शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

भारतीयांचे तिरस्कार नाही तर विकासाच्या राजकारणाला प्राधान्य : रामराजे नाईक निंबाळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 14:58 IST

वक्तृत्वोतेजक सभेच्या सहकार्याने आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर आयोजीत वसंतव्याख्यानमालेच्या उद्घटानाचे प्रथम पुष्प गुंफतांना रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते.

पुणे : भारतीयांनी तिरस्काराच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणालाच प्राधान्य दिले आहे. शांततामय सहजीवन हे भारतीय लोकशाहीचे गुणसुत्रे आहेत, असे म्हणटल्यास अतिशाेयाेक्ती होणार नाही, असे मत राज्याचे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. 

वक्तृत्वोतेजक सभेच्या सहकार्याने आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर आयोजीत वसंतव्याख्यानमालेच्या उद्घटानाचे प्रथम पुष्प गुंफतांना रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरचे अध्यक्ष आणि पुणे मनपाचे नगरसेवक रविंद्र माळवदकर आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरचे कार्याध्यक्ष भाई कात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. व्याख्यानमालेचे यंदाचे सत्ताविसावे वर्ष आहे. 

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, भारतीय उपखंडाचा इतिहास पाहिला तर पाकिस्तान, ब्रम्हदेश, बांग्लादेश या भारता शेजारील राष्ट्रांत आजही लोकशाही व्यवस्था पाळमुळे रुजली नाहीत. त्या तुलनेत भारतात लोकशाहीची पाळेमुळे केवळ रुजली नाहीत तर लोकशाही बहरली, फुलली समृद्ध झाल्याचा अनुभव भारतीय नागरीक घेत आहे. या स्थिती पर्यंत पोहचण्यात राजकीय पक्षांपेक्षा सर्वसामान्य नागरीकांच्या योगदान अधिक आहे. लोकशाही मुल्यांवरील सर्वसामान्यांचा असलेल्या विश्वासामुळेच भारतीय लोकशाही आणि लोकशाहीतील निवडणुक प्रक्रिया मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय विश्लेषकांचा संशोधनाचा विषय ठरला आहे. 

भारतीय नागरीकांच्या मनाचा ठाव त्यांना आजवर लागत नाही. निवडणुकी दरम्यान राजकीय पक्षांमध्ये होत असलेली चिखलफेक पाहता ही भारतीय खंडाची शेवटची निवडणुक असल्याचे निष्कर्श या आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय विश्लेशकांनी अनेकदा नोंदवले आहे. पंरतु ज्या शांततेच्या वातावरणात लोकशाहीत सत्तेचं परिवर्तन होते की हे विश्लेषक बुचकळ्यात पडतात. नाना विविध समुदयाचे, जाती-धर्माचे, विचारधारेचे लोक भारतात राहत असतांना देखील भारतीय लोकशाहीतील सत्तांत्तर प्रक्रिया अतिशय शांततेत होते. अनेकदा राजकीय पक्ष चुकते पंरतु सर्वसामान्य नागरीकांनी सांभाळून घेतले. स्वातंत्र्य संग्रामात ज्या नेतृत्वांनी आहुती दिली, बलिदान केले त्यांच्या त्यागावर आणि आहुतीवरच भारतीय लोकशाहीची मुल्ये टिकली असून ती मुल्ये पिढ्यांनपिढ्या परवर्तीत होत आहेत.  

टॅग्स :PuneपुणेRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकर