शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

विचारवंतांवर जबाबदारी टाकणे योग्य नव्हे - मोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 05:48 IST

‘भोळे व डॉ. सुमंत स्मृतिपुरस्काराचे वितरण

पुणे : डॉ. भा. ल भोळे, डॉ. यशवंत सुमंत यांच्यासारख्या विचारवंतांनी महाराष्ट्राला वैचारिकदृष्ट्या समृद्ध केले आहे. आजच्या काळात हीच वैचारिकता जतन करणे आवश्यक आहे. मात्र, ती जपण्यात आपण कमी पडतो. केवळ विचार मांडणाऱ्यांवर ती जबाबदारी टाकणे योग्य नाही, असे मत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

यशवंतराव दाते स्मृती संस्था (वर्धा) यांच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा. ल. भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाºया पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. मोरे बोलत होते. डॉ. अरुण शिंदे (कोल्हापूर), ब्रायन लोबो (पालघर) व डॉ. अभय दातार (नांदेड) यांना पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘भोळे स्मृती पुरस्कार’ प्रत्येकी २० हजार रुपये व ‘डॉ. यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार’ प्रत्येकी दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे स्वरूप आहे. या शिवाय ‘भोळे स्मृती वैचारिक साहित्य’ पुरस्कारासाठी सत्यशोधकीयनियतकालिके ग्रंथाचे लेखक कोल्हापूरचे डॉ. अरुण शिंदे यांना गौरविण्यात आले. ‘डॉ. भा. ल. भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता’ पुरस्कारासाठी आदिवासी क्षेत्रात काम करणारे पालघरचे ब्रायन लोबो यांना तर ‘डॉ. यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधन प्रेरणा’ पुरस्कारासाठी नांदेड येथील पीपल्स कॉलेजचे प्रा. डॉ. अभय दातार यांना गौरविण्यात आले. डॉ. चौसाळकर म्हणाले, प्रकाशक, वाचकांचा प्रतिसाद नसल्याने वैचारिक ग्रंथ प्रकाशित होत नाहीत. ते झाले पाहिजेत. सद्यस्थितीत उपस्थित प्रश्नांबाबत स्पष्ट मते मांडली पाहिजेत. कारण प्रश्नांना भिडणे हीच सुमंत, भोळे यांची शिकवण होती.वैचारिक मैत्री दुर्मीळडॉ. मोरे म्हणाले, सर्व प्रकारची मैत्री समाजात होत असताना वैचारिक मैत्री दुर्मीळ होत आहे. वैचारिक परिवार वाढला पाहिजे. समाजात वैचारिकता जोपासणारे वातावरण निर्माण केले पाहिजे. यात आपण कमी पडतो. तरुण अभ्यासकांना प्रोत्साहित केले पाहिजे. हल्ली पुरस्कार प्रक्रियेचे यांत्रिकिकरण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार उठून दिसतो. 

टॅग्स :Sadanand Moreसदानंद मोरेcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक