शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

३७० कलम रद्द झाल्यानंतर तेथील नागरिकांची काळजी घेणे हे सरकारचे आणि देशवासियांचे कर्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 21:03 IST

३७० कलम रद्द होऊन चार-पाच महिने उलटल्यानंतरही काश्मीरमधील स्थिती अद्याप पूर्वपदावर आलेली नाही.

ठळक मुद्देदहशतवादी कारवाया घडण्याची, लष्करापुढील आव्हाने वाढण्याची शक्यता

पुणे : काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये, विशेषत:, काश्मीर खो-यामध्ये पडसाद उमटले. कलम रद्द करताना अथवा तत्सम कोणताही निर्णय घेताना काश्मीरमधील स्थानिल लोकांना विश्वासात घेतले पाहिजे, ही भूमिका सरहद संस्थेने सुरुवातीपासून घेतली होती. आजारी माणसाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याची काळजी घेतली जाते. त्याच्या शरीराचा कमकुवत झालेला भाग सशक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातात, दूध-फळे दिली जातात. त्याचप्रमाणे, ३७० कलम रद्द झाल्यानंतर तेथील नागरिकांची काळजी घेणे हे सरकारचे आणि देशवासियांचे कर्तव्य आहे असे मत संजय नहार यांनी व्यक्त केले. 

भारत हा आपला देश आहे आणि आपण या देशाचे नागरिक असल्याचा काश्मीरमधील लोकांना अभिमान वाटावा, अशा प्रकारची कृती आणि कार्यवाही सरकारकडून अपेक्षित आहे. त्या दिशेने जाणे अत्यावश्यक आहे. मात्र, सरकार यामध्ये कमी पडत आहे. स्थानिक माणसांचा सन्मान करणे, त्यांना रोजगार मिळवून देणे, ऐतिहासिक वारसा जपणे आणि कणखर नेतृत्व देणे यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा. काश्मीरमधील जमिनी बळकवल्या जातील, अशी भीती तेथे उत्पन्न झाली आहे. यातून बाहेर पडून काश्मीरमधील लोकांचा विकास केंद्रस्थानी असला पाहिजे.सरहद संस्थेतर्फे काश्मीरमधील शेतक-यांना बाजारपेठ मिळवून देणे, कलावंतांना, कारागिरांना व्यवसाय वृध्दिंगत करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे अशा स्वरुपाचे प्रयत्न केले जात आहेत. आमच्या प्रयत्नांची व्याप्ती मर्यादित आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न व्यापकतेने झाल्यास काश्मीरमधील सामान्य लोकांना काहीसा दिलासा मिळू शकेल. काश्मीरमधील विकासासाठी एखादा प्रयत्न अथवा उपक्रम न राबवता, त्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले पाहिजेत. हा देश आपला नाही, अशी भावना त्यांच्या मनात चुकूनही निर्माण होता कामा नये.३७० कलम रद्द होऊन चार-पाच महिने उलटल्यानंतरही काश्मीरमधील स्थिती अद्याप पूर्वपदावर आलेली नाही. अजूनही बाजारपेठा पूर्णपणे सुरु झालेल्या नाहीत, पर्यटन व्यवसायात मंदी आहे, अनेकांचे रोजगार गेले आहेत. काश्मीरमधील लोकांना जगण्याचा संघर्ष सुरु आहे. तरुण नव्याने दहशतवादाकडे वळू लागले आहेत. दहशतवादी कारवाया घडण्याची, लष्करापुढील आव्हाने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील लोकांना विश्वासात घेऊन, विकासावर भर देऊन सातत्याने प्रयत्न करत रहावे लागणार आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात सामील करुन घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे. तरुणांना सुरक्षित वातावरण मिळावे, व्यासपीठ मिळावे, यासाठी काम करणे गरजेचे आहे. 

टॅग्स :PuneपुणेJammu Kashmirजम्मू-काश्मीरSanjay Naharसंजय नहारGovernmentसरकार