शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीवारी सोहळ्याच्या तोंडावर इंद्रायणीची 'हिमनदी'! रसायनयुक्त फेसाने भाविकांची होणार गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 13:19 IST

पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीतील औद्योगिक कारखान्यांचे केमिकलयुक्त तसेच नदीकाठच्या गावातून मैलामिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीपात्रात सोडले जात आहे. परिणामी आळंदीतील इंद्रायणीचे नदीपात्र रसायनयुक्त सांडपाण्यामुळे फेसाळले आहे....

आळंदी (पुणे) : यंदाचा आषाढी पायीवारी सोहळा अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. अशातच जलप्रदूषणामुळे आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदी रसायनयुक्त फेसाने फेसाळलेली आहे. आळंदीत वाहणारे काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त सांडपाणी व पाण्यावर तरंगणारा रसायनयुक्त फेस हे वर्णन कुठल्यातरी गटारीचे नसून पवित्र इंद्रायणी नदीचे आहे. पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीतील औद्योगिक कारखान्यांचे केमिकलयुक्त तसेच नदीकाठच्या गावातून मैलामिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीपात्रात सोडले जात आहे. परिणामी आळंदीतील इंद्रायणीचे नदीपात्र रसायनयुक्त सांडपाण्यामुळे फेसाळले आहे.

मागील अनेक दिवसांपासून इंद्रायणी नदी प्रदूषित होत आहे. औद्योगिक वसाहत क्षेत्रातून प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी पात्रात सोडले जात असलेले रसायनमिश्रित पाणी व सांडपाणी हे नदीतील पाणी प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. त्या पाण्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पांढराशुभ्र फेस निर्माण होत आहे. जुन्या बंधाऱ्याखालील नदीपात्रातील पाणी या पांढऱ्या शुभ्र तरंगणाऱ्या फेसाने झाकून जात आहे. अगदी पाण्यावर तरंगणारा फेस पाहून समक्षदर्शींना बर्फाच्छादित भागाची आठवण होत आहे.

इंद्रायणीत रसायनयुक्त सांडपाण्यामुळे जलचर जीवांचे जीव धोक्यात आले आहे. तसेच इंद्रायणी नदीपात्रातील पाणी शेतपंपाद्वारे शेतीला नेले जाते. प्रदूषित पाणी विविध पिकांना दिले जाते. त्या प्रदूषित पाण्याचा पिकांवर दूरगामी परिणाम होतो. परिणामी ही पिके माणसांसह जनावरांच्या आरोग्यासाठी खाणे अपायकारक ठरत चालली आहेत. या नदीपात्राच्या प्रदूषित पाण्यामुळे जवळपास असणाऱ्या विहिरी बोअर यांच्या पाण्यामध्ये परिणाम दिसून येत आहे. इंद्रायणीच्या वाढत्या प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष घालणार का? असा सवाल स्थानिक जनतेकडून उपस्थित होत आहे.

उदासीनता दूर होणार का?

आळंदी हे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येत्या २९ जूनला संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायीवारीसाठी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी आळंदीत दाखल होऊन सोहळ्यानिमित्त पवित्र इंद्रायणीत स्नान करणार आहेत. विशेषतः अनेक भाविक नदीतील पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. मात्र सद्यस्थितीतील इंद्रायणीची अवस्था पाहता भाविकांनी स्नान किंवा पाणी प्राशन करावे की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. एकीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. तर दुसरीकडे राज्यसरकार केवळ आश्वासनं देण्यावर धन्यता मानत आहे. इंद्रायणी नदीने मोकळा श्वास घ्यावा, एवढीच स्थानिक जनता व वारकऱ्यांची माफक अपेक्षा आहे.

उपाययोजना न केल्याने नाराजी

आळंदीतील इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी राज्यसरकारकडे पाठपुरावा केला आहे. विशेषतः पावसाळी अधिवेशनात तारांकित व नागपुरातील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून स्थानिकांची व वारकऱ्यांची भूमिका खंबीरपणे मांडली आहे. यावर तत्काळ उपाययोजना करण्याची ग्वाही संबंधित मंत्रिमहोदयांनी दिली होती. मात्र अद्यापही संबंधित विभागाकडून कोणतेही उपाययोजना आखलेली नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

टॅग्स :indrayaniइंद्रायणीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड