शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांचे तिरस्कार नाही तर विकासाच्या राजकारणाला प्राधान्य : रामराजे नाईक निंबाळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 14:58 IST

वक्तृत्वोतेजक सभेच्या सहकार्याने आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर आयोजीत वसंतव्याख्यानमालेच्या उद्घटानाचे प्रथम पुष्प गुंफतांना रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते.

पुणे : भारतीयांनी तिरस्काराच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणालाच प्राधान्य दिले आहे. शांततामय सहजीवन हे भारतीय लोकशाहीचे गुणसुत्रे आहेत, असे म्हणटल्यास अतिशाेयाेक्ती होणार नाही, असे मत राज्याचे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. 

वक्तृत्वोतेजक सभेच्या सहकार्याने आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर आयोजीत वसंतव्याख्यानमालेच्या उद्घटानाचे प्रथम पुष्प गुंफतांना रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरचे अध्यक्ष आणि पुणे मनपाचे नगरसेवक रविंद्र माळवदकर आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरचे कार्याध्यक्ष भाई कात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. व्याख्यानमालेचे यंदाचे सत्ताविसावे वर्ष आहे. 

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, भारतीय उपखंडाचा इतिहास पाहिला तर पाकिस्तान, ब्रम्हदेश, बांग्लादेश या भारता शेजारील राष्ट्रांत आजही लोकशाही व्यवस्था पाळमुळे रुजली नाहीत. त्या तुलनेत भारतात लोकशाहीची पाळेमुळे केवळ रुजली नाहीत तर लोकशाही बहरली, फुलली समृद्ध झाल्याचा अनुभव भारतीय नागरीक घेत आहे. या स्थिती पर्यंत पोहचण्यात राजकीय पक्षांपेक्षा सर्वसामान्य नागरीकांच्या योगदान अधिक आहे. लोकशाही मुल्यांवरील सर्वसामान्यांचा असलेल्या विश्वासामुळेच भारतीय लोकशाही आणि लोकशाहीतील निवडणुक प्रक्रिया मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय विश्लेषकांचा संशोधनाचा विषय ठरला आहे. 

भारतीय नागरीकांच्या मनाचा ठाव त्यांना आजवर लागत नाही. निवडणुकी दरम्यान राजकीय पक्षांमध्ये होत असलेली चिखलफेक पाहता ही भारतीय खंडाची शेवटची निवडणुक असल्याचे निष्कर्श या आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय विश्लेशकांनी अनेकदा नोंदवले आहे. पंरतु ज्या शांततेच्या वातावरणात लोकशाहीत सत्तेचं परिवर्तन होते की हे विश्लेषक बुचकळ्यात पडतात. नाना विविध समुदयाचे, जाती-धर्माचे, विचारधारेचे लोक भारतात राहत असतांना देखील भारतीय लोकशाहीतील सत्तांत्तर प्रक्रिया अतिशय शांततेत होते. अनेकदा राजकीय पक्ष चुकते पंरतु सर्वसामान्य नागरीकांनी सांभाळून घेतले. स्वातंत्र्य संग्रामात ज्या नेतृत्वांनी आहुती दिली, बलिदान केले त्यांच्या त्यागावर आणि आहुतीवरच भारतीय लोकशाहीची मुल्ये टिकली असून ती मुल्ये पिढ्यांनपिढ्या परवर्तीत होत आहेत.  

टॅग्स :PuneपुणेRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकर