शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
2
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
3
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
4
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
5
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
6
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
7
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
8
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
9
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
10
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
11
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
12
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
13
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
14
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
15
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
16
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
17
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
18
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

इंद्रायणीपात्र कोरडे, पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 02:39 IST

आळंदी - मरकळ येथील इंद्रायणी नदी पात्र पाण्या अभावी कोरडे आहे. पाणी नदीत सोडण्याची मागणी पुणे पाटबंधारे विभागाकडे मरकळचे पोलीस पाटील बाळासाहेब टाकळकर यांनी केली आहे.मरकळ परिसरातून वाहणा-या इंद्रायणी नदी पात्रात पाणी नसल्याने नगदी पिके जळू लागली आहेत. जनावरांना पिण्याचे पाण्यासाठी नदी पात्रात पाणी सोडण्याची गरज असल्याने तात्काळ पाणी सोडण्याची ...

आळंदी - मरकळ येथील इंद्रायणी नदी पात्र पाण्या अभावी कोरडे आहे. पाणी नदीत सोडण्याची मागणी पुणे पाटबंधारे विभागाकडे मरकळचे पोलीस पाटील बाळासाहेब टाकळकर यांनी केली आहे.मरकळ परिसरातून वाहणा-या इंद्रायणी नदी पात्रात पाणी नसल्याने नगदी पिके जळू लागली आहेत. जनावरांना पिण्याचे पाण्यासाठी नदी पात्रात पाणी सोडण्याची गरज असल्याने तात्काळ पाणी सोडण्याची मागणी टाकळकर यांनी केली आहे.इंद्रायणी नदी पात्रात वाडिवळे अथवा आंध्रा बंधा-यातून पाणी सोडले तर पिकांना तसेच जनावरांचे पिण्याचे पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच जलस्रोत वाढतील असे त्यांनी सांगितले. मरकळ परिसरात शेताचे उत्पन्न घेतले जात आहे.उसाचे मोठे क्षेत्र असल्याने येथील पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी बंधा-याचे बर्गे (ढापे) बसविण्यासह ढापे देखभाल दुरुस्ती व बंधाऱ्याचे मजबुतीकरण करण्याची गरज आहे.पिकांना जीवदान देण्यास पाण्याची गरज असल्याने पाणी सोडण्याची मागणी शेतक-यांचे वतीने पोलीस पाटील टाकळकर यांनी केली आहे. आळंदी इंद्रायणी नदीत पाणी पोहचले मरकळ प्रतीक्षेत दरम्यान इंद्रायणी नदी वरील धरणातून सोडण्यात आलेले पाणी आळंदी नदी पात्रात पोहचले असून उद्या गुरुवार (दि. ५) उशिरापर्यंत मरकळ बंधा-यात पाणी येईल, असे मोशी पाटबंधारे विभागाचे गदादे यांनी सांगितले.पाणी गळती रोखल्यास साठा वाढण्यास मदतपाणीगळती रोखल्यास पाणीसाठा वाढणार आहे.एप्रिलचे पहिल्याच आठवड्यात नदीपात्रात पाणी नसल्याने शेतमाल उत्पादकांनी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. इंद्रायणी नदीवर परिसरात अनेक शेतीपंप असून सुमारे ३ ते ४ किलोमीटरपर्यंत पाईपलाईन करून आणले आहे. ऊस व इतर पिकांना पाणी नसल्याने पिके जळू लागली आहेत.

टॅग्स :indrayaniइंद्रायणीriverनदीPuneपुणे