शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

साडेदहा लाख टन गाळप करणार

By admin | Updated: October 27, 2015 00:45 IST

हंगामात विघ्नहर कारखान्याने १० लाख ५० मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी कारखान्यात गेटकेनचा ऊस आणणार नाही

नारायणगाव : हंगामात विघ्नहर कारखान्याने १० लाख ५० मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी कारखान्यात गेटकेनचा ऊस आणणार नाही. जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील सर्व उसाचे गाळप करण्यात येईल. या हंगामासाठी आपण ३०२ ट्रक/टोळ्या व १२५० टायरगाडीचे नियोजन केलेले आहे. तसेच ५ ऊसतोडणी यंत्रे ऊसतोडणी व वाहतुकीसाठी सज्ज झालेली आहेत, असे मत श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी व्यक्त केले.श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ३०व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. एकरी जास्तीतजास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या ५१ ऊसउत्पादकांच्या हस्ते या हंगामाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकरी १२६ टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकरी कलावती हरिभाऊ चव्हाण या होत्या.या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, सुमित्राताई शेरकर, आमदार शरद सोनवणे, अशोक घोलप, आशाताई बुचके, सुरेखाताई मुंढे, तात्यासाहेब गुंजाळ, संजय काळे, रघुनाथ लेंडे, संगीता वाघ, संतोष वाघ, शिवनेर भूषण विठ्ठलबाबा मांडे, राजाराम महाराज जाधव, नंदूकाका शेरकर, तान्हाजी बेनके, गणेशभाऊ कवडे, गजानन महाराज शिक्षण संस्थेचे वैभव तांबे, राजेंद्र बनकर, अजित काळे, हनुमान हांडे, अजितकाका परदेशी आदी उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने बोलताना शेतकरी मोहन थोरात म्हणाले की, ऊस उत्पादकांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करणे ही संकल्पना अध्यक्ष सत्यशिल शेरकर व संचालक मंडळाने राबवून शेतकऱ्यांना सन्मान दिल्याने आम्ही भारावून गेलो आहे. कारखाना व्यवस्थापनाने केलेल्या या सन्मानामुळे आम्हाला शेती व्यवसायाकरिता अधिक प्रेरणा मिळणार. कलावती चव्हाण म्हणाल्या, गेली ३५ वर्षांपासून मी काळ्या आईची सेवा म्हणून शेती व्यवसाय करीत आहे. कारखाना व्यवस्थापनाकडून ऊसपीक व्यवस्थापनाबद्दल होत असलेल्या मार्गदर्शनामुळेच मी विक्रमी ऊस उत्पादन घेऊ शकले. कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर आणि संचालक मंडळाकडून आमचा बहुमान केला त्याबद्दल धन्यवाद. सुहास शेटे यांनी सूत्रसंचालन केले, तर अशोक घोलप यांनी आभार मानले. (वार्ताहर)