शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

बोगस अंदाजपत्रकाच्या चौकशीचे आदेश, १५ दिवसांत प्राथमिक अहवाल द्यावा : जलसंपदा विभागाला सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 03:07 IST

इंदापूर आणि बारामती तालुक्यातील दहा-बारा गावांना वरदान ठरू शकणाºया खडकवासला क्र. ३६ च्या बोगस पद्धतीने बनविलेल्या अंदाजपत्रकाची दक्षता त्रिस्तरीय चौकशी समितीमार्फत चौकशी करून समितीने प्राथमिक चौकशीचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश

भिगवण : इंदापूर आणि बारामती तालुक्यातील दहा-बारा गावांना वरदान ठरू शकणाºया खडकवासला क्र. ३६ च्या बोगस पद्धतीने बनविलेल्या अंदाजपत्रकाची दक्षता त्रिस्तरीय चौकशी समितीमार्फत चौकशी करून समितीने प्राथमिक चौकशीचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंढे यांनी दिला आहे.आतापर्यंत चार वेळा चौकशी होऊनही याचा अहवालच प्राप्त न झाल्याने या चौकशीत तरी काही ठोस अहवाल मिळणार का? याकडे तक्रारदार आणि शेतक-यांचे डोळे लागले असल्याचे दिसून येत आहे. तर, यातील दोषी अधिकारी आणि कंत्राटदार आपले कोणीच काहीही करणार नाही, अशा धुंदीत वावरताना दिसत आहेत.सिद्धेश्वर, निंबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष सोनवणे, संजय धुमाळ यांनी याबाबत खडकवासला वितरिका (चारी) क्र. ३६च्या बोगस कामाची तक्रार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती, त्या वेळी या प्रकरणाची योग्य प्रकारे तपासणी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या कामाची चार वेळा चौकशी होऊनदेखील चौकशीचा अहवालच सादर न झाल्याने पुन्हा जलसंपदामंत्री महाजन यांनी या प्रकरणाची दक्षता समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिल्याने पुणे विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंढे यांनी या चौकशीसाठी त्रिस्तरीय चौकशी समिती नेमली आहे.यामध्ये लघुपाटबंधारे विभाग सांगलीचे कार्यकारी अभियंता एस. के. पवार, मध्यम प्रकल्प उपविभागीय क्र. ७चे उपविभागीय अभियंता व्ही. डी. पाटील, आटपाडी लघुपाटबंधारे उपविभाग शाखा अभियंता के. आर. मोरे यांची नेमणूक केली आहे.वितरिकेचे काम निकृष्टइंदापूर व बारामती तालुक्यांच्या सीमेवरील सिद्धेश्वर निंबोडी, पारवडी, मदनवाडी या गावांतील शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता वितरिका क्र. ३६ ची निर्मिती झाली. मात्र, प्रत्यक्षात या वितरिकेचे काम निकृष्ट झाल्याने ३० वर्षांत एकदाही पाणी आले नाही. अनेक वेळा शेतकºयांनी यासाठी आंदोलने केली. आंदोलनामुळे या चारीच्या कामासाठी ५ कोटी ७६ लाख मंजूर झाले.त्यानुसार जलसंपदा खात्याने या कामाची चार वेळा चौकशी केली; मात्र या चौकशांमध्येदेखील गौडबंगाल असल्याचा आरोप स्थानिक शेतकºयांनी केला आहे. त्यामुळे वितरिका क्र. ३६ ची चौकशी दक्षता समितीमार्फत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Puneपुणे