शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

वढूतील घटनेची चौकशी व्हावी! - मराठा क्रांती मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 03:49 IST

वढू येथील घटनेची सखोल चौकशी करून त्याच्या मुळाशी असणाºयांवर कडक कारवाई करावी, यावरून झालेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना सरकारने २५ लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशा मागण्या करतानाच मराठा समाजाला शांतता राखण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे - वढू येथील घटनेची सखोल चौकशी करून त्याच्या मुळाशी असणाºयांवर कडक कारवाई करावी, यावरून झालेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना सरकारने २५ लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशा मागण्या करतानाच मराठा समाजाला शांतता राखण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.वढूतील घटनेनंतर दोन समाजांतील गट समोरासमोर उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बुधवारी विविध संघटनांनी राज्यव्यापी बंद पुकारला होता. या पार्श्वभूमीवर, मराठा क्रांती मोर्चाची बैठक शिवाजीनगर येथे झाली. तीत मराठा समाजाला कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत आवाहन करणारा ठराव झाला. संघटनेचे शांताराम कुंजीर, राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, तुषार काकडे या वेळी उपस्थित होते. वढू येथे उसळलेल्या संघर्षात शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील एका तरुणाला जीव गमवावा लागला. कोरेगाव भीमा व नगर रस्त्यावरील नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.ग्रामस्थांनी पूर्वकल्पना देऊनही पोलीस प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली नाही. अशा पोलीस अधिकाºयांवर कारवाई करावी, समाजमाध्यमांद्वारे तेढ निर्माण करणाºयांना अटकाव करावा, अशा मागण्या मोर्चाने केल्या.सर्वांनीच राज्यघटनेचे पालन करावे, कायदा हातात घेऊ नये, शासकीय मालमत्तेचे नुकसान करू नये, असे आवाहन या वेळी करण्यात आले.बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी हालअपेष्टा सोसणाºया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी राज्यातील शाळा-महाविद्यालयेबंद राहिली, याचा खेद व्यक्त करण्यात आला.यातील मृतांच्या वारसांना२५ लाख रुपये द्यावेत आणि मालमत्तेची नुकसानभरपाई मिळावी, अशा मागण्या मराठा मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या. दंगलखोरांना शोधून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंद