शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

बड्यांच्या थकबाकीमुळे बँका अडचणीत : जेटली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 02:24 IST

शेतकरी व लहान व्यावसायिक प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करतात. परंतु बड्या कर्जदारांच्या थकबाकीमुळे बँका अडचणीत आल्या आहेत आणि हे देशासमोरील मोठे आव्हान आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे व्यक्त केले.

पुणे : शेतकरी व लहान व्यावसायिक प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करतात. परंतु बड्या कर्जदारांच्या थकबाकीमुळे बँका अडचणीत आल्या आहेत आणि हे देशासमोरील मोठे आव्हान आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे व्यक्त केले.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा शताब्दी वर्ष सांगता सोहळा येथे पार पडला. या वेळी जेटली बोलत होते. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्षा अर्चना घारे, संचालक अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दिलीप कांबळे, सहकार अपर सचिव एस. एस. संधू,जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, बँकेचे सर्व संचालक, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जेटली म्हणाले, ‘‘शताब्दी वर्षे पूर्ण करणाºया पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एन. पी. ए. शून्य टक्के आहे. बँकेचे ग्राहक, शेतकरी प्रामाणिक पणे कर्ज परतफेड करत असल्यानेच बँकेचा विकास झाला आहे. जिल्हा बँकेने आपल्या ग्राहकांचा विश्वास कमावला, यामुळेच प्रगती होऊ शकतील. देशातील सर्व बँकांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आदर्श घेतल्यास देशाचा विकास होण्यास मदत होईल.’’शरद पवार म्हणाले, ‘‘आज अनेक राष्ट्रीयीकृत बँका सर्वसामान्य व शेतकºयांना दारातदेखीलउभे करत नाही. कर्ज दिलेच तर वसुलीसाठी मात्र लेगच शेतकºयांच्या दारात हजर होतात. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला व शेतकºयाला खºया अर्थाने सक्षम करण्यासाठी सहकारी बँका, विविध कार्यकारी सोसायट्याने पाठबळ देण्याची गरज आहे़’’विविध कार्यकारी सोसायट्यांनी कर्जवाटप न करता व्यापारी तत्त्वावर काम करण्याची गरज आह, असे मत सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.या वेळी अजित पवार, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक संजय भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याने बँकेच्या वतीने अरुण जेटली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या आॅक्टोबर महिन्यात शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करणार आहे. शेतकºयांची दिवाळी गोड करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. परंतु केवळ कर्जमाफी करून शेतकरी सक्षम होणार नाही, तर शेतीमधील गुंतवणूक वाढली पाहिजे व शेतीमालाचा पुनर्वापर व मार्केटिंगदेखील करण्याची गरज आहे. यासाठी शासनाकडून विविध उपाय-योजना राबविण्यात येत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेप्रमाणे शेतकºयांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसे झाल्यास शेतकरी उभा राहील. सहकारी बँका सक्षम करण्यासाठी योग्य पावले उचलली जाणार आहे. या माध्यमातून सहकार चळवळदेखील अधिक सक्षम होईल.

टॅग्स :Puneपुणे