शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

जे. एन. पटेल समिती म्हणजे केवळ धूळफेक - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 02:16 IST

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची विद्यमान न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौैकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला सांगितले होते. मात्र, आता त्यांनी सोयिस्करपणे निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली आहे. यात प्रशासनातील मुख्य सचिवही नेमला असून, मुख्यमंत्र्यांनी केलेली ही केवळ धूळफेक आहे, असे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

पुणे : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची विद्यमान न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौैकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला सांगितले होते. मात्र, आता त्यांनी सोयिस्करपणे निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली आहे. यात प्रशासनातील मुख्य सचिवही नेमला असून, मुख्यमंत्र्यांनी केलेली ही केवळ धूळफेक आहे, असे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आंबेडकर म्हणाले, ‘‘भिडे-एकबोटेंना अटक करण्याऐवजी सरकार वेळ मारून नेत आहे. विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौैकशी व्हावी, तसेच भिडे-एकबोटेंना अटक करावी, या मागणीवर आम्ही ठाम आहोत.’’या समितीबाबत सामाजिक चळवळीतील नेत्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ही दंगल नक्षलवाद्यांनी घडविली, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. आता जी समिती नेमली आहे, ती फक्त याच्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी नेमली आहे का, की नेमकेपणाने चौैकशी करुन भिडे-एकबोटेंवर कारवाई होईल, याबद्दल साशंकता आहे.सरकार भिडे-एकबोटेंना वाचविण्यासाठी तपास यंत्रणा वापरत असून, त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असे रिपब्लिकन जनशक्तीचे नेते अर्जुन डांगळे यांनी सांगितले.सत्यशोधक शेतकरी सभेचे कॉ. किशोर ढमाले म्हणाले, ‘दंगलीच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती स्थापन केली होती. समितीचा वस्तुनिष्ट अहवाल पोलिसांना दिला आहे. सरकारने कारवाई करायला हवी.आज लखनऊमध्ये बैठकसंभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना तत्काळ अटक करावी,महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी तरुण-तरुणींवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात ठेवले आहे, त्यांना तातडीने मुक्त करावे, भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांची मुक्तता करावी आदी मागण्यांसाठी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे उद्या (दि. ११) देशभरातील प्रमुख संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक होत आहे. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल.- अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय नेते, भारिप बहुजन महासंघ

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर