शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पुतळ्यांच्या उंचीपेक्षा वैचारिक उंची महत्त्वाची : उल्हास पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 17:15 IST

महात्मा गांधी यांच्या ७१व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ’गांधीजींची पुनर्भेट’ या विशेषांकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी उल्हास पवार बोलत होते.

पुणे :महात्मा गांधी आणि त्यांच्या समकालीन महामुरुषांमध्ये वैचारिक मतभिन्नता असली, तरी त्या्च्यात प्रेमाचा ओलावा हाेता, आदरभाव हाेता. परंतु आज वैचारिक मतभिन्नतेऐवजी व्यक्तीद्वेषच अधिक दिसून येताे.पुतळे उभारून एकमेकांवर टीका करण्याची स्पर्धा लागली आहे. पण पुतळ्यांच्या उंचीपेक्षाही वैचारिक उंची अधिक महत्वाची असते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे परखड मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, लोकशाहीसाठी समंजस संवाद व डेमोक्रॅटिक डायलॉग पब्लिकेशन नेटवर्क आणि गांधी व्हिजन फिचर्स, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या ७१व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ’गांधीजींची पुनर्भेट’ या विशेषांकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी उल्हास पवार बोलत होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते. 

उल्हास पवार म्हणाले, गांधींच्या आयुष्यात अहंकाराला महत्त्व नव्हते. त्यांच्या विचारांनी, दर्शनाने अनेकांना प्रेरणा मिळत असे. त्यांच्या नजरेत एक सामर्थ्य होते, ते समोरच्याला प्रभावित करीत असे. त्यांनी नेहमी सत्य आणि अहिंसा याचा पुरस्कार केला. आज जिथे सत्य आणि अहिंसा आहे, तिथे गांधींची भेट झाल्याशिवाय राहत नाही. गांधींनी नेहमी हिंदू असल्याचा अभिमान बाळगला. मात्र इतर धर्माचा आणि भावनेचा आदर त्यांनी केला. शोषित, वंचित, दबलेल्या भारतीय घटकांचे गांधींनी प्रतिनिधित्व केले. अनेक विदेशी लोक गांधींना प्रेरणास्रोत मानतात. १२० पेक्षाही जास्त देशात गांधी विविध स्वरूपात भेटतात. सहनशील, विनयशील गांधी पुन्हा पुन्हा भेटत राहावेत. त्यांच्या विचारांचे आचरण हीच त्यांना आदरांजली ठरेल. 

टॅग्स :Ulhas Pawarउल्हास पवारmitएमआयटी