शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
2
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
3
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
5
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
6
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
7
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
8
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
9
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
10
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
11
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
12
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
13
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
14
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
15
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
16
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
17
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
18
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
19
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
20
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
Daily Top 2Weekly Top 5

जलपर्णीमुळे इंद्रायणी प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 02:22 IST

दूषित पाणी नदीलगतच्या गावांना प्यावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कुरुळी : इंद्रायणीनदीला जलपर्णीने विळखा घातला असून, यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. हे दूषित पाणी नदीलगतच्या गावांना प्यावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन फक्त कागदावर जलपर्णी काढण्याचे काम करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.इंद्रायणी नदी वारकऱ्यांचे श्रद्धास्थानआहे. ही नदी खेड-हवेली तालुक्याची जीवनदायी म्हणून ओळखली जात होती. मात्र हीच जीवनदायी सध्या गटारगंगा झाली आहे. यास पिंपरी पालिका प्रशासन व रहिवासी जबाबदार आहेत. नदीपात्रात जलपर्णी साचल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. दुर्गंधीमुळे नदीमधील जलचर व काठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नदीसुधार प्रकल्प राबविण्यासाठी पालिका प्रशासन वेळोवेळी बोलते. मात्र, यावर ठोस उपाययोजना केली जात नाही. नदीपात्र स्वच्छ व सुंदर असावे अशी कल्पना या भागातील लोकप्रतिनिधींसह पालिका अधिकारी वेळोवेळी बोलतात. मात्र, याबाबत अद्यापही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. श्रीक्षेत्र देहूपासून आळंदी देवाचीपर्यंत नदीपात्रात ठिकठिकाणी गटारे तसेच काही कंपन्यांचे दूषित पाणी नदीत सोडले जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील सांडपाणी, मैलामिश्रित रासायनिक पाणी थेट नदीपात्रात येऊन मिसळते. यामधे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणindrayaniइंद्रायणीriverनदी