शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणीपात्र कोरडे, पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 02:39 IST

आळंदी - मरकळ येथील इंद्रायणी नदी पात्र पाण्या अभावी कोरडे आहे. पाणी नदीत सोडण्याची मागणी पुणे पाटबंधारे विभागाकडे मरकळचे पोलीस पाटील बाळासाहेब टाकळकर यांनी केली आहे.मरकळ परिसरातून वाहणा-या इंद्रायणी नदी पात्रात पाणी नसल्याने नगदी पिके जळू लागली आहेत. जनावरांना पिण्याचे पाण्यासाठी नदी पात्रात पाणी सोडण्याची गरज असल्याने तात्काळ पाणी सोडण्याची ...

आळंदी - मरकळ येथील इंद्रायणी नदी पात्र पाण्या अभावी कोरडे आहे. पाणी नदीत सोडण्याची मागणी पुणे पाटबंधारे विभागाकडे मरकळचे पोलीस पाटील बाळासाहेब टाकळकर यांनी केली आहे.मरकळ परिसरातून वाहणा-या इंद्रायणी नदी पात्रात पाणी नसल्याने नगदी पिके जळू लागली आहेत. जनावरांना पिण्याचे पाण्यासाठी नदी पात्रात पाणी सोडण्याची गरज असल्याने तात्काळ पाणी सोडण्याची मागणी टाकळकर यांनी केली आहे.इंद्रायणी नदी पात्रात वाडिवळे अथवा आंध्रा बंधा-यातून पाणी सोडले तर पिकांना तसेच जनावरांचे पिण्याचे पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच जलस्रोत वाढतील असे त्यांनी सांगितले. मरकळ परिसरात शेताचे उत्पन्न घेतले जात आहे.उसाचे मोठे क्षेत्र असल्याने येथील पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी बंधा-याचे बर्गे (ढापे) बसविण्यासह ढापे देखभाल दुरुस्ती व बंधाऱ्याचे मजबुतीकरण करण्याची गरज आहे.पिकांना जीवदान देण्यास पाण्याची गरज असल्याने पाणी सोडण्याची मागणी शेतक-यांचे वतीने पोलीस पाटील टाकळकर यांनी केली आहे. आळंदी इंद्रायणी नदीत पाणी पोहचले मरकळ प्रतीक्षेत दरम्यान इंद्रायणी नदी वरील धरणातून सोडण्यात आलेले पाणी आळंदी नदी पात्रात पोहचले असून उद्या गुरुवार (दि. ५) उशिरापर्यंत मरकळ बंधा-यात पाणी येईल, असे मोशी पाटबंधारे विभागाचे गदादे यांनी सांगितले.पाणी गळती रोखल्यास साठा वाढण्यास मदतपाणीगळती रोखल्यास पाणीसाठा वाढणार आहे.एप्रिलचे पहिल्याच आठवड्यात नदीपात्रात पाणी नसल्याने शेतमाल उत्पादकांनी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. इंद्रायणी नदीवर परिसरात अनेक शेतीपंप असून सुमारे ३ ते ४ किलोमीटरपर्यंत पाईपलाईन करून आणले आहे. ऊस व इतर पिकांना पाणी नसल्याने पिके जळू लागली आहेत.

टॅग्स :indrayaniइंद्रायणीriverनदीPuneपुणे