शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

इंद्रायणीपात्र कोरडे, पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 02:39 IST

आळंदी - मरकळ येथील इंद्रायणी नदी पात्र पाण्या अभावी कोरडे आहे. पाणी नदीत सोडण्याची मागणी पुणे पाटबंधारे विभागाकडे मरकळचे पोलीस पाटील बाळासाहेब टाकळकर यांनी केली आहे.मरकळ परिसरातून वाहणा-या इंद्रायणी नदी पात्रात पाणी नसल्याने नगदी पिके जळू लागली आहेत. जनावरांना पिण्याचे पाण्यासाठी नदी पात्रात पाणी सोडण्याची गरज असल्याने तात्काळ पाणी सोडण्याची ...

आळंदी - मरकळ येथील इंद्रायणी नदी पात्र पाण्या अभावी कोरडे आहे. पाणी नदीत सोडण्याची मागणी पुणे पाटबंधारे विभागाकडे मरकळचे पोलीस पाटील बाळासाहेब टाकळकर यांनी केली आहे.मरकळ परिसरातून वाहणा-या इंद्रायणी नदी पात्रात पाणी नसल्याने नगदी पिके जळू लागली आहेत. जनावरांना पिण्याचे पाण्यासाठी नदी पात्रात पाणी सोडण्याची गरज असल्याने तात्काळ पाणी सोडण्याची मागणी टाकळकर यांनी केली आहे.इंद्रायणी नदी पात्रात वाडिवळे अथवा आंध्रा बंधा-यातून पाणी सोडले तर पिकांना तसेच जनावरांचे पिण्याचे पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच जलस्रोत वाढतील असे त्यांनी सांगितले. मरकळ परिसरात शेताचे उत्पन्न घेतले जात आहे.उसाचे मोठे क्षेत्र असल्याने येथील पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी बंधा-याचे बर्गे (ढापे) बसविण्यासह ढापे देखभाल दुरुस्ती व बंधाऱ्याचे मजबुतीकरण करण्याची गरज आहे.पिकांना जीवदान देण्यास पाण्याची गरज असल्याने पाणी सोडण्याची मागणी शेतक-यांचे वतीने पोलीस पाटील टाकळकर यांनी केली आहे. आळंदी इंद्रायणी नदीत पाणी पोहचले मरकळ प्रतीक्षेत दरम्यान इंद्रायणी नदी वरील धरणातून सोडण्यात आलेले पाणी आळंदी नदी पात्रात पोहचले असून उद्या गुरुवार (दि. ५) उशिरापर्यंत मरकळ बंधा-यात पाणी येईल, असे मोशी पाटबंधारे विभागाचे गदादे यांनी सांगितले.पाणी गळती रोखल्यास साठा वाढण्यास मदतपाणीगळती रोखल्यास पाणीसाठा वाढणार आहे.एप्रिलचे पहिल्याच आठवड्यात नदीपात्रात पाणी नसल्याने शेतमाल उत्पादकांनी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. इंद्रायणी नदीवर परिसरात अनेक शेतीपंप असून सुमारे ३ ते ४ किलोमीटरपर्यंत पाईपलाईन करून आणले आहे. ऊस व इतर पिकांना पाणी नसल्याने पिके जळू लागली आहेत.

टॅग्स :indrayaniइंद्रायणीriverनदीPuneपुणे