शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जलपर्णीमुळे इंद्रायणी प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 02:22 IST

दूषित पाणी नदीलगतच्या गावांना प्यावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कुरुळी : इंद्रायणीनदीला जलपर्णीने विळखा घातला असून, यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. हे दूषित पाणी नदीलगतच्या गावांना प्यावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन फक्त कागदावर जलपर्णी काढण्याचे काम करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.इंद्रायणी नदी वारकऱ्यांचे श्रद्धास्थानआहे. ही नदी खेड-हवेली तालुक्याची जीवनदायी म्हणून ओळखली जात होती. मात्र हीच जीवनदायी सध्या गटारगंगा झाली आहे. यास पिंपरी पालिका प्रशासन व रहिवासी जबाबदार आहेत. नदीपात्रात जलपर्णी साचल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. दुर्गंधीमुळे नदीमधील जलचर व काठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नदीसुधार प्रकल्प राबविण्यासाठी पालिका प्रशासन वेळोवेळी बोलते. मात्र, यावर ठोस उपाययोजना केली जात नाही. नदीपात्र स्वच्छ व सुंदर असावे अशी कल्पना या भागातील लोकप्रतिनिधींसह पालिका अधिकारी वेळोवेळी बोलतात. मात्र, याबाबत अद्यापही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. श्रीक्षेत्र देहूपासून आळंदी देवाचीपर्यंत नदीपात्रात ठिकठिकाणी गटारे तसेच काही कंपन्यांचे दूषित पाणी नदीत सोडले जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील सांडपाणी, मैलामिश्रित रासायनिक पाणी थेट नदीपात्रात येऊन मिसळते. यामधे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणindrayaniइंद्रायणीriverनदी