शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

जितेंद्र रघुवीर यांच्या जादुई सफरीचा दाेन हजारावा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 10:08 IST

गेल्या तीन पिढ्यांपासून रघुवीर कुटुंबिय अापल्या जादुने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत अाहेत. रघुवीर जादुगारांमधील तीसरी पिढी जितेंद्र रघुवीर यांच्या जादुच्या कार्यक्रमाचा दाेन हजारावा प्रयाेग रविवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगला.

पुणे : मान कापूनही जिवंत राहिलेला तरुण, अनेकदा रिकामी केली तरी घागरीत पुन्हा येणारं पाणी, पोकळ पाईपमधून निघणाऱ्या विविध वस्तू, अशा विविध प्रकारच्या जादू पाहताना प्रेक्षक भारावून गेले होते. क्षणार्धात होणारी जादू पाहताना प्रेक्षकांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. निमित्त होते प्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या जादूच्या दोन हजाराव्या प्रयोगाचे.     तीन पिढ्यांपासून प्रेक्षकांच्या मनावर रघुवीर कुटुंबीयांनी जादूची मोहीणी घातली आहे. या तीन पिढ्यांनी गेल्या ७८  वर्षांमध्ये विविध २७ देशांमध्ये १५ हजाराहून अधिक प्रयोग केले आहेत.  याच कुटुंबातील तिसऱ्या पिढीतल्या जादुगार जितेंद्र रघुवीर यांनी त्यांच्या जादुंचे तब्बल दोन हजार प्रयोग रविवारी पूर्ण केले. त्यांचा दोन हजारावा प्रयोग पाहण्यासाठी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह गच्च भरले होते. लहान मुले, तरुण मंडळी तसेच ज्येष्ठ नागरिकही आवर्जुन उपस्थित होते. त्याचबरोबर गायिका बेला शेंडे, सावणी शेंडे, व्यंगचित्रकार चारुहास पंडीत, यांनी या प्रयाेगाला हजेरी लावून रघुविरांना शुभेच्छा दिल्या. यावेळी काेथरुड नाट्यपरिषदेचे सुनिल महाजन यांच्यावतीने जादुगार जितेंद्र रघुवीर व त्यांचे वडील जादुगार विजय रघुवीर यांचा सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

    गेल्या अनेक वर्षांपासून जितेंद्र रघुवीर हे भारतात तसेच परदेशात आपल्या जादुचे प्रयोग करीत आहेत. त्यांच्या जादुच्या प्रयोगांनी प्रेक्षकांच्या मनावर एकप्रकारे गारुड केले आहे. त्यांच्या या जादुच्या मोहिनीमुळेच पुणेकरांनी त्यांच्या दोन हजाराव्या प्रयोगाला मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. छोट छोट्या प्रयोगांनी त्यांनी प्रेक्षकांना भारावून सोडले. जितेंद्र रघुवीर यांनी आपल्या जादुच्या प्रयोगांमध्ये प्रेक्षकांनाही सामावून घेतले. त्यांच्या सोबतही काही प्रयोग करुन दाखविण्यात आले. सुरुवातीला रघुवीर यांनी एका रिकाम्या पाईपमधून विविध गोष्टी काढून दाखवत प्रेक्षकांना आश्चर्य चकित केले. काही प्रेक्षकांना मंचावर बोलावून त्यांनी काही प्रश्न विचारले आणि त्यांनी दिलेली उत्तरे फळ्यावर लिहिण्यात आली. आणि क्षणार्धात त्यांनी दिलेली उत्तरं लिहिलेली चिठ्ठी त्यांनी एका कुलुपबंद बॉक्समधून काढून दाखवली. या प्रयोगाला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. त्याचबरोबर धारदार वस्तू वरुन सोडल्यानंतरही न कापली जाणारी मान. हात कापून तो पुन्हा जोडण्याची जादू, रिकाम्या बॉक्समधून बाहेर निघालेला माणूस, केवळ कापडाला धरुन हवेत उडवलेले टेबल हे सर्व जादूचे प्रयोग पाहताना प्रेक्षक थक्क झाले होते. डोळ्याला पट्टी बांधून प्रेक्षागृहात चालविण्यात आलेल्या मोटरसायकलचा प्रयोग पाहताना प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. त्याचबराेबर काही क्षणात गायब केलेला माणूस, तीन पत्यांमधून काढलेले अनेक पत्ते असे विविध प्रयाेग सादर करुन त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचबराेबर रघुवीर यांनी काही प्रयाेग प्रेक्षकांना शिकवले सुद्धा. रघुवीर यांचा दाेन हजारावा प्रयाेगही प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय असाच हाेता. 

टॅग्स :Puneपुणेkothrudकोथरूडartकलाnewsबातम्या