शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

न्याय मागण्यासाठी पत्रकारच जवळचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 05:33 IST

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याय मागणीसाठी पत्रकारांकडे गेले, आम्ही विरोधी पक्षातले नेतेही सरकारने बोलू दिले नाही तर पत्रकारांकडेच जातो

पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याय मागणीसाठी पत्रकारांकडे गेले, आम्ही विरोधी पक्षातले नेतेही सरकारने बोलू दिले नाही तर पत्रकारांकडेच जातो. त्यामुळे सामान्यांना न्याय मागण्यासाठी आजही पत्रकार जवळचे वाटतात, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या ‘दर्पण’ पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. या पुरस्काराचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष होते. या वेळी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर, कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले आणि महाराष्ट्र राज्य प्रसारमाध्यम व वृत्तपत्रे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष ‘लोकमत’चे मुंबईतील विशेष प्रतिनिधी यदू जोशी, ज्येष्ठ स्तंभलेखक भाऊ तोरसेकर (मुंबई), दैनिक नवशक्तीचे (मुंबई) संपादक सुकृत खांडेकर, ज्येष्ठ पत्रकार व जलनितीतज्ज्ञ सुधीर भोंगळे यांना ‘दर्पण जीवनसन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले.‘सत्यमेव जयते’चा खरा अर्थ पत्रकारितेने दाखवला. गौरी लंकेश यांच्यासारख्या पत्रकाराची हत्या होते. याबद्दल आनंद व्यक्त करणारा वर्ग देशात आहे, याबद्दल जयंत पाटील यांनी खंत व्यक्त केली. ‘रिपोर्टर विदाऊट बॉर्डर’ या संस्थेचा दाखला देत पत्रकारांना सर्वाधिक धोका मोदींच्या राष्ट्रवादी धोरणाचा आहे. प्रेस फ्रीडममध्ये भारत १३६ व्या क्रमांकावर पॅलेस्टाईन आणि अफगाणिस्तान आपल्या पुढे आहेत. मोदी सरकार आल्यापासून ५४ हल्ले पत्रकारांवर झाले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील