शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

Indrayani Rice | इंद्रायणी तांदूळ उत्पादकांना जिल्हा बँकेचा मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 09:35 IST

हमीभावापेक्षा जास्त दर देऊन त्यांच्या घामाला दाम देण्याचा उपक्रम हाती

पुणे : मावळातील इंद्रायणी तांदूळ उत्पादकांना जिल्हा बँकेतर्फे मदतीचा हात मिळाला असून त्यांना हमीभावापेक्षा जास्त दर देऊन त्यांच्या घामाला दाम देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून भेसळमुक्त तांदळाची खरेदी सुरू झाली आहे. त्यातून मावळचा इंद्रायणी असा ब्रँड स्थापित करण्याचा इरादा आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी संचालक रमेश थोरात, व्यवस्थापकीय संचालक विजय टापरे, संजय शितोळे, उपक्रमाचे माऊली दाभाडे, भाऊसाहेब दाभाडे, संजय ढोरे उपस्थित होते. मावळातील इंद्राणी तांदळाची ख्याती राज्यभर आहे. मात्र, तो ओरिजिनल स्वरूपात मिळत नसल्याची तक्रार ग्राहकांकडून होत होती. तसेच व्यापाऱ्यांकडून राज्य सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केली जात होती. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत होता. तसेच त्यांच्या कष्टाचे पैसेही वेळेत मिळत नव्हते. त्यामुळेच ग्राहकांचा तसेच शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेने विविध कार्यकारी संस्थांच्या मदतीने शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याच्या उद्देशाने यंदा प्रथमच तांदळाची खरेदी सुरू केली आहे. त्यासाठी सरकारच्या हमीभावापेक्षा जादा दराने ही खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दराने किंमत तर ग्राहकांना वाजवी दरात ओरिजिनल तांदूळ उपलब्ध होणार आहे.

इंद्रायणी तांदळासाठी राज्य सरकारचा हमीभाव सध्या २०.६० पैसे इतका आहे. मावळ तालुक्यातील ११ विविध कार्यकारी संस्था सुमारे १५ हजार शेतकऱ्यांकडून २४ रुपये प्रति क्विंटल दराने साळीची खरेदी करणार आहे. व्यापारी हीच साळ १८ ते २० रुपये दराने खरेदी करतात. त्यामुळे विविध कार्यकारी संस्थांनी खरेदी केलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना ४ ते ६ रुपये जादा दर मिळणार आहे. प्रक्रियेनंतर एक क्विंटल साळीपासून ५० ते ५५ किलो तांदूळ मिळतो. त्यामुळे हा तांदूळ ५० रुपये किलोंना पडणार आहे. त्यानंतर त्याचे पॅकिंग व मार्केटिंग गृहित धरून ग्राहकांसाठी हा दर ५५ रुपये प्रति किलो असा ठेवण्यात आला आहे. त्याचा विक्रीचा प्रारंभ १२ डिसेंबरला मार्केट यार्डात होणार आहे. शहरातील सोसायट्यांनी किमान एक टनाची मागणी केल्यास त्यांना हा तांदूळ पोच केला जाणार असल्याचे जिल्हा बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी निरज पवार यांनी सांगितले. या सर्व संस्थांनी ३ हजार टन तांदळाच्या खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड