शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

सिंचन, वारीसाठी चार टीएमसी पाणी

By admin | Updated: July 10, 2015 01:22 IST

धरणसाखळीच्या धरणांमधील असलेल्या साडेसात टीएमसी पाणी साठ्यातील तब्बल ४ टीएमसी पाणी जिल्ह्यातील सिंचन तसेच वारीसाठी सोडण्यात येणार आहे.

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या धरणांमधील असलेल्या साडेसात टीएमसी पाणी साठ्यातील तब्बल ४ टीएमसी पाणी जिल्ह्यातील सिंचन तसेच वारीसाठी सोडण्यात येणार आहे. उर्वरीत पाणी शहराच्या पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असून हे पाणी शहरास आॅगस्ट अखेरपर्यंत पुरेल एवढे आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पुण्यासह राज्यात जोरदार हजेरी लावलेल्या मान्सूनने गेल्या महिन्याभरापासून दडी मारली आहे. पहिलाच्य आठवड्यात झालेल्या या पावसाने शहराच्या पाणी साठ्यात तब्बल ५ टीएमसीने वाढ झाल्याने धरणातील पाणीसाठा ७.३० टीएमसीवर पोहचला आहे. पण पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके ही धोक्यात आली आहेत. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर, वसरगाव या धरणक्षेत्रातही पाऊस बंद आहे. जून महिन्यात काही दिवस चांगला पाऊस झाल्याने या चारीही धरणसाठ्यातील पाण्याच्या नियोजनासंदर्भात गुरुवारी महापौर दत्तात्रेय धनकवडे यांनी महापालिकेचे अधिकारी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे धनकवडे यांनी सांगितले. या बैठकीस नगर अभियंता प्रशांत वाघमारे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, पाणी पुरवठा विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी उपस्थित होते. (प्रतिनिधी)