शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

भोर तालुक्यामधील रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:15 IST

रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाल्यापासून तीन ते चार वेळा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

नेरे : रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाल्यापासून तीन ते चार वेळा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या दूषित हवामानामुळे रब्बीतील ज्वारी, गहू, हरभरा, मसूर व हजारो एकरावर लागण केलेला कांदा या पिकांवर तांबेरा व चिकटा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याने भोर तालुक्यातील बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत पडला आहे.खरीप हंगामातही पावसाने नियमितपणा न दाखविल्याने उत्पादन समाधानकारक मिळाले नव्हते. आता रब्बी हंगामातही हातातोंडाशी आलेली पिके या हवामानाच्या लहरीपणामुळे वाया जाणार की काय, या भीतीने शेतकरी चिंतेत पडला आहे.हिवाळा चालू होऊन जवळपास दोन महिने उलटून गेले; मात्र या दोन महिन्यांत थंडीचे दिवस असतानाही नागरिकांना मोजकेच दिवस थंडी अनुभवायला मिळाली आहे. मागील आठवड्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला होता. याचा फायदा रब्बी पिकांना होऊन पिकांची जोमाने वाढ झाली होती. मात्र, दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ हवामान तयार झाल्याने ज्वारीवर चिकटा व गहू, कांदा यावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.खरिपात शेवटच्या टप्प्यात हातातोंडाशी आलेली पिके अवकाळी पावसामुळे वाया गेली होती. तीच अवस्था रब्बीतील पिकांची होण्याची दाट शक्यता असल्याचे या दूषित हवामानामुळे दिसून येते, अशी अवस्था वर्षभर होत राहिली तर नशिबी फक्त कष्टच येतात. त्यामुळे शेतकऱ्याने जगायचे तरी कसे? असे धावडी (ता. भोर) येथील प्रगतिशील शेतकरी अमित दरेकर यांनी विचारले.

टॅग्स :Puneपुणे