शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

होमस्कुलिंग करणाऱ्या जान्हवी पतकीला दहावीत ८४ टक्के गुण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 09:40 IST

शिक्षण म्हटले की डोळ्यासमोर पहिल्यांदा उभी राहते ती शाळा. शाळेतले शिक्षक, फळा, खडू, झुंडीने वर्गातून बाहेर पडणारे विद्यार्थी आणि तासागणिक बदलणारी घंटा अशा असंख्य आठवणी समोर येतात. मात्र शाळेच्या याच चाकोरीबद्ध मांडणीवर न भुलता जान्हवी पतकी या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवत यश संपादित केले आहे. 

पुणे : शिक्षण म्हटले की डोळ्यासमोर पहिल्यांदा उभी राहते ती शाळा. शाळेतले शिक्षक, फळा, खडू, झुंडीने वर्गातून बाहेर पडणारे विद्यार्थी आणि तासागणिक बदलणारी घंटा अशा असंख्य आठवणी समोर येतात. मात्र शाळेच्या याच चाकोरीबद्ध मांडणीवर न भुलता जान्हवी पतकी या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवत यश संपादित केले आहे. 

शिक्षणासाठी शाळाच आवश्यक आहे अशी सर्वसाधारण धारणा असताना जान्हवीचे हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. यात तिचे शिक्षक बनलेले वडील ऋतुराज  आणि आई नीलिमा यांचा मोठा वाटा आहे. इयत्ता दुसरीपासून, घरून शाळाबाह्य शिक्षण घेऊन पहिल्यांदाच दहावीला ती अधिकृत परीक्षेला सामोरी गेली. मात्र केलेल्या शाळेत न जात घरी केलेल्या अभ्यासाच्या जोरावर ती उत्तम गुणांनी  उत्तीर्ण झाली आहे. जान्हवीने कोल्हापूर विभागातून परीक्षा दिली होती. 

   याबाबत तिचे वडील म्हणाले की, मुळात मी आणि माझ्या पत्नीने आमचे शिक्षण पारंपरिक पद्धतीनेच पूर्ण केले होते. त्यामुळेच शाळा चाकोरीबद्ध शिक्षणाच्या संकल्पना मोडून तिला विचारांना चालना मिळेल असा आमचा विचार होता. घोकंपट्टीसोडून तिला मुळातून विषय समजावेत अशी आमची इच्छा होती आणि त्यामुळेच तिला घरी शिकवण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघेही व्यवसाय करत असल्यामुळे तिला पुरेसा वेळही देऊ शकलो. फक्त एसएससी नाही तर आयसीएसई आणि सिबीएसई बोर्डाच्या पुस्तकांचाही अभ्यास तिने केला. 

 तिच्या आई म्हणाल्या की, ' सुरुवातील आम्हालाही हा प्रयोग करताना धाकधूक होतीच. शिवाय अगदी घरातूनही आमच्या प्रयोगावर शंका उपस्थित झाल्या होत्या. मात्र तिला पूर्ण समजेल असे प्रयोगातून आम्ही शिक्षण दिले आणि आज त्याचे फळ मिळाले आहे. घरात शिकवताना आम्ही तिला जास्तीत जास्त गोष्टींना अनुभव देण्याचा प्रयत्न केला. बाहेरच्या देशात फिरताना तिथली घरं, माती, शेतीच्या पद्धती असे अनेक मुद्दे तिला अनुभवातून आकलन झाले. शाळा नसली तर मित्र- मैत्रिणी नसतील का किंवा ती एकलकोंडी होईल का असाही मुद्दा अनेकांनी मांडला होता. मात्र असं काहीही झालं नाही. आज तिला एकच नाही तर अनेक शाळांमधले मित्र-मैत्रिणी आहेत. शेवटी मैत्री ही परस्पर वागण्यातून जपली जाते. 

 

शाळेचे बंधन नाही,अभ्यासाचा आनंद होता

या निकालाबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली की, 'मला अभ्यास करताना शाळेचे बंधन नाही तर खूप खूप आनंद मिळाला. मी कितीतरी नवीन गोष्टी रोज शिकत होते. मला नाही समजलं तर आम्ही तो विषय समजेपर्यंत शिकत असू. त्यामुळे आज माझ्या सगळ्या संकल्पना स्पष्ट आहेत. मला पहिल्यांदा परीक्षा, पुरवणी, हॉलतिकीट अशा गोष्टी दहावीत समजल्या. आज मिळालेल्या यशात माझ्या इतकाच वाटा आई बाबांचा आहे. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालEducationशिक्षण