शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विचारवंतांवर जबाबदारी टाकणे योग्य नव्हे - मोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 05:48 IST

‘भोळे व डॉ. सुमंत स्मृतिपुरस्काराचे वितरण

पुणे : डॉ. भा. ल भोळे, डॉ. यशवंत सुमंत यांच्यासारख्या विचारवंतांनी महाराष्ट्राला वैचारिकदृष्ट्या समृद्ध केले आहे. आजच्या काळात हीच वैचारिकता जतन करणे आवश्यक आहे. मात्र, ती जपण्यात आपण कमी पडतो. केवळ विचार मांडणाऱ्यांवर ती जबाबदारी टाकणे योग्य नाही, असे मत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

यशवंतराव दाते स्मृती संस्था (वर्धा) यांच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा. ल. भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाºया पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. मोरे बोलत होते. डॉ. अरुण शिंदे (कोल्हापूर), ब्रायन लोबो (पालघर) व डॉ. अभय दातार (नांदेड) यांना पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘भोळे स्मृती पुरस्कार’ प्रत्येकी २० हजार रुपये व ‘डॉ. यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार’ प्रत्येकी दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे स्वरूप आहे. या शिवाय ‘भोळे स्मृती वैचारिक साहित्य’ पुरस्कारासाठी सत्यशोधकीयनियतकालिके ग्रंथाचे लेखक कोल्हापूरचे डॉ. अरुण शिंदे यांना गौरविण्यात आले. ‘डॉ. भा. ल. भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता’ पुरस्कारासाठी आदिवासी क्षेत्रात काम करणारे पालघरचे ब्रायन लोबो यांना तर ‘डॉ. यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधन प्रेरणा’ पुरस्कारासाठी नांदेड येथील पीपल्स कॉलेजचे प्रा. डॉ. अभय दातार यांना गौरविण्यात आले. डॉ. चौसाळकर म्हणाले, प्रकाशक, वाचकांचा प्रतिसाद नसल्याने वैचारिक ग्रंथ प्रकाशित होत नाहीत. ते झाले पाहिजेत. सद्यस्थितीत उपस्थित प्रश्नांबाबत स्पष्ट मते मांडली पाहिजेत. कारण प्रश्नांना भिडणे हीच सुमंत, भोळे यांची शिकवण होती.वैचारिक मैत्री दुर्मीळडॉ. मोरे म्हणाले, सर्व प्रकारची मैत्री समाजात होत असताना वैचारिक मैत्री दुर्मीळ होत आहे. वैचारिक परिवार वाढला पाहिजे. समाजात वैचारिकता जोपासणारे वातावरण निर्माण केले पाहिजे. यात आपण कमी पडतो. तरुण अभ्यासकांना प्रोत्साहित केले पाहिजे. हल्ली पुरस्कार प्रक्रियेचे यांत्रिकिकरण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार उठून दिसतो. 

टॅग्स :Sadanand Moreसदानंद मोरेcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक