शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

मुलाखत : अभिजाततेच्या ऊंबरठ्यावरच थबकली मराठी : शंकर सारडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 07:00 IST

पहिला ह. मो. मराठे स्मृतीगौरव पुरस्कार प्रसिद्ध समीक्षक शंकर सारडा यांना जाहीर...

- प्रसिद्ध लेखक ह. मो. मराठे यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात येणारा पहिला ह. मो. मराठे स्मृतीगौरव पुरस्कार प्रसिद्ध समीक्षक शंकर सारडा यांना जाहीर झाला आहे. रविवारी (दि. ६) सायंकाळी ५ वाजता कोथरूडमथील मयूर कॉलनी येथील ज्ञानमयी सभागृहात या पुरस्काराचे वितरण होत आहे. त्यानिमित्त सारडा यांच्याबरोबर राजू इनामदार यांनी केलेली बातचीत.

-------------साहित्यसृष्टीत समीक्षकांचा नेहमीच दबदबा राहिला आहे. शंकर सारडा हे त्यातले एक नाव. सारडा यांनी आपल्या पुस्तकावर लिहावे, कुठेतरी काहीतरी बोलावे यासाठी अनेक नवोदित तसेच मान्यताप्राप्त जुन्याही साहित्यिकांची धडपड चाललेली असायची. वृत्तपत्रांच्या साप्ताहिक पुरवण्यांना साहित्याची जोड देण्यात सारडा यांचे योगदान फार मोठे आहे. त्यापुर्वी वृत्तपत्रांच्या या पुरवण्या म्हणजे विचारी, राजकीय, सामाजिक अशा लेखांनी म्हणजे थोडक्यात रटाळ असायच्या. वृत्तपत्रांच्या साप्ताहिक पुरवणीला वाचनियता, रंजकता दिली ती सारडा यांनी. त्यात लेखक, त्यांची प्रतिभा, पुस्तके, त्यांचे समीक्षण असा मजकूर येऊ लागला व त्यांचे स्वरूपच बदलले.गेल्या काही वर्षात सारडा प्रकाशाआड गेले आहेत. जाहीर कार्यक्रमांमधून त्यांची उपस्थिती जवळपास नसतेच. लिखाणही कमी झाले आहे. वृद्धत्व व आजारपण यामुळे ते फारसे कोणात मिसळतही नाहीत. अशा वेळी एका साहित्यसंस्थेला त्यांची, त्यांनी केलेल्या कामाची आठवण व्हावी, ही साहित्यप्रेमींसाठी आनंदाची गोष्ट. यानिमित्ताने त्यांच्याशी बोलताना वयाच्या ८२ व्या वर्षीही त्यांच्या साहित्यिक जाणीवा अद्यापही तल्लख असल्याचे जाणवले. 

परदेशी लेखकांच्या तुलनेत मराठी लेखक कुठे दिसतात तुम्हाला?--  परदेशी लेखकांचे अनूभवविश्व अमर्यादीत असते व ते लेखनात प्रतिबिंबीत होते हा मला जाणवणारा फरक आहे. ज्यूल्स व्हर्न नावाचे एक लेखक होता. त्याने बलूनमधून पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचा प्रयत्न केला. पाणबुडीतून समुद्राखालचे जग शोधण्यासाठी तो समुद्रात उतरला. त्यानंतर पृथ्वीचा मध्यभाग शोधायचे वेड त्याला जडले व तेही त्याने केले. या सगळ्या अनुभवांवर त्याने पुस्तके लिहिली. ती गाजली. मला सांगा आपल्याकडे असे कोणी करेल का? मानवी जीवनातील भावभावना टिपणे हे चांगलेच असते, पण त्यालाही आपल्याकडे मर्यादा आहे. काही विशिष्ट संबधांच्या पलिकडे कोणी जातानाच दिसत नाही. फिरले पाहिजे, माणसे वाचली पाहिजेत, जग पाहिले पाहिजे  ते लेखनातून आणण्याचा प्रयत्नही केला पाहिजे.

असे आपल्याकडे कोणी केलेले आठवते का?- अंदाजाने सांगायचे म्हटले तरी मी आतापर्यंत किमान ४ हजार पुस्तके वाचली. त्यातल्या किमान ३ हजार तरी पुस्तकांवर मी थोडेफार लिहिले. त्यात अर्थातच इंग्रजी वगैरे पुस्तके आहेत, मात्र मला मराठीत हाताच्या बोटावर सांगता येतील इतकीच पुस्तके लक्षात ठेवावीत अशी आढळली. झाडाझडती (विश्वास पाटील), बालकांड (ह. मो. मराठे), वाईज अदरवाईज (सुधा मुर्ती) ही व अशी आणखी काही सांगता येतील. अर्थातच हे माझे वैयक्तिक मत म्हणून घ्या, पण डोके बधीर करील, मन सुन्न करील असे काही नाही.इतकी वाईट अवस्था आहे?-  मी असे म्हटलेले नाही. मराठीतही अनेक चांगले लेखक आहेत.

कोणते लेखक तुम्हाला असे आवडले? -  ‘हिंदू.’  ही मला अलीकडच्या काळात भावलेली कांदबरी आहे. तिचा दुसरा खंडही येतोय म्हणे. रंगनाथ पठारे यांचीही एक कांदबरी (इथे मी तिचे सातपाटील कुलवृत्तांत हे नाव सांगितले, पण त्यांचे लक्ष नव्हते) आली आहे असे कळले.अलीकडे माझे वाचन होत नाही फार, पण विजय तेंडूलकरांसारखे लेखक माझ्या लक्षात आहेत. पठारे यांचेही मी बरेच वाचले आहे. मला असे म्हणावेसे वाटते आहे की अभिजाततेच्या उंबरठ्यावरच मराठी थबकली आहे. काळाच्या कसोटीवरही टिकेल असे साहित्य निर्माण करण्याच्या उंबरठ्यापर्यंत मराठीत अनेकजण पोहचले, काहींनी आत पाऊलही टाकले पण आत प्रवेश केला आहे असे प्रकर्षाने वाटले नाही.

आताच्या मराठी साहित्याबद्दल तुमचे मत काय?-  अलीकडे माझे वाचन जवळपास होतच नाही. मनन मात्र चाललेले असते. मराठीतील साहित्य इतर भाषांमध्ये पोहचायला हवे, याबाबत मी कायमच आग्रही होते. तशा दर्जाचे साहित्य मराठीत आहे. आपण इतर भाषांमधले साहित्य मराठीत आणतो पण मराठीतील इतर भाषांमध्ये नेण्यासाठी प्रयत्न करत नाही. तसा तो झाला पाहिजे. 

टॅग्स :Puneपुणेmarathiमराठी