शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदासांचा वारसा असणारे नेतृत्व महाराष्ट्राला नाही, हे दुर्दैव - स्वामी गोविंददेवगिरी महाराज

By नितीश गोवंडे | Updated: April 30, 2023 15:08 IST

छत्रपती संभाजीनगरच्या नामकरणानंतर राज्य आनंदाने बहरुन जायला हवे होते, पण ते नामकरणही काही लोकांच्या पोटात दुखतय

पुणे : समर्थ रामदासांवर प्रेम करणाऱ्यांची आज आवश्यकता आहे. जात, भाषा, संप्रदायाच्या माध्यमातून आज जे जे लोक येत आहेत, ते तोडण्याची भाषा करत आहेत. ही महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठी खंत आहे. समर्थांसारखा परिपूर्ण ज्ञानाचा साठा कुठेही मिळणार नाही, हे समजणे गरजेचे आहे. आपल्या राज्यात अजूनही औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे लोक आहेत. छत्रपती संभाजीनगरचे नामकरण झाले तेव्हा काही लोकांच्या पोटात दुखले. जल्लोषही करता आला नाही, अशी खंत स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी येथे व्यक्त केली.

समर्थ व्यासपीठाच्या वतीने समर्थव्रती दिवंगत सुनीलदादा चिंचोलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, ‘शिवसमर्थ पुरस्कार’ तुळजापूर येथील शिवसमर्थ भक्त दादासाहेब जाधव यांना प्रदान करण्यात आला. शिवसमर्थ पुरस्कार, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, तुळशीरोप आणि ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी स्वामी गोविंददेवगिरी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, आपल्या देशाचे तुकडे व्हावेत यासाठी गेली १५० वर्षे आंतराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न होत आहेत, त्याला खतपाणी घालणारे हस्तक आजही महाराष्ट्रात आहेत. काय झालय या महाराष्ट्राला कळत नाही असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदासांचा वारसा असणाऱ्या या राज्याला पुढे त्यांच्यासारखे नेतृत्व मिळाले नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रात एकी असती तर देशासाठी त्याचा उपयोग झाला असता. औरंगजेबाला पापी म्हणताना इथली मंडळी घाबरतात, छत्रपती संभाजीनगरचे नामकरण झाले तेव्हा राज्य आनंदाने बहरुन जायला हवे होते. पण ते नामकरणही काही लोकांच्या पोटात दुखत आहे, म्हणून जल्लोष मोठ्या प्रमाणावर केला नाही, अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. या पुरस्कार समारंभावेळी समर्थ संस्थानचे विश्वस्त बाळासाहेब स्वामी, समर्थ व्यासपीठच्या अध्यक्षा डॉ. माधवी महाजन यांची उपस्थिती होती. या वेळी डॉ. पराग मांडकीकर यांनी ‘समर्थ रामदास स्वामी’ यांच्यावर बनवलेल्या वेबसाईट (www.samarthramdas400.in) आणि मोबाइल अ‍ॅपचे उदघाटन करण्यात आले.  

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShri Parshvnath Mandirश्री पार्श्वनाथ मंदिर