शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Indrayani Rice | इंद्रायणी तांदूळ उत्पादकांना जिल्हा बँकेचा मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 09:35 IST

हमीभावापेक्षा जास्त दर देऊन त्यांच्या घामाला दाम देण्याचा उपक्रम हाती

पुणे : मावळातील इंद्रायणी तांदूळ उत्पादकांना जिल्हा बँकेतर्फे मदतीचा हात मिळाला असून त्यांना हमीभावापेक्षा जास्त दर देऊन त्यांच्या घामाला दाम देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून भेसळमुक्त तांदळाची खरेदी सुरू झाली आहे. त्यातून मावळचा इंद्रायणी असा ब्रँड स्थापित करण्याचा इरादा आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी संचालक रमेश थोरात, व्यवस्थापकीय संचालक विजय टापरे, संजय शितोळे, उपक्रमाचे माऊली दाभाडे, भाऊसाहेब दाभाडे, संजय ढोरे उपस्थित होते. मावळातील इंद्राणी तांदळाची ख्याती राज्यभर आहे. मात्र, तो ओरिजिनल स्वरूपात मिळत नसल्याची तक्रार ग्राहकांकडून होत होती. तसेच व्यापाऱ्यांकडून राज्य सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केली जात होती. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत होता. तसेच त्यांच्या कष्टाचे पैसेही वेळेत मिळत नव्हते. त्यामुळेच ग्राहकांचा तसेच शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेने विविध कार्यकारी संस्थांच्या मदतीने शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याच्या उद्देशाने यंदा प्रथमच तांदळाची खरेदी सुरू केली आहे. त्यासाठी सरकारच्या हमीभावापेक्षा जादा दराने ही खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दराने किंमत तर ग्राहकांना वाजवी दरात ओरिजिनल तांदूळ उपलब्ध होणार आहे.

इंद्रायणी तांदळासाठी राज्य सरकारचा हमीभाव सध्या २०.६० पैसे इतका आहे. मावळ तालुक्यातील ११ विविध कार्यकारी संस्था सुमारे १५ हजार शेतकऱ्यांकडून २४ रुपये प्रति क्विंटल दराने साळीची खरेदी करणार आहे. व्यापारी हीच साळ १८ ते २० रुपये दराने खरेदी करतात. त्यामुळे विविध कार्यकारी संस्थांनी खरेदी केलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना ४ ते ६ रुपये जादा दर मिळणार आहे. प्रक्रियेनंतर एक क्विंटल साळीपासून ५० ते ५५ किलो तांदूळ मिळतो. त्यामुळे हा तांदूळ ५० रुपये किलोंना पडणार आहे. त्यानंतर त्याचे पॅकिंग व मार्केटिंग गृहित धरून ग्राहकांसाठी हा दर ५५ रुपये प्रति किलो असा ठेवण्यात आला आहे. त्याचा विक्रीचा प्रारंभ १२ डिसेंबरला मार्केट यार्डात होणार आहे. शहरातील सोसायट्यांनी किमान एक टनाची मागणी केल्यास त्यांना हा तांदूळ पोच केला जाणार असल्याचे जिल्हा बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी निरज पवार यांनी सांगितले. या सर्व संस्थांनी ३ हजार टन तांदळाच्या खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड