शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

खरं बोललं तर किती त्रास होतो हे आम्हालाच माहिती ;निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची खंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 18:15 IST

इंदोरीकर हे त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या वादावर पडदा पडावा म्हणून त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. या प्रकारानंतर पुणे शहरातले त्यांचे पहिलेच कीर्तन होते. त्यामुळे ते काय बोलणार याकडे लक्ष लागून होते. यावेळी  त्यांनी नर्मविनोदी शैलीत प्रबोधन करत कीर्तन केल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देपुण्यात कोथरूडमध्ये संपन्न झाले कीर्तन खरं बोललं तर किती त्रास होतो हे आम्हालाच माहिती 

पुणे : खरं बोललो की किती त्रास होते हे आम्हालाच माहिती अशा शब्दात मागील काही दिवसांपासून  असणाऱ्या वादावर  ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र मी एकवेळ मरेन पण तुम्हाला रोज माझ्या वाक्यांची आठवण येईल असे सांगायलाही ते विसरले नाहीत. पुण्यातील कोथरूडमध्ये ते तुळजाभवनी माता व राधाकृष्ण सेवा संस्थेच्या राधाकृष्ण मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते. या कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. 

इंदोरीकर हे त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या वादावर पडदा पडावा म्हणून त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. या प्रकारानंतर पुणे शहरातले त्यांचे पहिलेच कीर्तन होते. त्यामुळे ते काय बोलणार याकडे लक्ष लागून होते. यावेळी  त्यांनी नर्मविनोदी शैलीत प्रबोधन करत कीर्तन केल्याचे दिसून आले.

या कीर्तनात ते म्हणाले की, 'जगात देव आहेच मात्र तो संतांशिवाय समजत नाही. मात्र आजकालच्या व्यक्तींना संत म्हणता येत नाही. भाकरी ऐवजी सफरचंद खातो आणि लग्न करण्याऐवजी टिकटॉक बघतो तो संत नसून भामटा आहे. सध्याच्या काळात आईवडील हेच देव आहेत. त्यांच्या संस्कारांमुळे चांगले दिवस आलेत हे मुलांनी विसरता कामा नये. ज्याच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान असते आणि ज्याची धर्मावर निष्ठा असते ती व्यक्ती कायम सुखी असते. 

वारकरी संप्रदायाबद्दल बोलताना ते म्हणाले की, 'वारकरी आहेत म्हणून जग सुरु आहे. आज जगात चुकीची कामे करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे पण, अशा वातावरणातही संतवचने, भागवतकथा, रामायणकथा सारख्या विचारांवर जग टिकून आहे. या काळात संवाद कमी होत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. याबाबत ते म्हणाले की,  टिकटॉक, पब-जी च्या आहारी मुले आणि मोबाईलच्या आहारी पालक गेल्यामुळे सुसंस्कार नसलेला नवा समाज जन्मत आहे. ज्ञान हा साऱ्या विद्यांचा पाया असून त्याची आराधना करण्याची गरज आहे'. 

कीर्तनासाठी विशेष पोलीस बंदोबस्त 

मागील काही दिवसांपासून इंदोरीकर महाराज हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला गर्दी होणार हे निश्चित होते. मात्र या गर्दीतून कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून कीर्तनाबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे दिसून आले. 

टॅग्स :indurikar maharajइंदुरीकर महाराजSocial Viralसोशल व्हायरलkothrudकोथरूड