सोमनाथ काळे, प्रा. आनंद सुराणा आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पाटील म्हणाले, ‘‘अलीकडच्या काळात केवळ घडणाºया घटनांच्याच बातम्या दिल्या जातात. मात्र, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ तासांत पश्चिम महाराष्ट्रात ३ कार्यक्रम का घेतले? त्यांनी या भागातील निवडक संस्थांनाच भेटी का दिल्या? एखाद्या सदस्याने विधान परिषदेचा राजीनामा दिल्यानंतर चार ते पाच महिन्यांनंतर घेतली जाणारी निवडणूक एक ते दीड महिन्यातच का घेतली जात आहे? याचे कारण मीडियाने शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. त्यामुळे पत्रकारांनी केवळ रोजच्या घडामोडींकडेच लक्ष न देता शोधपत्रकारिता करावी.’’खांडेकर म्हणाले, ‘‘सध्या डिजिटल युगाचा काळ असून वेब चॅनलचे महत्त्व वाढताना दिसत आहे. अलीकडचा प्रेक्षकवर्ग डिजिटल माध्यमाकडे वळत चालला आहे. दूरसंचावर बातम्या पाहणाºया प्रेक्षकांचा विचार केला तर मोबाईलवर बातम्या पाहणाºयांची संख्या वाढत चालली आहे. तसेच ज्यांना दीर्घ काळ पत्रकारिता करायची आहे. त्यांनी स्वत:मध्ये बदल करून डिजिटल पद्धतीचा अवलंब करावा.’’विजय बाविस्कर यांनी पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. संजय भोकरे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. उमेश कुलकर्णी, नवनाथ जाधव, संदीप भटेवरा यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकाºयांनी संयोजन केले.राणे दुसºया क्रमांकाचे मंत्री होऊ शकणार नाहीतमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील आहेत, तोपर्यंत नारायण राणे हे दुसºया क्रमांकाचे मंत्री होऊ शकणार नाहीत, अशी टीका पतंगराव कदम यांनी केली. तसेच भारतीय जनता पक्षाने भाषण, आश्वासने आणि मीडिया या तिघांमुळे हे राज्य घेतले, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी याप्रसंगी केली.त्याचप्रमाणे सत्ता येते जाते. परंतु, सत्तेत राहून आपण किती जणांना मदत करतो. त्यावर प्रत्येकाने लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान झपाट्याने बदलत चालले असून त्याचा अंगीकर केला पाहिजे, असेही कदम यांनी नमूद केले.

टॅग्स :Puneपुणे