शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

साडेदहा लाख टन गाळप करणार

By admin | Updated: October 27, 2015 00:45 IST

हंगामात विघ्नहर कारखान्याने १० लाख ५० मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी कारखान्यात गेटकेनचा ऊस आणणार नाही

नारायणगाव : हंगामात विघ्नहर कारखान्याने १० लाख ५० मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी कारखान्यात गेटकेनचा ऊस आणणार नाही. जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील सर्व उसाचे गाळप करण्यात येईल. या हंगामासाठी आपण ३०२ ट्रक/टोळ्या व १२५० टायरगाडीचे नियोजन केलेले आहे. तसेच ५ ऊसतोडणी यंत्रे ऊसतोडणी व वाहतुकीसाठी सज्ज झालेली आहेत, असे मत श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी व्यक्त केले.श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ३०व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. एकरी जास्तीतजास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या ५१ ऊसउत्पादकांच्या हस्ते या हंगामाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकरी १२६ टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकरी कलावती हरिभाऊ चव्हाण या होत्या.या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, सुमित्राताई शेरकर, आमदार शरद सोनवणे, अशोक घोलप, आशाताई बुचके, सुरेखाताई मुंढे, तात्यासाहेब गुंजाळ, संजय काळे, रघुनाथ लेंडे, संगीता वाघ, संतोष वाघ, शिवनेर भूषण विठ्ठलबाबा मांडे, राजाराम महाराज जाधव, नंदूकाका शेरकर, तान्हाजी बेनके, गणेशभाऊ कवडे, गजानन महाराज शिक्षण संस्थेचे वैभव तांबे, राजेंद्र बनकर, अजित काळे, हनुमान हांडे, अजितकाका परदेशी आदी उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने बोलताना शेतकरी मोहन थोरात म्हणाले की, ऊस उत्पादकांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करणे ही संकल्पना अध्यक्ष सत्यशिल शेरकर व संचालक मंडळाने राबवून शेतकऱ्यांना सन्मान दिल्याने आम्ही भारावून गेलो आहे. कारखाना व्यवस्थापनाने केलेल्या या सन्मानामुळे आम्हाला शेती व्यवसायाकरिता अधिक प्रेरणा मिळणार. कलावती चव्हाण म्हणाल्या, गेली ३५ वर्षांपासून मी काळ्या आईची सेवा म्हणून शेती व्यवसाय करीत आहे. कारखाना व्यवस्थापनाकडून ऊसपीक व्यवस्थापनाबद्दल होत असलेल्या मार्गदर्शनामुळेच मी विक्रमी ऊस उत्पादन घेऊ शकले. कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर आणि संचालक मंडळाकडून आमचा बहुमान केला त्याबद्दल धन्यवाद. सुहास शेटे यांनी सूत्रसंचालन केले, तर अशोक घोलप यांनी आभार मानले. (वार्ताहर)