शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

भोर तालुक्यामधील रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:15 IST

रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाल्यापासून तीन ते चार वेळा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

नेरे : रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाल्यापासून तीन ते चार वेळा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या दूषित हवामानामुळे रब्बीतील ज्वारी, गहू, हरभरा, मसूर व हजारो एकरावर लागण केलेला कांदा या पिकांवर तांबेरा व चिकटा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याने भोर तालुक्यातील बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत पडला आहे.खरीप हंगामातही पावसाने नियमितपणा न दाखविल्याने उत्पादन समाधानकारक मिळाले नव्हते. आता रब्बी हंगामातही हातातोंडाशी आलेली पिके या हवामानाच्या लहरीपणामुळे वाया जाणार की काय, या भीतीने शेतकरी चिंतेत पडला आहे.हिवाळा चालू होऊन जवळपास दोन महिने उलटून गेले; मात्र या दोन महिन्यांत थंडीचे दिवस असतानाही नागरिकांना मोजकेच दिवस थंडी अनुभवायला मिळाली आहे. मागील आठवड्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला होता. याचा फायदा रब्बी पिकांना होऊन पिकांची जोमाने वाढ झाली होती. मात्र, दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ हवामान तयार झाल्याने ज्वारीवर चिकटा व गहू, कांदा यावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.खरिपात शेवटच्या टप्प्यात हातातोंडाशी आलेली पिके अवकाळी पावसामुळे वाया गेली होती. तीच अवस्था रब्बीतील पिकांची होण्याची दाट शक्यता असल्याचे या दूषित हवामानामुळे दिसून येते, अशी अवस्था वर्षभर होत राहिली तर नशिबी फक्त कष्टच येतात. त्यामुळे शेतकऱ्याने जगायचे तरी कसे? असे धावडी (ता. भोर) येथील प्रगतिशील शेतकरी अमित दरेकर यांनी विचारले.

टॅग्स :Puneपुणे