शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदासांचा वारसा असणारे नेतृत्व महाराष्ट्राला नाही, हे दुर्दैव - स्वामी गोविंददेवगिरी महाराज

By नितीश गोवंडे | Updated: April 30, 2023 15:08 IST

छत्रपती संभाजीनगरच्या नामकरणानंतर राज्य आनंदाने बहरुन जायला हवे होते, पण ते नामकरणही काही लोकांच्या पोटात दुखतय

पुणे : समर्थ रामदासांवर प्रेम करणाऱ्यांची आज आवश्यकता आहे. जात, भाषा, संप्रदायाच्या माध्यमातून आज जे जे लोक येत आहेत, ते तोडण्याची भाषा करत आहेत. ही महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठी खंत आहे. समर्थांसारखा परिपूर्ण ज्ञानाचा साठा कुठेही मिळणार नाही, हे समजणे गरजेचे आहे. आपल्या राज्यात अजूनही औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे लोक आहेत. छत्रपती संभाजीनगरचे नामकरण झाले तेव्हा काही लोकांच्या पोटात दुखले. जल्लोषही करता आला नाही, अशी खंत स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी येथे व्यक्त केली.

समर्थ व्यासपीठाच्या वतीने समर्थव्रती दिवंगत सुनीलदादा चिंचोलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, ‘शिवसमर्थ पुरस्कार’ तुळजापूर येथील शिवसमर्थ भक्त दादासाहेब जाधव यांना प्रदान करण्यात आला. शिवसमर्थ पुरस्कार, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, तुळशीरोप आणि ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी स्वामी गोविंददेवगिरी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, आपल्या देशाचे तुकडे व्हावेत यासाठी गेली १५० वर्षे आंतराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न होत आहेत, त्याला खतपाणी घालणारे हस्तक आजही महाराष्ट्रात आहेत. काय झालय या महाराष्ट्राला कळत नाही असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदासांचा वारसा असणाऱ्या या राज्याला पुढे त्यांच्यासारखे नेतृत्व मिळाले नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रात एकी असती तर देशासाठी त्याचा उपयोग झाला असता. औरंगजेबाला पापी म्हणताना इथली मंडळी घाबरतात, छत्रपती संभाजीनगरचे नामकरण झाले तेव्हा राज्य आनंदाने बहरुन जायला हवे होते. पण ते नामकरणही काही लोकांच्या पोटात दुखत आहे, म्हणून जल्लोष मोठ्या प्रमाणावर केला नाही, अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. या पुरस्कार समारंभावेळी समर्थ संस्थानचे विश्वस्त बाळासाहेब स्वामी, समर्थ व्यासपीठच्या अध्यक्षा डॉ. माधवी महाजन यांची उपस्थिती होती. या वेळी डॉ. पराग मांडकीकर यांनी ‘समर्थ रामदास स्वामी’ यांच्यावर बनवलेल्या वेबसाईट (www.samarthramdas400.in) आणि मोबाइल अ‍ॅपचे उदघाटन करण्यात आले.  

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShri Parshvnath Mandirश्री पार्श्वनाथ मंदिर