शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
2
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
3
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
5
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
6
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
7
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
8
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
9
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
10
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
11
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
12
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
13
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
14
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
15
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
16
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
17
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
18
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
19
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

‘आयटीआय’चा विस्तार रखडला; आराखड्याला मंजुरी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 02:46 IST

तब्बल ६० हजार जागांची वाढ अधांतरी

पुणे : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थे(आयटीआय)चा विस्तार लाल फितीत अडकला आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात राज्य शासनाकडे देण्यात आलेल्या विस्तार आराखड्याला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून अपेक्षित असलेली तब्बल ६० हजार जागांची वाढ सध्या तरी धुसर असल्याचे चित्र आहे.मागील काही वर्षांपासून ‘आयटीआय’कडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत चालला आहे. केंद्र व राज्य शासनाकडूनही व्यवसाय व कौशल्य शिक्षणावर भर दिला जात आहे. त्यामुळे राज्यातील ‘आयटीआय’चे सक्षमीकरण करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मागील वर्षी विस्तार आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यामध्ये तब्बल ६० हजार प्रवेशक्षमता वाढीचा प्रस्ताव आहे. सध्या राज्यात शासकीय ४१७ व खासगी ४९१ आयटीआय आहे. त्यामध्ये अनुक्रमे ९३ हजार ४८१ व सुमारे ४५ हजार एवढी प्रवेशक्षमता आहे. आराखड्याला मंजुरी मिळाल्यास सद्य:स्थितीतील सुमारे १ लाख ३८ हजार प्रवेशक्षमता २ लाखांवर पोहोचणार आहे.प्रामुख्याने शासकीय आयटीआयची क्षमता वाढविण्याचा प्रस्तावित आहे. सध्या राज्यात ४१ आयटीआय तीन सत्रात, २३४ दोन सत्रात, तर १४२ आयटीआय एका सत्रात चालतात. संबंधित आयटीआयमधील पायाभूत सुविधा व क्षमतेनुसार तुकड्या वाढविणे, एका व दोन सत्रातील आयटीआयमध्ये सत्रात वाढ करण्यात येणार आहे; तसेच सध्याच्या ७९ व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये वाढ, बदल करणे, कालसुसंगत अभ्यासक्रम तयार करणे, मागणी नसलेले अभ्यासक्रम बंद करण्याबाबतही आराखड्यात शिफारशी करण्यात आल्या आहेत; तसेच राज्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयातील किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) बंद करण्याबाबतही मागील वर्षी चर्चा करण्यात आली होती. या अभ्यासक्रमांऐवजी येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘आयटीआय’ मधील अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन होते; पण कर्मचारी संघटनांनी विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळल्याचे समजते.आराखड्यावर मे अखेरपर्यंत निर्णय ?लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने मे अखेरपर्यंत आराखड्यावर निर्णय होण्याची शक्यता नाही. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश क्षमतेत होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. दर वर्षी आयटीआयला प्रवेश क्षमतेपेक्षा जवळपास दुप्पट अर्ज प्राप्त होतात. जागेअभावी लाखो विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे प्रवेश क्षमतेत वाढ करण्याची मागणी सातत्याने होत असते.विस्तार आराखडा राज्य शासनाकडे जुलै महिन्यात सादर करण्यात आला आहे; पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आयटीआयच्या विस्तारामुळे शासनावरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तुकड्या वाढ केल्यानंतर, शिक्षकभरती करावी लागणार आहे. त्यामुळे शासनाकडून या आराखड्यावर निर्णय घेण्यास वेळ लागत आहे. शासनाने व्यवसाय शिक्षण विभागाला आकृतिबंध सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आराखडा अद्याप अंतिम झाला नसल्याची माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेज