शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

पुतळ्यांच्या उंचीपेक्षा वैचारिक उंची महत्त्वाची : उल्हास पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 17:15 IST

महात्मा गांधी यांच्या ७१व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ’गांधीजींची पुनर्भेट’ या विशेषांकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी उल्हास पवार बोलत होते.

पुणे :महात्मा गांधी आणि त्यांच्या समकालीन महामुरुषांमध्ये वैचारिक मतभिन्नता असली, तरी त्या्च्यात प्रेमाचा ओलावा हाेता, आदरभाव हाेता. परंतु आज वैचारिक मतभिन्नतेऐवजी व्यक्तीद्वेषच अधिक दिसून येताे.पुतळे उभारून एकमेकांवर टीका करण्याची स्पर्धा लागली आहे. पण पुतळ्यांच्या उंचीपेक्षाही वैचारिक उंची अधिक महत्वाची असते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे परखड मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, लोकशाहीसाठी समंजस संवाद व डेमोक्रॅटिक डायलॉग पब्लिकेशन नेटवर्क आणि गांधी व्हिजन फिचर्स, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या ७१व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ’गांधीजींची पुनर्भेट’ या विशेषांकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी उल्हास पवार बोलत होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते. 

उल्हास पवार म्हणाले, गांधींच्या आयुष्यात अहंकाराला महत्त्व नव्हते. त्यांच्या विचारांनी, दर्शनाने अनेकांना प्रेरणा मिळत असे. त्यांच्या नजरेत एक सामर्थ्य होते, ते समोरच्याला प्रभावित करीत असे. त्यांनी नेहमी सत्य आणि अहिंसा याचा पुरस्कार केला. आज जिथे सत्य आणि अहिंसा आहे, तिथे गांधींची भेट झाल्याशिवाय राहत नाही. गांधींनी नेहमी हिंदू असल्याचा अभिमान बाळगला. मात्र इतर धर्माचा आणि भावनेचा आदर त्यांनी केला. शोषित, वंचित, दबलेल्या भारतीय घटकांचे गांधींनी प्रतिनिधित्व केले. अनेक विदेशी लोक गांधींना प्रेरणास्रोत मानतात. १२० पेक्षाही जास्त देशात गांधी विविध स्वरूपात भेटतात. सहनशील, विनयशील गांधी पुन्हा पुन्हा भेटत राहावेत. त्यांच्या विचारांचे आचरण हीच त्यांना आदरांजली ठरेल. 

टॅग्स :Ulhas Pawarउल्हास पवारmitएमआयटी