शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

सिंचन, वारीसाठी चार टीएमसी पाणी

By admin | Updated: July 10, 2015 01:22 IST

धरणसाखळीच्या धरणांमधील असलेल्या साडेसात टीएमसी पाणी साठ्यातील तब्बल ४ टीएमसी पाणी जिल्ह्यातील सिंचन तसेच वारीसाठी सोडण्यात येणार आहे.

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या धरणांमधील असलेल्या साडेसात टीएमसी पाणी साठ्यातील तब्बल ४ टीएमसी पाणी जिल्ह्यातील सिंचन तसेच वारीसाठी सोडण्यात येणार आहे. उर्वरीत पाणी शहराच्या पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असून हे पाणी शहरास आॅगस्ट अखेरपर्यंत पुरेल एवढे आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पुण्यासह राज्यात जोरदार हजेरी लावलेल्या मान्सूनने गेल्या महिन्याभरापासून दडी मारली आहे. पहिलाच्य आठवड्यात झालेल्या या पावसाने शहराच्या पाणी साठ्यात तब्बल ५ टीएमसीने वाढ झाल्याने धरणातील पाणीसाठा ७.३० टीएमसीवर पोहचला आहे. पण पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके ही धोक्यात आली आहेत. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर, वसरगाव या धरणक्षेत्रातही पाऊस बंद आहे. जून महिन्यात काही दिवस चांगला पाऊस झाल्याने या चारीही धरणसाठ्यातील पाण्याच्या नियोजनासंदर्भात गुरुवारी महापौर दत्तात्रेय धनकवडे यांनी महापालिकेचे अधिकारी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे धनकवडे यांनी सांगितले. या बैठकीस नगर अभियंता प्रशांत वाघमारे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, पाणी पुरवठा विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी उपस्थित होते. (प्रतिनिधी)