शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खरं बोललं तर किती त्रास होतो हे आम्हालाच माहिती ;निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची खंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 18:15 IST

इंदोरीकर हे त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या वादावर पडदा पडावा म्हणून त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. या प्रकारानंतर पुणे शहरातले त्यांचे पहिलेच कीर्तन होते. त्यामुळे ते काय बोलणार याकडे लक्ष लागून होते. यावेळी  त्यांनी नर्मविनोदी शैलीत प्रबोधन करत कीर्तन केल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देपुण्यात कोथरूडमध्ये संपन्न झाले कीर्तन खरं बोललं तर किती त्रास होतो हे आम्हालाच माहिती 

पुणे : खरं बोललो की किती त्रास होते हे आम्हालाच माहिती अशा शब्दात मागील काही दिवसांपासून  असणाऱ्या वादावर  ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र मी एकवेळ मरेन पण तुम्हाला रोज माझ्या वाक्यांची आठवण येईल असे सांगायलाही ते विसरले नाहीत. पुण्यातील कोथरूडमध्ये ते तुळजाभवनी माता व राधाकृष्ण सेवा संस्थेच्या राधाकृष्ण मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते. या कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. 

इंदोरीकर हे त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या वादावर पडदा पडावा म्हणून त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. या प्रकारानंतर पुणे शहरातले त्यांचे पहिलेच कीर्तन होते. त्यामुळे ते काय बोलणार याकडे लक्ष लागून होते. यावेळी  त्यांनी नर्मविनोदी शैलीत प्रबोधन करत कीर्तन केल्याचे दिसून आले.

या कीर्तनात ते म्हणाले की, 'जगात देव आहेच मात्र तो संतांशिवाय समजत नाही. मात्र आजकालच्या व्यक्तींना संत म्हणता येत नाही. भाकरी ऐवजी सफरचंद खातो आणि लग्न करण्याऐवजी टिकटॉक बघतो तो संत नसून भामटा आहे. सध्याच्या काळात आईवडील हेच देव आहेत. त्यांच्या संस्कारांमुळे चांगले दिवस आलेत हे मुलांनी विसरता कामा नये. ज्याच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान असते आणि ज्याची धर्मावर निष्ठा असते ती व्यक्ती कायम सुखी असते. 

वारकरी संप्रदायाबद्दल बोलताना ते म्हणाले की, 'वारकरी आहेत म्हणून जग सुरु आहे. आज जगात चुकीची कामे करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे पण, अशा वातावरणातही संतवचने, भागवतकथा, रामायणकथा सारख्या विचारांवर जग टिकून आहे. या काळात संवाद कमी होत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. याबाबत ते म्हणाले की,  टिकटॉक, पब-जी च्या आहारी मुले आणि मोबाईलच्या आहारी पालक गेल्यामुळे सुसंस्कार नसलेला नवा समाज जन्मत आहे. ज्ञान हा साऱ्या विद्यांचा पाया असून त्याची आराधना करण्याची गरज आहे'. 

कीर्तनासाठी विशेष पोलीस बंदोबस्त 

मागील काही दिवसांपासून इंदोरीकर महाराज हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला गर्दी होणार हे निश्चित होते. मात्र या गर्दीतून कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून कीर्तनाबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे दिसून आले. 

टॅग्स :indurikar maharajइंदुरीकर महाराजSocial Viralसोशल व्हायरलkothrudकोथरूड