शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

ज्याच्या विरोधात लढलो त्याचाच प्रचार करण्याची वेळ : सत्यजित तांबे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 13:05 IST

सत्यजित तांबे यांनी २०१४ साली संग्राम जगताप यांच्या विरोधात अहमदनगरमध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती.

ठळक मुद्देतरी आघाडीचा धर्म पाळणार आणि काहीही करून जगताप यांनी निवडून आणणार

पुणे : ज्याच्या विरोधात लढलो त्याचा प्रचार करण्याची वेळ आगामी लोकसभा निवडणुकीत माझ्यावर आली आहे.अशावेळी नगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणे माझ्या किती जीवावर येत असेल अशा शब्दांत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली.पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप आणि इतर पक्षांनी एकत्र येऊन संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी व्यासपीठावर काँग्रेस राष्ट्रीय युवक अध्यक्ष केशवचंद्र यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, शेकापच्या चित्रलेखा पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. सत्यजित तांबे यांनी २०१४ साली संग्राम जगताप यांच्या विरोधात अहमदनगरमध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत जगताप यांच्याकडून तांबे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. दरम्यान , यांनी नगरमध्ये काम करणेही थांबवले आहे. या बैठकीत त्यांनी व्यक्त केलेल्या वक्तव्यांवरुन 2014साली झालेला पराभव अजूनही त्यांच्या किती जिव्हारी लागला असल्याचे दिसून आले.  तांबे म्हणाले , ज्यांच्या विरोधात मी विधानसभा लढलो आता त्यांचा प्रचार करणं माझ्या जीवावर आले असले तरीही आम्ही आघाडीचा धर्म पाळणार आहोत. आणि काहीही करून जगताप यांनी निवडून आणणार आहोत.दक्षिण नगर लोकसभेची लढत ही महाराष्ट्रातल्या सर्वांत प्रतिष्ठेची लढत मानली जात आहे. यात राष्ट्रवादीच्या जगताप यांच्यासमोर काँग्रेस ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाजपमध्ये गेलेले चिरंजीव डॉ सुजय विखे पाटील यांचे आव्हान आहे.अशावेळी तांबे यांचे हे वक्तव्य आश्चर्यकारक मानले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणSatyajit Tambeसत्यजित तांबेcongressकाँग्रेसSangram Jagtapआ. संग्राम जगतापLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक