शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

विचारवंतांवर जबाबदारी टाकणे योग्य नव्हे - मोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 05:48 IST

‘भोळे व डॉ. सुमंत स्मृतिपुरस्काराचे वितरण

पुणे : डॉ. भा. ल भोळे, डॉ. यशवंत सुमंत यांच्यासारख्या विचारवंतांनी महाराष्ट्राला वैचारिकदृष्ट्या समृद्ध केले आहे. आजच्या काळात हीच वैचारिकता जतन करणे आवश्यक आहे. मात्र, ती जपण्यात आपण कमी पडतो. केवळ विचार मांडणाऱ्यांवर ती जबाबदारी टाकणे योग्य नाही, असे मत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

यशवंतराव दाते स्मृती संस्था (वर्धा) यांच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा. ल. भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाºया पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. मोरे बोलत होते. डॉ. अरुण शिंदे (कोल्हापूर), ब्रायन लोबो (पालघर) व डॉ. अभय दातार (नांदेड) यांना पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘भोळे स्मृती पुरस्कार’ प्रत्येकी २० हजार रुपये व ‘डॉ. यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार’ प्रत्येकी दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे स्वरूप आहे. या शिवाय ‘भोळे स्मृती वैचारिक साहित्य’ पुरस्कारासाठी सत्यशोधकीयनियतकालिके ग्रंथाचे लेखक कोल्हापूरचे डॉ. अरुण शिंदे यांना गौरविण्यात आले. ‘डॉ. भा. ल. भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता’ पुरस्कारासाठी आदिवासी क्षेत्रात काम करणारे पालघरचे ब्रायन लोबो यांना तर ‘डॉ. यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधन प्रेरणा’ पुरस्कारासाठी नांदेड येथील पीपल्स कॉलेजचे प्रा. डॉ. अभय दातार यांना गौरविण्यात आले. डॉ. चौसाळकर म्हणाले, प्रकाशक, वाचकांचा प्रतिसाद नसल्याने वैचारिक ग्रंथ प्रकाशित होत नाहीत. ते झाले पाहिजेत. सद्यस्थितीत उपस्थित प्रश्नांबाबत स्पष्ट मते मांडली पाहिजेत. कारण प्रश्नांना भिडणे हीच सुमंत, भोळे यांची शिकवण होती.वैचारिक मैत्री दुर्मीळडॉ. मोरे म्हणाले, सर्व प्रकारची मैत्री समाजात होत असताना वैचारिक मैत्री दुर्मीळ होत आहे. वैचारिक परिवार वाढला पाहिजे. समाजात वैचारिकता जोपासणारे वातावरण निर्माण केले पाहिजे. यात आपण कमी पडतो. तरुण अभ्यासकांना प्रोत्साहित केले पाहिजे. हल्ली पुरस्कार प्रक्रियेचे यांत्रिकिकरण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार उठून दिसतो. 

टॅग्स :Sadanand Moreसदानंद मोरेcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक