शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

न्याय मागण्यासाठी पत्रकारच जवळचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 05:33 IST

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याय मागणीसाठी पत्रकारांकडे गेले, आम्ही विरोधी पक्षातले नेतेही सरकारने बोलू दिले नाही तर पत्रकारांकडेच जातो

पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याय मागणीसाठी पत्रकारांकडे गेले, आम्ही विरोधी पक्षातले नेतेही सरकारने बोलू दिले नाही तर पत्रकारांकडेच जातो. त्यामुळे सामान्यांना न्याय मागण्यासाठी आजही पत्रकार जवळचे वाटतात, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या ‘दर्पण’ पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. या पुरस्काराचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष होते. या वेळी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर, कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले आणि महाराष्ट्र राज्य प्रसारमाध्यम व वृत्तपत्रे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष ‘लोकमत’चे मुंबईतील विशेष प्रतिनिधी यदू जोशी, ज्येष्ठ स्तंभलेखक भाऊ तोरसेकर (मुंबई), दैनिक नवशक्तीचे (मुंबई) संपादक सुकृत खांडेकर, ज्येष्ठ पत्रकार व जलनितीतज्ज्ञ सुधीर भोंगळे यांना ‘दर्पण जीवनसन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले.‘सत्यमेव जयते’चा खरा अर्थ पत्रकारितेने दाखवला. गौरी लंकेश यांच्यासारख्या पत्रकाराची हत्या होते. याबद्दल आनंद व्यक्त करणारा वर्ग देशात आहे, याबद्दल जयंत पाटील यांनी खंत व्यक्त केली. ‘रिपोर्टर विदाऊट बॉर्डर’ या संस्थेचा दाखला देत पत्रकारांना सर्वाधिक धोका मोदींच्या राष्ट्रवादी धोरणाचा आहे. प्रेस फ्रीडममध्ये भारत १३६ व्या क्रमांकावर पॅलेस्टाईन आणि अफगाणिस्तान आपल्या पुढे आहेत. मोदी सरकार आल्यापासून ५४ हल्ले पत्रकारांवर झाले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील