शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

उन्माद वाढवणे देशहिताचे नाही!- कुमार सप्तर्षी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 02:55 IST

देश सर्वांचा आहे ही भावना जपायला हवी. आपण मुस्लीमद्वेष करणार, तिकडून हिंदूद्वेष होणार हे देशासाठी हिताचे नाही.

- कुमार सप्तर्षीदेश सर्वांचा आहे ही भावना जपायला हवी. आपण मुस्लीमद्वेष करणार, तिकडून हिंदूद्वेष होणार हे देशासाठी हिताचे नाही. निसर्गत: पर्यावरणासाठी दोन्ही देश एकमेकांवर अवलंबून आहेत. द्वेषभावना विसरून दोन्ही देशांनी एक युनिट केले, तर कितीतरी चांगल्या गोष्टींना चालना देता येऊ शकते.राज्यात संपूर्ण भारतीय जनतेला युद्धज्वर चढल्याचे दिसते आहे. ते साहजिकही आहे. देशप्रेमाची भावना त्यावरच पोसली गेली असेल, तर दुसरे काहीही होणार नाही. द्वेषाच्या आधारावरची कोणतीही विचारसरणी टिकणारी नसते, तसेच धर्माच्या आधारावरचीही टिकत नाही.सीआरएफचे जे ४२ जवान शहिद झाले त्यात कोणी एकाच धर्माचे होते का? हिंसा कधीच यशस्वी होत नाही हे आपल्याकडे गौतम बुद्धांनी कितीतरी वर्षांपूर्वी सांगितले. महात्मा गांधींचा विचार जगभरात मान्य होतो याचे कारणही हेच आहे. द्वेषभावना संपवली पाहिजे. आपण आपल्या सीमांचा तरी विचार करणार आहोत की नाही. हिमालय वगळता अन्य सर्व ठिकाणी आपल्या सीमा वेगवेगळ्या धर्मांनी बांधल्या गेलल्या आहेत. लडाख बौद्ध, नॉर्थ इस्ट ख्रिश्चन असे आहे. म्हणून तरी आपण द्वेषभावना सोडायला हवी.इंदिरा गांधी यांनी अणुबॉम्ब तीन तासात तयार करता येईल अशा स्थितीपर्यंत आणला, मात्र तयार केला नाही. अटलबिहारी वाजपेयी यांनी तो तयार केला व त्यानंतर पाकिस्ताने तो पंधरा दिवसात बनवला. त्यांच्याकडे तीन शहरे आहेत, आपल्याकडे पाच शहरे आहेत, ज्यावर दोन्ही देश केवळ अडीच मिनिटात बॉम्ब टाकू शकतात. त्यांचे १ कोटी लोक जातील,आपले ४५ कोटी जातील. इतके हे भयानक आहे. उन्माद वाढवता कामा नये, त्यात विनाश आहे.>युद्धापेक्षा चांगली शांतीवार्ताच१९९१ व २००८ साली भारतीय अर्थव्यवस्था संकटात होती, तरीही भारत सरकारने रिझर्व्ह बँकेकडे रिझर्व्ह कोटा म्हणून असलेली मागितला नाही. २०१८-१९ साली भारत सरकारने तो कोटा मागितला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी घरगुती कारणे सांगून राजीनामा दिला; परंतु, रिझर्व्ह कोटा दिला नाही. नवीन गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रिझर्व्ह बँकेचा रिझर्व्ह कोटा भारत सरकारला दिला. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था १९९१ व २००८ पेक्षा वाईट आहे. भारत सरकारला एक लाख सैन्य कपात करायची आहे. या स्थितीत युद्ध मुर्खपणा आहे. पाकिस्तानी अर्थव्यवस्था भारतापेक्षा वाईट आहे. म्हणून दोघांसाठी युद्धा पेक्षा शांतिवार्ताच चांगली आहे.- झेनझो कुरिटा,१०४, रेल्वे लाईन, सोलापूर.>डोकं ठिकाणावरठेवून विचार कराउद्या जर भारत-पाक युद्ध झाले आणि दोन्ही देशांनी त्यांच्या एक तृतीयांश न्युक्लीअर बॉम्बचा (१००) वापर केला तरी दोन कोटींपेक्षा जास्त नागरिक मरतील आणि अर्धा ओझोनचा थर नष्ट होईल. ज्यामुळे अल्ट्राव्हायोलेट किरणांचा शिरकाव थेट पृथ्वीच्या वातावरणात होईल. त्यामुळे कॅन्सरसारख्या अनेक आजारांबरोबर पृथ्वीच्या तापमानात प्रचंड वाढ होईल. त्यामुळे जगभरात दोन अब्ज नागरिक प्रभावित होतील. भारतीय उपखंडात ज्यामुळे सुबत्ता आहे तो मान्सून नष्ट होऊ शकतो. त्यामुळे युद्धखोरीची भाषा करणारी माध्यमं आणि करमणूक म्हणून युद्धाकडे बघणाऱ्यांनी युद्ध झालं तर काय होईल, हा विचार जरा आपल डोकं ठिकाणावर ठेऊन करावा.- शिवराज दिलीप बालघरेचिंचोली, देहूरोड, जि. पुणे.

टॅग्स :Kumar Saptarshiकुमार सप्तर्षी