शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

जनहित का ठेकेदाराचे हित? : महापालिकेकडून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 14:23 IST

गेल्या सहा महिन्यांपासून नगररस्त्यावरील पदपथ तोडून पुन्हा नव्याने उभारण्याचे काम सुरू आहे...

ठळक मुद्देसुस्थितीतील पदपथ उध्वस्त खराडी बायपास ते चंदननगर दरम्यानचा उत्तम दर्जाचा पदपथ तोडून तो नवीन करण्याचा घाट

- विशाल दरगुडे - चंदननगर : कधी कधी महानगरपालिकेचे अधिकारी जनहिताची कामे करतात की ठेकेदाराची कामे करतात हेच कळत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, नगररस्त्यावर बायपास ते चंदननगर दरम्यान असलेला उत्तमदर्जाचा पदपथ तोडून पुन्हा नव्याने पदपथ तयार करण्याचे काम सुरू केले आहे. यापूर्वी नगररस्त्यावर जवळपास पदपथ पूर्ण करण्यात आलेले आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून नगररस्त्यावरील पदपथ तोडून पुन्हा नव्याने उभारण्याचे काम सुरू आहे.  विमाननगरपासून ते खुळेवाडी फाटा दरम्यान चांगले पदपथ सोडून पुन्हा नव्याने पदपथ तयार करण्यात आला आहे; मात्र ते गरज नसतानाही ही केवळ टक्केवारीसाठी हे अधिकारी ठेकेदारांचे भलं करण्यासाठी स्वत:चं भलं करण्यासाठी चांगले पदपथ तोडून पुन्हा नव्याने पदपथ तयार करून, जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत आहे; मात्र जे केलं ते केलं मात्र पुन्हा पुण्याच्या दिशेने जाताना बायपास ते चंदननगर दरम्यान असलेला उत्तम दर्जाचा पदपथ सध्या तोडण्याचे काम जोरात सुरू आहे, हे करत असताना प्रश्न पडतो की, एवढे चांगले पदपथ हे अधिकारी का तोडत आहे, त्याचे उत्तर म्हणजे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातलं साटंलोटं असून ते सर्वसामान्यांच्या कररूपातून येणाऱ्या पैशाची उधळपट्टी करत आहे.  असे नगररस्त्यावर सातत्याने गेल्या वर्षभरात दिसून येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे असून तसे न झाल्यास सातत्याने चांगली कामे ठेकेदारांसाठी पुन्हा तोडायची, ती पुन्हा करायची, पुन्हा तोडायची, पुन्हा करायची अशी परिस्थिती असून यावर कोणी अंकूश ठेवणार कि नाही ?.......अधिकारी ठेकेदारांसाठी काम करतात ?नगररस्त्यावर खराडी बायपास ते चंदननगर दरम्यानचा उत्तम दर्जाचा पदपथ तोडून तो नवीन करण्याचा घाट घातला आहे, हे करत असताना प्रश्न असा पडतो की, या पदपथाचा अतिशय कमी  नागरिक वापर करत असताना त्याची कुठल्याही प्रकारची  झीज झाली नसताना तो का तोडत आहे, त्याचे उत्तर असे आहे की, अधिकाºयांसाठी हे जनहिताचे नसून, ते ठेकेदारहिताचे आहेत........पदपथ जुना झाला म्हणजे खराब झाला का ?नगररस्त्यावर चांगले पदपथ तोडून नव्याने जर पदपथ तयार करायचे काम चालू असेल, तर काय समजावे, असा प्रश्न पडतो. नगररस्त्यावरील चांगले उत्तम दर्जाचे पदपथ असून, ते केवळ जुने झाले म्हणून खराब झाले, असा अर्थ लावून जर ते तोडले जात असतील, तर ते अतिशय चुकीचे असून याला महापालिकेचे अधिकारी जर असे करत असतील, तर नागरिकांच्या कररूपाच्या पैशाची उधळपट्टी आहे. असेच म्हणावे लागेल. कारण, एवढे चांगले पदपथ तोडून विनाकारण नवीन पदपथ तयार करून, जुन्या चांगल्या पदपथांवर केलेला खर्च वाया घालविला आहे.

टॅग्स :PuneपुणेChandan NagarचंदननगरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका